Monthly Archives: ऑक्टोबर 2007

“होय म्हाराज्या !”

होय म्हाराज्या!
कोकणात देवाला गाऱ्हाणे घालण्याची रीत अजूनही प्रचलीत आहे.चांगल्या प्रसंगी देवाची आठवण काढून बरेच वेळा देवळात जाऊन पुजाऱ्याकडून (भटजीकडून) गाऱ्हाणे घालून देवाशी संपर्क ठेवण्याची प्रथा आहे.देवाच्या कानावर घालून झाल्यावर एक प्रकारची मानसीक तृप्ती प्राप्त झाल्याची समाधानी अगदी विरळीच असते. पुजाऱ्याच्या प्रत्येक statement पुढे “होय म्हाराज्या” असे म्हणून
स्वतःची समत्ती असल्याची जाहिर कबूली असते.
ह्या वर्षी आमच्या घरी [...]

खूप खूप अश्रू ढाळले

खूप खूप अश्रू ढाळले
कधी मी माझ्यावर
कधी मी माझ्या दारुणतेवर
खूप खूप अश्रू ढाळले
का कसा हा विषय आला
अन आता त्या विषयावर
खूप खूप अश्रू ढाळले
घेतली समजूत करून
की सर्व सर्व विसरलो
झालं तरी काय आज
हे विसरणेच आठवून
खूप खूप अश्रू ढाळले
कशा साठी जगायंच
कुणा साठी जगायंच
हे सर्व प्रश्नच आठवून
खूप खूप अश्रू ढाळले
कोण कुणासाठी रडतो
ज्याला त्याला ज्याचे त्याचे
हा आप्पलपोटेपणा आठवून
खूप खूप अश्रू ढाळले
         [...]

परतव माझ्या आठवणी

परतव माझ्या आठवणी
यादे माझी आहेत तुझ्याजवळी
श्रावणमासी ओलेते दिवस मात्र
अन माझ्या कोऱ्या कागदावरची
लिपटलेली ती काळोखी रात्र
जा विसरून ती यादे या क्षणी
अन परतव माझ्या त्या आठवणी
ग्रिष्मातली पानांची पडझड
पडत्या पानांची ती सळसळ
वहात्या झऱ्याची ती खळखळ
कानी माझ्या अजूनी वाजती
यादे माझी आहेत तुझ्याजवळी
जा विसरून ती यादे या क्षणी
अन परतव माझ्या त्या आठवणी
पडझडणाऱ्या त्या पानांची
गदगदणारी ती फांदी
अजूनही करते गदगद
मोडून टाक ती [...]

“एकद्दयांचं कायते होओन ज्यावूद्दये”ईती,पिंग-पॉन्ग-चू

” एकद्दयांचं कायते होओन ज्यावूद्दये ” ईती, पिंग-पॉन्ग-चू
त्याचं काय झालं, मी अलिकडेच लिहीलेला एक लेख
” माणूस मुलतः शाकाहारीच आहे “
वाचून माझ्या एका स्नेह्यानी मला लिहीलं
” नमस्कार , काल तुमच्या ब्लॉगला भेट  दिली.  २-३ कविता आणि माणुस  शाकाहारी प्राणी कसा आहे ते वाचले. पण सर्व लोक शाकाहारी  झाले तर अन्न-धान्य  पुरेल का ?  अन्न-धान्य यांच्या  किंमती  [...]

तूं जगूं नाही दिलंस

तूं जगूं नाही दिलंस
शांतीने जगावं तर
तूं जगूं नाही दिलंस
विष प्राशन करावं तर
तूं पिऊ नाही दिलंस
रात्र होऊन नववधू जेव्हां
जाई शुभ्र चंद्ररथातूनी
येऊन तुला माझी याद
मन तुझे जाईल सतावूनी
कुणी नाही दिलं दुःख ईतकं
तूं होतास देत ते जितकं
रात्रंदिनी ठेवूनी माझ्या मनात
तूं दिलेल्या शल्याचा विचार
करीतो मला तो सदा बेजार
वाटे कसा करू माझा गुजार
नसतो झालो आपण विलग
मरणांती झालो असतो अलग
असो बहाणा [...]

