नमस्कार मंडळी ,
आपले विचार प्रभावी करता यावे असतील तर कवितेसारखे उत्तम माध्यम नसावे असे मला वाटतं.
तेव्हां ह्या कवितेच्या दोन ओळीने मी सुरवात करतो.
“जेथे आजीआजोबा वसती
तेथे नातवन्डे आनंदे बागडती”
आजीआजोबा आणि नातवंड जेव्हा एकेठिकाणी रहातात तेव्हां त्यातली मजा त्याना अनुभावानेच समजते.मी माझं बालपण आठवूनच म्हणतोय
आता, त्यात काही फायदे आणि तोटे आहेत पण फायदे पाहीलेत तर
पर्वता एव्हडे आहेत आणि तोटे असलेच तर अगदीच कमी असतात असं मला वाटतं.
सगळ्या फायद्या तोट्याची मला इथे चर्चा करता येणार नाही.
पण मला जो आठवतो तो एक किस्सा सांगतो.
अशा घरात आईबाबांच लोवर आणि आजीआजोबांच हाय कोर्ट असतं.
ह्या दोनही कोर्टांच्या इमारती प्रेम,त्याग आणि समजुतदारपणाच्या
पायावर उभारलेल्या असाव्यात, आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे
खालच्या कोर्टात शिस्तीचं आणि वरच्या कोर्टात लाडाचं असं दालन असतं.
ह्या हायकोर्टाचा नातवंडाना बरेच वेळेला फायदा होतो.
कधी समजा खालच्या कोर्टाचा निर्णय पटला नाही की मग
“थीस इज नॉट फेअर” अस मोठ्याने ओरडत आणि पाय आपटत आपटत
एखादं नातवंड आजीआजोबांच्या खोलीचं दार खट्खट करत आत येतं,
आणि मग आत आल्यावर जज्याशी भेट मिठीतच होते.
“काय झालं?”असं नुसतं विचारल्यावर अन्याय काय झाला हे
हुंदक्यामधून समाजावलं जातं,”थांब मी विचारतो हां”
ह्या जज्ज्यांच्या एका आपुलकीच्या आश्वासनावर
“आय लव यू ग्र्यांड पा”(किंवा ग्र्यांडमा) असं म्हणून झाल्यावर सर्व केस तिथेच संपते.
ह्या प्रकरणावरून एक गोष्ट माझ्या लक्षात आली की ईंग्रजी मधे आजी आजोबाना सिनीयर पेरेन्ट,
एलडर पेरेन्ट किंवा सुप्रीम पेरेन्ट न म्हणता ग्र्यान्ड पेरेन्ट(की लाडपेरेन्ट) का म्हणतात ते.
म्हणून मला वाटतं, जसं म्हणतातना “लग्न पहावं करून ” तसं ” आजीआजोबा पहावं होवून”असो.
तर ही सहा फूट चार इंच उंच व्यक्ती आजच्या ह्या समारंभाची हीरो आहे.
ह्या श्याहत्तर इंच उंचीचीच्या रोपट्याला त्याच्या आईबाबाबरोबर,
आजीआजोबाना पण खतपाणी घालण्याची संधी मिळाली त्याचा आज आनंद होत आहे.
नितीशला नंतर डिगऱ्या मिळतीलच मी मात्र त्याला “भाषा पंडीत” ही डिग्री केव्हांच दिली आहे.
त्याचं कारण असं की लहानपणा पासून त्याने मराठी भाषेची समृद्धी केली आहे.
त्याचं कौतूक म्हणून त्याने भर घातलेले मला जे आठवतात ते त्याचे स्वतःचे
काही जोड शब्द तुम्हाला मी सांगतो.त्यावेळी तो खूप लहान होता.
चशम्याला तो तस्सन म्हणायचा
सकाळी उठल्यावर, आजाच्या डोळ्यावर चश्मा नसला ,की तो दुडु दुडु
धावत जाऊन, चश्मा घेऊन यायचा आणि मला हातात देऊन म्हणायचा “आजा तस्सन”
कलिंगडाला कंगी
पुस्तकाला फुकत
सुर्याला बाप्पाशुली
गरम भांडे उचलण्याच्या चिमट्याला कांची
किचन मधे लुडबुडत असताना, “आजी कांची “म्हणून चिमटा नेऊन आजीला द्यायचा
कृष्णकन्ह्याला किसनकनी
आणि पिस्तूलातून येणाऱ्या आवाजाची नक्कल फुताम फुताम अशी करायचा.
