असेच एक चिंतन

March 10, 2007 at 10:08 pm (चिंतन)

चिंतन

बरेच दिवसानी प्रो.देसाई तळ्यावर फिरताना दिसले.मला बघून खूष झाले.”सामंत खूप दिवसानी दिसला तुम्हाला बघून बरं वाटलं.” मी पण त्याना म्हणालो “भाऊसाहेब,मला पण तुम्हाला बघून खूप आनंद झाला”मी पुढे त्यांना म्हणालो “तुमचा चेहरा जरा उतरलेला दिसतो,बरं आहे ना तुम्हाला?”

“हे बघा सामंत आता बरं काय आणि वाईट काय जो जातो तो दिवस आपला.”सकाळी उठल्यावर जर का प्रक्रुतीने काही कुरकुर केली नाही की समजावं खाही खरं नाही.पण ते जाऊ दे तुमची कविता काय म्हणते? अलिकडे आम्हाला तुमची नवी कविता ऐकाला नाही मिळाली.”मी त्यांना म्हणालो “भाऊसाहेब तुम्ही मला स्फुर्ती दिली नाहीत तर मला कविता कशी सुचणार?”

“असं म्हणता तर आज मी तुम्हाला कविता ऐवजी एका विषयावर चिन्तन करायला स्फुर्ती देतो बघा.आहे का तुमची तयारी?”मी थोडा विचारात पडलो मनात म्हणालो भाऊसाहेब आज काहीतरी नवीन विषयावर चर्च्या करणार असं दिसतं.

त्यांनी अशी सुरवात केली.ते म्हणाले “सामंत,त्यादिवशी माझ्या एका मित्राने मला एक ईमेल पाठवली ती ईंग्रजीतून होती.त्याचा मी मराठीतून अनुवाद सांगतो.तो असा.एका एअरफोर्स पायलटने आयायटीच्या स्पेशल सेमीनारला सांगीतलेली गोष्ट.
“माझे आईवडील गावाला जायला निघाले.आणि आम्ही सर्व एअरपोर्टवर त्याना निरोप द्यायला गेलो होतो.खरं तर माझ्या आईवडीलानी विमान प्रवास कधीच केला नव्हता,त्यांच्या अनुभवासाठी मी त्यांना ह्या प्रवासाने पाठवीत होतो.खरं म्हणजे मला त्यांनी गाडीच्या प्रवासाची तिकीटे काढून आणावयास सांगीतली होती.मी त्याना जेट एअरवेजची तिकीटे काडून आणली.विमानाची तिकीटे पाहून त्यांना खूप आश्च्यर्य वाटलं.त्यांच्या चेहरयावरची उत्सुकता आणि एखाद्या शाळकरी मुलाची अंगातली स्फुर्ती पाहून,त्या दिवसाचा जाण्याची तयारी करीत करीत एअरपोर्टवर पोहचण्यापासून त्यांच्या, सामानासाठी ट्रॊली घेण्यापासून ते ब्यागेजे चेकिंग करून विन्डो सीट मिळाल्यावर चेकीनची वाट अधीरतेने पहात होतो.माझे वडील हे सर्व आनंदाने अनुभवत होते.आणे मी पण त्यांचा अनुभव आनंदाने अनुभवत होतो.सेक्युरीटी चेकला जाण्यापुर्वी माझे वडील साश्रुनयनाने माझ्याकडे येऊन मला थ्यान्क्स म्हणाले.ते खूप भावनाप्रधान झालेले पाहून,आणि मी काही प्रचंड केले असे नसता,त्यांना ते प्रचन्ड वाटत होते.मी त्यांना म्हणालो “नको माझे आभार मानूं.”

 तो पुढे म्हणतो “नंतर ही घटना आठवून मी ज्यावेळी अन्तर्मुख झालो,त्यावेळी मी माझ्या भुतकाळात डोकाऊन पाहिल्यावर लक्षांत आलं की आपल्या आईवडीलानी किती स्वपने पाहिली असतील? आणि किती खरी ठरली असतील?त्यांच्या सांपत्तीक परिस्थीचा विचार न करत त्यांना परवडेल न परवडेल याचा विचार न करता क्रिकेट ब्याट,खेळणी,कपडे वगैरे आणि बाहेरच्या ट्रिपासाठी कितीदा पैशाची मागणी आपण केली असावी?आणि त्यांनी आपल्या सर्व गरजा पुरवील्या पण.कधी काळी आपण विचार तरी केला का त्याना ह्यासाठी किती त्याग करावा लागला असेल?कधी काळी आपण त्यांचे आभार पण मानले का?