चुकून करीन अलक्षणीय घोटाळा

चुकून करीन अलक्षणीय घोटाळा
इतकी शक्ति देऊ नको रे देवा मला
जणू होईल माझा मनोविश्वास दुबळा
सन्मार्गाने जाणारा मी पामर
चुकन करीन  अलक्षणीय घोटाळा
असे चोहिकडॆ अन्याय अन लाचारी
काळजीच्या ओझ्याखाली आहेत बिचारी
पापांचा डोंगर वाढतच आहे
कोण जाणे ही धरती
भार कसा सांभाळत आहे
भार ममतेचा घे तूं उचलून डोक्यावर
न होवो तुझ्या कलाकृतीचा
अंत असे केल्यावर
येवो न विचार काय आम्ही कमवीले
येऊ दे विचार काय आम्ही [...]

पडूं आजारी मौज हिच वाटे भारी

निरोगी मौज
पडूं आजारी
मौज हिच वाटे भारी
सेवा करणाऱ्या व्यक्तीचे
कष्ट मात्र वाढतात भारी
स्वतःची कामे ऊरकून
रुग्ण सेवा नशिबी सारी
मौजच असेल करायची
जरी सर्वांनी मिळूनी
आहे एक गुरुकिल्ली
घ्यावी सर्वांनी समजूनी
खाणे,पिणे अन जेवण्याची
असावी हेल्धी स्टाईल
व्यायामाची संवय ठेवून
म्हणावे असाच दिवस जाईल
विश्रांतीची आवशक्यता
विसरून कसे चालेल
करून हे एव्हडे सारे
कुणी पडे आजारी
सेवेचे कर्तव्य वाटे न्यारे
       श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
           shrikrishnas@gmail.com                  

नको बागेत येऊस.

नको बागेत येऊस
केशभार असा सोडून
नको बागेत येऊस
फुलांच्या सावल्याना
नको लज्जीत करूस
प्रेमाचे गुणगान
नको तू ही गाऊस
गीताचे भ्रमराकडून
नको हंसे करून घेऊस
प्रेमाचे भ्रमराला
कसले आले ज्ञान
मी काय सांगू?
कळ्यानांच विचार
लफंगा असे हा भूंगा
शिकवील तुला तो मग
त्याचीच नकली कला
अन घेशील नंतर
तूं माझाच पंगा
शोभे न तुला
हे असे बोलणे
पावित्र्य प्रेमाचे
असे विटवीणे
देशी का मज
तू साथ तिथे
हे क्षीतज जिथे
पुरे पुर्ण झुकते
येईन मी ही
तुझ्या संगती
नको वाटेत होऊस
तू [...]

मनुष्य हा मुलतः शाकाहारीच आहे.

मनुष्यप्राणी हा मुलतः शाकाहारीच आहे.
मनुष्याच्या शरीराकडे नीट लक्ष देऊन पाहील्यावर,एक गोष्ट निश्चीत लक्षात येईल
की मांसाहारी होण्यास मनुष्य परिस्थितिनुसार उद्युक्त झाला असावा.कारण मनुष्य शाकाहारीच आहे.माझ्या पुढील चर्चेतून मला वाटतं, तसे मी माझे विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे हे तुमच्या लक्षात येईल.तसंच माणसाला निसर्गाने (किंवा वाटल्यास देवाने म्हणा) अविरत बुद्धिचातुर्य दिल्याने,गरजेनुसार तो आपल्या खाण्याच्या संवयीत बदल करीत [...]

जा तूं मला विसरून

जा तूं मला विसरून
माझी याद करून
नको ढाळू तूं तुझे अश्रू
मला सतत मनी आणून
नको जीवन तुझे जाळू
जा मला तूं विसरून
होते ते एकच सुखस्वप्न
घे अशी समजूत करून
गेला तो जमाना
असे तुझ्या मनात आणून
नको ढाळू तूं तुझे अश्रू
मला सतत मनी आणून
माझे लक्ष निराळे
तुझा मार्ग निराळा
नच भेटेल डोळ्याला डोळा
होऊ दे मला तुझ्या
दुनियातून वेगळा
नको ढाळू तूं तुझे अश्रू
मला सतत मनी आणून
हे [...]