त्याचं एक आवडीच गाणं मी तुम्हाला म्हणून सांगतो
ब्यॅड बॉईझ,ब्यॅड बॉईझ वाच्यू क्यान यू डू व्हेन दे कम फॉर यू
ब्यॅड बॉईझ,ब्यॅड बॉईझ वाच्यू क्यान यू डू व्हेन दे कम फॉर यू
हा त्याच्या आजीचा आणि त्याचा अगदी आवडीचा कार्यक्रम
ऐकून झाल्यावर रोजचा कार्यक्रम
आजोबा चोर, आणि हा कॉप.पिस्तूल मला दाखवून फूताम, फूताम
झाल्यावर माझे दोन्ही हात पुढे करून झाल्यावर “यू आल अन्दल ऍलिस्ट”
असं म्हटल्यावर मला शरण यावं लागायचंच.
ते दिवस निघोन गेले, आठवणी फ्क्त राहिल्या
अजूनही तो मराठी भाषा अगदी अस्खलीत बोलतो.हे झाल मराठी भाषेबद्दल.
आता हायस्कूल मधे तो चिनी म्यांड्यारीन भाषा शिकलाय.मराठी,इंगलीश आणि म्यांडरीन शिकून झाल्यावर
तुम्हाला गम्मत सांगतो आता तो कंप्युटरच्या बऱ्याच भाषा शिकलाय
मायक्रोसॉफ्ट,लिनक्स ,सी प्लस ,सी प्लस प्लस वगैरे वगैरे
माझ्या पीसीवर त्याने ह्यातलं काही डावून लोड पण केलं आहे,मी वापराव म्हणून.
आणि गम्मतीची बात म्हणजे लिनक्स मधे उबुन्टू, कुबुन्टू, एजुबुन्टू असले शब्द मला बोलून सांगतो.
ते पण शब्द तस्सन, कंगी सारखे त्याचेच आहेत काय? असा ब्र्हम त्याच्या आजीला कधी कधी होतो.
ऋषी मुनीच्या वेळी मुलं आश्रमात शिकायला जात, आता ती एकविसाव्या शतकात क्याम्पस मधे जातात.
त्यावेळची मुलं पर्णकुटीत राहत, आता ती डॉर्म मधे राहतात.शिकण्याचा वेळकाळ जवळ जवळ तसाच.
थीम तेच, शब्द निराळे. ह्या वर्षी आमची दोन नातवंडं आम्हाला सोडून शिकायला आश्रमात जाणार.
नितीश आणि अंकिता.
त्यांच्या आईवडीलाप्रमाणे, आजीआजोबाना पण ती दोघं सोडून जाणार,याचा विचार येवून
थोडसं वाईट वाटतं.पण मग सर्व संपवून परत येणार त्या कडे लक्ष्य केंद्रीत करायला बरं वाटतं.
कारण निश्चीतच एक उमदार, स्मार्ट व्यक्तीमत्व आम्हाला पहायला मिळणार
जसं इकडच्या मार्केटींग बिझीनेस्च्या भाषेत “ए व्हेरी कूल प्रॉडक्ट” म्हणतातना अगदी तसं.
आमचं आता वंय झालंय.पण म्हणून काय झालं? आशेला मर्यादाच नसाव्यात.
शेवटी जाता जाता दोन ओळी कवितेच्या नातवंडाना उद्देशून आहेत.
खडतर आहे भावी जीवन
बालपणाची मजा हरवून
सुखदुःखाला झूंज देवून
होणार तुम्ही कर्तुत्ववान
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
Permalink
No Comments
“तुमको भेजा नही” वरून वाद
असंच एकदा मी आमच्या धाके कॉलनीच्या बिल्डींग मधून आमच्या फ्लॅट्च्या बाल्कनीतून
पाहिलं की खाली खूप गर्दी जमली होती आणि एका पोस्ट्मन बरोबर एक अनोळखी माणूस
हुज्जत घालत होता.मुंबईला अशा प्रसंगी गर्दी जमायला वेळ लागत नाही.
सहज कुतुहल म्हणून मी पण खाली उतरून काय चाललं आहे म्हणून आणखीन
एक बघ्याची भर असे समजून ऐकायला गेलो.