आता आपण आपल्या मुलांसाठी त्यांना चांगल्या शाळेत घालायचा विचार करतो.पैसे कितीही पडो आपण त्यांच्या सुखसोईसाठी धडपडत नाही का?पण आपली मनस्थीती आईवडीलांच्या त्यागाचा विचार करणासाठी कुठे प्रव्रुत असते?तेव्हां ते तरूण असताना त्यांची अपुरी स्वपने आता पुरी करण्याची जबाबदारी आपली नाही का होत?त्यांच्या आयुष्याला पुर्तता नाही का येणार?”

 परत तो पुढे म्हणतो “बरेच वेळा वडीलांना मी उद्धट उत्तरे दिल्याची आठवते.आता माझ्या मुलीने काही विचारले की मी अतिशय नम्रतेने उत्तर देतो.पण त्यावेळी त्यांना किती वाईट वाटले असेल याची जाणीव आता मला होते.ह्यावरून आपण एक गोष्ट नक्कीच लक्षांत ठेवली पाहीजे,व्रुद्धावस्ता हे एक दुसरे बालपण आहे.आणि ज्या तर्हेने आपण आपल्या मुलांची काळजी घेतो,आणि त्यांच्याकडे जसे लक्ष देतो तसे त्यांच्याकडे पण लक्ष दिले पाहिजे.माझ्या वडीलानी माझे आभार मानण्या ऐवजी त्यांच्या या लहानश्या स्वप्नपुर्ततेसाठी एव्हडा विलंब लावल्या बद्दल मीच त्यांची माफी मागायला नको का?माझ्यासाठी केलेल्या त्यागासाठी मला आता पुर्ण जाणीव झाल्याने मीच त्यांच्या आशा आकांक्षापुर्ती कडे  जास्त लक्ष देण्याची पराकाष्टा करीन.ते वयस्कर झाले याचा अर्थ परत त्यांनी आपले सर्वस्व देऊन नातवन्डासाठी पण त्याग करत रहावे काय?त्याना पण ईछ्या आहेत.त्यांची पण काळजी घ्या.”

“सामंत,ही ईमेल मी माझ्या मित्राना आणि नातेवाईकाना पाठवली.काहीनी त्याला रिसपॊन्स दिला.त्यात तिनही स्त्रिया होत्या.एकीने (त्यांच्या धाकट्या मुलीने), ” मुलाने वडीलांचे थ्यान्क्स मानल्यामुळे मुलगा कसा भावनावश झाला,आणि थान्क्स ह्या शब्दाबद्दलची पावर लक्शात घेण्यासारखी असून सर्वानीच त्या शब्दाचा भरपूर वापर करून नाती जास्त मजबूत करावी”असा विचार मांडला.दुसरीला (त्यांच्या मोठा मुलीला )लेख आवडला.म्हणून तिने आपल्या मुलीना वाचावयाला पाठवून दिला.आणि तिसरीने(त्यांच्या एका मैत्रीणीने) तो लेख वाचून खूप रडू आल्याने “आपण आपल्या आईवडीलांची ते जीवंत असे पर्यंत आणखीन सेवा करणार”असा विचार मांडला.
ह्या कुणाचाही विचार घेऊन तुम्ही तुमचा विचार मांडा नव्हेतर तुमचे चिंतन लिहा.ज्याला ईंगलीश मधे “पॊंडरींग ” म्हणतात ते करा.ही त्यांची सुचना ऐकून मी खरोखरच चिंतन केले ते असे.

चिंतन

प्रो.देसाईंच्या धाकट्या मुलीने थ्यांकस बद्दल लिहीलेल्या विचारावर थोडे विवेचन करतो.
तिला उद्देशून मी लिहीत आहे.
“मी तुला लिहू की नको,असा सतत विचार मनात येत राहीला मग म्हटलं “एकदाचे होवून जावूदे”(आठवतो दिलीप प्रभावळ्करचा डायलॊग “चिनी पात्राच्या तोंडचा”)तुझं म्हणणं की थ्यान्क्स्चा उपयोग सर्व ठिकाणी करून नाती जास्त मजबूत करावी”खरं आहे तुझं म्हणणं. पश्चिमी देशात त्याचा  भरभरून वापर करायचा मोठा रीवाज आहे.ह्याचं मुख्य कारण त्यांची कुटुंब पद्धती आणि लग्न पद्धती आहे.मी काय म्हणतो ते तुझ्या लक्षांत आलं असेल.त्यावर जास्त उवापोह न करता आपल्या संस्क्रुती बद्दल विचार करुंया. आपल्या संस्क्रुतीतेत नाती तिन ढोबळ वर्गात विभागता येतील.

