बॊंबेचे मुंबई……
बॊंबेचे मुंबई
तुम्हाला ऐकून नवल वातेल की बॊंबेला जे आता मुंबई म्हणतात त्याला कारण माझाच एक भाऊ आहे.
माझ्या या भावाला सुरवाती पासून राजकारणात दिलचस्पी होती.त्याच्या लाहानपणात कम्युनीस्ट विचारसरणी असणे म्हणजे सुधारक समजत असत.रशिया बद्दल त्याना खूप अभिमान असे.ईतके की रशियात पाऊस पडत असेल तर ईकडचा कम्युनिस्ट छत्री उघडतो असे उपहासाने म्हणत.
आमचा हा भाऊ आमच्या लहानपणी आम्हाला कम्युनीस्ट तत्वदद्यान सांगत असे.आमच्या ते डोक्यावरून जात असे.जस जसे आमचे बंधू वयस्कर होत गेले तस तसे हे तत्वद्न्यान मागे पडत गेले.
आता हे आमचे भाऊ हळू हळू शिवसेनेच्या तत्वद्न्यानात दिलचस्पी घेऊ लागले.असो. परत मूळ मुद्द्याकडे यायचे झाल्यास ह्या आमच्या भावाच्या “आमची मुंबई” हा उचलून धरलेला आणि लोकामधे प्रसीद्ध झालेला विषय कायदेशीरपणे वाद घालून जिकण्याचे डोक्यात शिरले.
किती कष्ट घेतले असतील त्याने? कोर्टात लढण्यासाठी आर्थीक मदत आणि हुशार वकीलांची मदत त्याने शिवसेनेकडून घेतली.हायकोर्ट पर्यंत भांडून ऐतीहासीक दाखले दाखवून केस जिंकली आणि “बॊम्बेचे मुंबई”करण्याचा कायदा करून घेतला.
मुंबई सरकारच्या ग्याझेट मधे ह्या आमच्या भावाचे नांव ठळक अक्शरात लिहीलेले दिसेल.शिवसेनेने पण त्यांचा जाहिर सत्कार केला.ठाऊक आहे का त्याचे नांव मधूकर लक्शुमण सामंत.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