“भेजा” या शब्दावर वाद चालाला होता.पोस्टमन ही व्यकती नेहमी प्रमाणे लोकल मराठी,
ज्याला भुमी पुत्र म्हणातात तशी होती.बहूतेक कोकणातून आलेला पक्या वेन्गुर्लेकार किंवा
सोन्या धारणकर सारखी असावी.दुसरी तवातावाने हातवारे करणारी आगांतूक उत्तरप्रदेशची
सुशिक्षीत भय्या म्हणण्या सारखी व्यक्ती होती.
बघ्यातला एखादा नक्कीच “क्या हूवा ?”हे चर्चा चालु ठेवण्याचं परवलीचं वाक्य उद्गारून चर्चा सुरू ठेवतो तसे झाल्यामूळे संभाषण ऐकण्याच्या कुतुहलाने मी मान पुढे करून कान थिखट करत ऐकू लागलो.
“तुमकू क्या करनेका है?”
हा वाद न वाढवण्यासाठी रागाने उच्चारलेलं नेहमीच्या प्रश्नाला दोघातल्या एका वाद घालणाऱ्याने,
डोळे मोट्ठे करून आणि रागाने नाक फेंदारून उत्तर दिलं,
अशावेळी प्रतीवादी नेहमीच हिरीरीने पुढे येऊन सांगतोच ते माहित असल्याने
सगळे, मी धरून, क्षणभर शांत होतो.लगचेच तो पोस्टमन जाणून बुजून हिन्दीतून म्हणाला
“ह्याने विचारलं, हमारा खत आया क्या?तो मैने बोला “तुमकू भेजा नही,
तो उसकू घुस्सा आनेका क्या कारण है? “
हे ऐकून तो आगांतूक लगेचच म्हाणाला
“ये खूद्कु क्या समजता है मै क्या पागल हू जैसे मेरेकू भेजा नही है?
इसकू भेजा है तो पोस्ट्मनका काम क्यूं करता है?”
त्यावर “साब इसमे मेरा क्या गलती है बोलो.उसकू भेजा नही तो मै क्या करू?
खत काहासें लाऊ? बोलो?”.असे अगदी साळसूद होवून पोस्ट्मन सांगत होता.
“फिर ऐसा बोलो ना, तुम्हारा खत नही है करके,हमको भेजा नही ऐसा गलत क्युं बोलता है?”
आता ह्या बघ्या मधे जरा हिरोगिरी करणारा पुढे सरसाऊन त्यांचा वाद त्याला आताच जणू काय
कळला सारखे करून दोघा मधे स्पष्टीकरण्याच्या उद्देशाने पुढे सरसाऊन म्हणाला
’ऐसा है क्या ?”
त्याची ट्युबलाईट जर उशिराच पेटलेली दिसली.त्या दोघाना बाजुला करत तो म्हणाला
“खाली पीली तुम दोनो झगडा करके राई का पर्बत करता है.”
“राई का पर्बत ?हा वाक्प्रचार न समजून
“ये राई का पर्बत क्या हो ता है? ऐसे हमने क्या किया ?”
असा त्या आगांतूक भय्याने लगेचच प्रश्न केला.
एव्हड्यात तो पोस्ट्मन हळूच त्या गर्दीतून सटकला.पुढच्या एका दुकानदाराचे पत्र त्याला देत म्हणाला
“साले कुठून खोगीर भरती करून मुंबईला येतात.भेजा या शबदाचे दोन अर्थ आहेत ते आम्हाला
कुठे ठाऊक आहेत.भेजा म्हणजे “पाठवणे “आणि दुसरा अर्थ “मेंदु” हे कसं कळणार? “
आगांतूकाची इतरानी समजूत घातली आणि गर्दी विखरून गेली.
वर आल्यावर मला
“काय समजलं तुम्हाला?”
ह्या तिच्या प्रश्नाला मी फक्त म्हणालो ” फोव ना कातळी फक्त सुको काजर”
हे ऐकून तिने माझ्यावर जो कटाक्ष टाकला त्याने माझ्या चटकन लक्षात
आलं की आता ह्या शब्दावरून घरात भांडण होणार.
(”गैर समजामुळे भांडण” हा कोकणीतून त्या वाक्याचा अर्थ हे तिला कुठे माहित आहे?)