 १)आईवडील आणि मुले, नातवंडे
ह्या नात्यात प्रेम आणि कर्तव्य ह्यांच्या बंधनानी ही नाती एकजीव असतात.आणि ही नाती अशी आहेत की ती निवडता येत नाहीत.आणि उपकार  ह्या शब्दाला अगदी ( मागची  सीट)दिली गेली आहे.”आई थोर तुझे उपकार “असे मुले म्हणतील बाबडी पण आई म्हणेल”बाबारे,मी माझे कर्तव्य केले”पण आईवडीलानी म्हटलं ” मुलांनो,तुमचे फार उपकार आमच्यावर झाले” तर मुलंच आईवडीलाना असे म्हणू देणार नाहीत.
म्हणूनच तो त्या गोष्टीतल मुलगा वडीलांचा “थ्यान्क्स ” हा शब्द ऐकून प्रव्होक (चान्गल्या अर्थाने)झाला. (हे ऐकायला त्याला आवडले नाही)तो शब्द त्याला अनावश्यक वाटला आणि म्हणून त्याला वर्तमान,भूत आणि भविष्य आठवले.”थ्यान्क्स” असे त्याला दुसरया कोणी म्हटले असते तर तो नक्कीच “दयाट्स ऒके “सारखे काही बोलला असता.असे मला वाटते.ह्यांचा अर्थ मुलांचे थ्यान्क्स मानूं नयेत असे मुळीच नाही.काहीना ते आवडत नसावे.असे मला वाटते.

२)जुळवून जोडलेली नाती.

ही असतात निवडलेली नाती.ह्यात वाटलेतर शेजारी किवा मित्रमंडळी पण सामावून घेता येतील.ही नाती निश्चीतच प्रेमामुळे बांधलेली  असतात.आणि त्याशिवाय उपक्रुततेचा(थ्यान्क्स माणून घेण्याच्या अपेक्षाचा)त्याला”वास”असल्याने,तूं म्हणतेस तसे ही नाती “थ्यान्क्स मुळे निश्चीतच भक्कम (स्ट्रेंदन)होत असतात.ह्या नात्याला अगदी पुढची खुरची(फ़्रंट सीट) दिली पाहीजे (पायजेलाय)

३) व्यवहारातून जोडलीली नाती

ही नाती निवडावी लागत नाहीत.व्यवहाराच्या ओझ्याखाली ही नाती क्षणासाठी किवा संबंध असे पर्यंत असतात.उ.दा. रसत्यात क्षणभर भेटलेले लोक(हाय म्हणण्या पुरते)किवा दुकानदार किवा व्यवसाई लोक(कलीग्स).वगैरे,वगैरे.ह्या नात्यात प्रेमाचा लवलश नसतो.असलाच तर तात्पुरता असतो. मात्र उपक्रुततेचा(थ्यान्क्स मानावे असे ग्रुहीत धरण्याचा)भरपुर वास असतो.अशा नात्यात तूं म्हणतेस तसं थ्यांक्सला भरपूर महत्व आहे.अगदी पुढची खुरची, मंचावरची खुरची(स्टेजवरची)दिली पाहीजे.

थोडक्यात काय, ह्या एकाच लेखातून कुणी थ्यांक्स्चा मुद्दा विचारात घेतला तर कुणी “विषय प्रोव्होकेटीव आहे म्हणून मुलांना वाचायला पाठवले तर कुणी ते वाचून आपल्या आईवडीलांची आणखी सेवा करावी असे मनांत आणले.मी ते वाचून अशी दूरवर विचार करणारी मुले पण असतात असा माझ्या मनात विचार आला.
“माणुसकी “बद्दल लेख लिहून त्या लेखकाने माझ्या मनांत विचारांचे चिंतन (पॊंडरींग)आणले हे खरे.माझ्या सारख्या भरपूर वेळ असलेल्याना वेळ घालवावयाचा हा एक मुद्दा मिळाला.खरं की खोटं?

“भाऊसाहेब धन्यवाद स्फुर्ती देण्याबाबत.”

               श्रीक्रुष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

Post a Comment

You must be logged in to post a comment.