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
Permalink
No Comments
अकरावी तानुली
तानुली ,गुगुली,मुमुली
गोल चेहऱ्याची
सुन्दर दिसणारी बाहूली
उपजतच समजूतदार असलेली
लहान थोरास आणि
मित्र मंडळीना आवडलेली
झाडे ,फळे आणि फुले
पक्षी आणि फुलपाखरे
पाहून रमून गेलेली
अकरावे संपून
बाराव्या वर्ष्यात गेलेली
दीर्घायुषी झालेली
आजा आजीने लाडावलेली
तानुली
आजच आज्याच्या स्वपनात आली
आणि ही कविता जन्मली.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
Permalink
No Comments
प्रत्येक आईला आपल्या मुलाची उन्नत्ती पाहून असंच वाटत असणार.
ते कसं आणि त्या मुलाला आईला काय सांगायचं आहे ते खालील कवितेत लिहीले आहे.
उन्नत्ती
माझी उन्नत्ती पाहून
आई, न्याहळले मी
तुझ्या चेहऱ्यावरच्या आनंदाला
अन
सप्तरंगाचे धनूष्य
दिसले मला
रंग होता
त्रुप्तीचा जांभळा
कुतुहलाचा निळसर
कौतुकाचा निळा
कर्तव्य पुर्तीचा हिरवा
देवाच्या कृतज्ञतेचा पिवळा
शाबास्कीचा संत्र्या सम
अन
अभिमानाचा लाल
आई
स्विकार माझ्या
साष्टांग नमस्काराला
देतो वचन मी तुला
नाही डगमगणार मी
पाहूनी संकटाला
नाही उन्मत्त होणार मी
पाहूनी उत्कर्षाला
राहिन नतमस्तक मी
पाहूनी तुला
अन देवाला
जाईन नंतर मी
शिर्डीला
साईबाबांच्या दर्शनाला
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
Permalink
No Comments
प्रो.देसायांना कळून चुकले होते की आयुष्यात शांती मिळवीण्यासाठी कुठेतरी तडजोड करावी लागते.
कर्तव्य आणि भावना या मधला फरक वेळोवेळी समजून घ्यावा लागतो.आपले आणि परके या मधला
फरक वेळेवर लक्षात आला नाही तर मनःस्ताप होवू शकतो.स्वतःच्या मनाची
समजूत करून घेताना देसायाना काय वाटले ते खालील कवितेत सांगितले आहे.
कवितेचे शिर्षक आहे
तडजोड
रे मना समज लवकरी
बघसी अंतरी
करी तड्जोड सत्वरी
मनःस्तापाशी,मानहानीशी,अन्यायाशी
रे मना नको करू तू डोळे ओले
अन विसर तू झाले गेले
जाऊनी भावनेच्या आहारी
मानीलेस तू ज्याना आपुले
झिडकारीले त्यानी त्वरेने
समजुनी तुला कुचकामी
तेच खरे तुझे आपुले
आधार दिला ज्यानी
करी तडजोड सत्वरी
प्रेमाशी,त्यागाशी,आग्रहाशी.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
Permalink
No Comments
आज प्रो.देसाई जरा खूष दिसले.त्यांच्या धाकट्या मुलीला मुलगी झाली होती.
दोन एक महिने झाले असतील.मला ती बातमी त्यानी या पुर्वीच सांगीतली होती म्हणा.
पण आज काही विषेश त्याना सांगायचं होतं असे त्यांच्या चेहऱ्यावरून मी अनमान काढलं.
“काय भाऊसाहेब आज विषेश काय?” असे मी म्हटल्यावर ते जरा खूसखूसून हसले.
मला त्याना काही तरी सांगायचं होतं.मला ते म्हणाले”सामंत , काय हो तुम्हाला आठवतं का,
ज्यावेळेला तुम्हाला पहिलं मुल झालं तेव्हा तुम्ही कधी त्याला कौतूकाने घेऊन फिरवत होता
त्याचे कपडे बदलणं त्याचे आपण पुर्वी लंगोट म्हणायचो त्याला इकडे आता डायपर म्हणतात
तसं काही तुम्ही बदलायचा का त्याला कधी मांडीवर घेऊन झोपवलं आहेत का तुम्ही?बहूतेक
नसणार कारण तुमच्यावर ती पाळीच कदाचीत आली नसणार.पण इकडे बघा आमचे जांवई हे सर्व करतात.
त्याना म्हणे इकडे ट्रेनींग देतात.ही मुलांची सर्व कामं इकडे आई बाबानां मूल होण्यापुर्वी शिकून घ्यावी लागतात.
त्याना ही सर्व कामं करताना पाहून कौतुक वाटतं बघा.मुलाच्या बाबाला दुधाची बाटली पण द्यायचं शिकवतात.
म्हणजे बघा बापाला जवळ जवळ आईची कामं शिकवतात.आणि हे बाबा पण ही सर्व कामं अगदी आनंदाने आणि अगत्याने करतात.
आता आजी आजोबा झाल्यावर नातवंडाची हीच कामं आपल्याला करायला किती आनंद होतो.
सामंत,तुमचं म्हणण काय आहे याच्यावर ते जरा विस्तारने मला सांगा बघू.”
हे त्यांचं म्हणणं ऐकून “मी थोडा विचार करून मला काय म्हणायचं आहे ते मी तुम्हाला उद्या
आपण भेटू तेव्हा चर्चा करूं.”असं सांगितलं
दुसऱ्या दिवशी जेव्हां आम्ही भेटलो तेव्हा ह्या विषयावर उहापोह केला.तो असा.
मी म्हणालो “भाऊसाहेब,ह्याला मुख्य कारण इकडची कुटुंब संस्था आणि इकडची
(म्हणजे अमेरिकेतली) परिस्थीती मुख्यता कारण असावी.
अहो,त्यावेळी भारतात आपल्या एकत्र कुटुंब संस्थेमूळे किती माणसे जवळ असायची बघा.
त्यामुळे मुलाची ही कामं करायची पाळी कशी येणार.आणि इतकं असून तसं करायला जरी
जायचं तरी एक म्हणजे त्या वयात थोडी लाज वाटाची आणि बायको पण कामं करू द्यायची
नाही कारण तिला पण नवऱ्याने असली कामं करावीत म्हणजे गैरशिस्तीचं वाटायचं आणि मोठी
माणसं पण आपली टिंगल करायची.त्यामुळे आपण त्यावेळी ह्या सर्व गोष्टी पासून परावृतच असायचो.
उलट इथे आईबाबा आणि मूल ह्या शिवाय घरात कोणच नसतं आणि ही कामं एकट्याची नसून दोघांची
असतात हे पटवलं गेल्याने विशेष करून पुरुष्याला, त्यामुळे असली दृश्य आपल्याला दिसतात.
आणि दुसरं म्हणजे मदतीला आजी आजोबा जरी भरतातून आले तरे त्यांचा सहा महिन्याचा व्हिसा
असतो मग सहा महिन्यानी ते गेल्यावर ही कामं कुणी करायची सांगा?
आपण आजोबा म्हणून जेव्हां इकडे नातवंडाचे कौतुकाने लाड करत असतोना,
त्याच पण कारण एका अनुभवी व्यक्तीने मला समजावून सांगीतलं बघा.त्याच म्हणणं असं
की तरुण बाप असताना सुप्त राहिलेली आपली मुलांच्या असल्या सेवेची इछ्या आपण अजोबा झाल्यावर वसूल करतो.
कारण आपली टिंगल करायला कुणी नसतं आणि आजीला पण वयोमनाप्रमाणे जमत नसल्याने
आजोबाला पण काही असली कामं वाटून मिळतात.हे त्या अनुभवी माणसाचे तत्वज्ञान
मला पटतं भाऊसाहेब ,तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही मला उद्या विचार करून सांगा ह्यानंतर आम्ही हा विषय इथे संपवला.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
Permalink
No Comments
आईच्या गर्भाशयाला कर्क रोगाची लागण लागल्याने डॉ.च्या मते शस्त्रक्रीया करून तो काढून टाकण्याविना गत्यंतर नव्हते.हे ऐकून तिच्या कर्त्या मुलांच्या मनात आईला कसे समजावून सांगावे याचा जो विचार मनात आला तो खालील कवितेत मांडला आहे.
कवितेचे शिर्षक आहे
चिमुकली गादी
आई, कळला तेव्हां आम्हा
खरा जीवनाचा आशय
काढतील जेव्हां तुझा
अमोल गर्भाशय
किती सांगू त्या
गर्भाशयाची महती
गे, होईल ती
भली मोठी यादी
कारण ती होती
अमुची चिमुकली गादी
घेऊन अमुचे चिमुकले शरिर
त्या अमुच्या चिमुकल्या गादीवर
जोपासीलेस तू किती कष्टाने
सार पुरे नऊ महिने
नसे त्यामधे क्लोरीन वा ऑक्सीजन
अन नसे कसले सर्क्युलेशन
पोहोत होतो आम्ही
होवून तुझे चिमुकले मूल
हो,तो होता देवाचा स्विमींगपूल
लोळू आता आम्ही किंग अथवा
क्विन बेड वर
परी लोळू कसे स्वपनात आम्ही
घेऊन ती अजोड बेड
आई, नको करू दुःख त्या
गर्भाशयाचे
वापर झाल्यावर टाकून द्यायचा
आहे नियम निसर्गाचा
कसे?कुठे?आणि कधी?टाकायचा
हाच सवाल आहे माणुसकीचा
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
Permalink
No Comments
साबणाच्या पत्राला उत्तर
(सचीन ठाकरे यानी लिहीलेल्या पत्रास उत्तर)
प्रिय सिन्थॉल दादास,
निरमाताईचा,
सप्रेम नमस्कार वि.वि.
तुझे पत्र मिळाले वाचून आनंद झाला.
भारतात परत आल्यावर त्याचे नाव बदलल्याचे पाहून “लाईफ बॉयला” वाईट वाटणे सहाजीक आहे.परंतु त्याने “फेअरग्लोला ” मधे घेण्याचे कारण नव्हते.डॉ.डेटॉलचे आभार मानणे आवश्यक आहे.त्यांच्यामुळे तो बरा झाला.
यावरून एक सिद्ध होते की उगीच कुणाच्या भानगडीत पडू नये.असो.
बाकी तूं लिहीलेल्या सर्व आनंदाच्या बातम्या वाचून बरे वाटले.”सर्फ”मावशीची तब्यत खूपच सुधारली आहे.काळजी नसावी.
मी अलिकडे ऐकत आहे की आपल्या “साबण जमातीची” दुसरी पिढी आंगाखांदयाने खूपच रोडावत चालली आहे.हे काही बऱ्याचे लक्षण नाही.तसेच बुळबुळीतपणा आणि फेस हे गूण पण लोपत चालले आहेत.याबद्दल मी कुणाला दोष देऊं? महागाईला की सरकारच्या “ट्याक्स पॉलीसीला? असो.
“सिंथॉल दादा”, तुला ऐकून नवल वाटेल की आज जो, तो उठ बस अमेरिकेला जात आहे.आणि येताना ते त्यांची अमेरिकेतली मित्र मंडळीना पण ईकडे घेऊन येत आहेत.परवा सहज “सर्फ”मावशीला भेटायला म्हणून गेलो होतो.तिचा मुलगा “मोती” याने येताना त्याच्या मित्र मैत्रीणीना आणले आहे.माझी त्याने ओळख करून दिली.कोण तर म्हणे “डोव्ह”,’शिल्ड” “सेफगार्ड”आणि दादा, तुला मी सांगीतलं तर आच्छर्य वाटेल,अरे, ती “आयव्हरी”नावाची मुलगी इतकी नटली थटली होती की माझी जेव्हां मावशीने तिची ओळख करून दिली “ही आमची “निरमा”तर ती माझ्याकडे बघायला पण तयार नाही.
आणि त्या “आयव्हरीने” काय पर्फ्युम लावलं होतं,अरे, सगळ्या घरात सुवास दरवळला होता.माझी खात्री आहे की ही जर आपल्या “शिकेकाई” “संतूर” “रेक्सोना” वगैऱ्याना भेटली तर नक्कीच ती सर्व तिच्या समोर त्यांची स्वत:ची नाकं मुरडल्याशिवाय रहाणार नाहीत.
आणखीन तुला एक मी पाहिली ती गम्मत सांगते अरे, “लिक्वीड सोप” म्हणून एक जरा लठ्ठशी बाई मावशी जवळ बसली होती.ती म्हणे खूपच अमेरिकेत पॉप्युलर झाली आहे.हल्ली तिकडे आपल्या सारख्याना चोळत बसत नाहीत तर हीलाच डोक्यावर “स्क्वीझ”करतात,आणि गम्मत म्हणजे डोळे चमचमत नाहीत डोळ्यातून पाणी पण येत नाही.लहान मुलांत ही “बेबी म्याजीक बाई”खूपच पॉप्युलर आहे.तिनेच मला सांगितलं की “हवाईन जिंजर रूट कंडीशनार” नावाची तिची दुसरी एक मैत्रीण आहे तिला पण काही इकडची “टिन एजर” वापरतात,हे तुला माहित नसेल. ह्या अमेरिकन लोकांवर देवाने “ओरीजन्यालीटीसाठी “वरदहस्त ठेवलेला आहे हे मात्र सत्य आहे.
आणिक काय लिहूं? सध्या एव्हडं पुरे.
तुझी
निरमाताई.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
Permalink
No Comments