प्रीत तुझ्यावर सदैव करी

November 30, 2007 at 4:03 am (अनुवादीत)

प्रीत तुझ्यावर सदैव करी

मन माझे खूळे होऊनी
प्रीत तुझ्यावर सदैव करी
जरी येशी सामोरा मला पाहूनी
तरी शब्द ओठी जाती राहूनी

समजावू किती ह्या मनाला
खूलवू किती ह्या मनाला
भोळे हे मन काही न समजे
रात्रंदिनी ही उदास असते
मन माझे खूळे होऊनी
प्रीत तुझ्यावर सदैव करी

क्षणोक्षणी सतावते हे मन माझे
रात्र सारी जागवीते हे मन माझे
ठाऊक नसे हे तुला कधी
परी जीव टाकीते तुझ्यावरी
मन माझे खूळे होऊनी
प्रीत तुझ्यावर सदैव करी

     श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
      shrikrishnas@gmail.com
 

Permalink No Comments

नको माझे स्वप्न मोडू

November 28, 2007 at 3:32 am (अनुवादीत)

नको माझे स्वप्न मोडू

हळू हळू जा तू चंद्रा
हळू हळू तू जा
नको तू रात्र ढळू
नको माझे स्वप्न मोडू

पाहूनी त्याला नजर फिरवीली
कशामूळे मी नजर झूकवीली
गुणगुणत गाणे वारा गाई
हळू हळू जा तू चंद्रा
हळू हळू तू जा

भेट झाली आम्हा दोघांची
लागण झाली हजारो दिव्यांची
अगणित हार गुंफिले फुलांचे
कुजबुज होई अमुच्या मिलनाची
हळू हळू जा तू चंद्रा
हळू हळू तू जा
नको तू रात्र ढळू
नको माझे स्वप्न मोडू

        श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
           shrikrishnas@gmail.com

Permalink No Comments

घडत असे घडता घडता

November 26, 2007 at 6:40 am (अनुवादीत)

घडत असते घडता घडता
इशारा देते ही संध्या जाता जाता
जीवनात एक एक गोष्ट
घडत असते घडता घडता

सहचरा शिवाय मन लागेना
जीवन सुने सुने राहाता येईना
मिळे कुणी असाच जाता जाता
जीवनात एक एक गोष्ट
घडत असते घडता घडता

असता मन माझे उत्साही
कटाक्ष टाके कुणी हंसूनी
न व्हावी माझी परिणती
उश्वास मी घेता घेता
जीवनात एक एक गोष्ट
घडत असते घडता घडता

        श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
           shrikrishnas@gmail.com

Permalink No Comments

दाजी “पोष्टमन”

November 23, 2007 at 5:39 pm (व्यक्ती आणि वल्ली)

दाजी “पोष्टमन”

भास्करभाऊना दाजी धरून सहा मुलं.दोन मुलगे अणि चार मुली. दाजी सर्वांत मोठा.तशी दाजीला आणखी दोन भावंड होती,परंतु ती लहानपणीच निर्वतली.
भाऊ एकटे कमविणारे, गुंडू जोश्यांच्या दुकानात कारकूनाची नोकरी करून किती पगार मिळणार.एव्हडी मुलं झाल्यावर गरिबी ठाण मारूनच बसणार.

दाजी जेमतेम इंग्रजी ४ थी पर्यंत शिकला.मराठी ४ ईयत्ता आणि इंग्रजी ४ ईयत्ता.खूप झालं असे त्याला वाटलं.पण खरं कारण ते नव्हतं.इंग्रजी शाळेत दीड रुपया मासिक फी होती.आठ,आठ आण्यानी वाढून ४ थीत ती दीड रुपया झाली होती. जस जशी दाजीची भावंड वाढू लागली तस तशी भाऊंच्या खर्चाला मेळ बसणे कठीण होवू लागलं.
दाजी वेळेवर फी भरत नाही, म्हणून मास्तर त्याच्यावर रागवू  लागले. नंतर नंतर ते त्याला पुरा तास बाकावर उभे करून शिक्षा देवू लागले.पहिली बाकावर उभं राहाण्याची शिक्षा भोगताना, दाजीला खूप वाईट वाटलं होतं,कारण घोडग्यांची शालू आणि पुन्हाळेकरांची मालू त्याला बाकावर उभा राहिलेला बघून हंसली होती.
घरी आल्यावर तो आईच्या कुशीत जाऊन खूप रडला होता.वडील फीचे पैसे देऊ न शकल्याने त्याला शाळेत खूप शरमेने रहावं लागतं,  त्यामुळे त्याचं अभ्यासातपण लक्ष लागत नव्हतं.आई त्याला वडीलांची बाजू घेऊन समजावून सांगत होती.ते दाजीला कळत होतं पण वळत नव्हतं.

हळू हळू तो पुस्तकं घेऊन घरून निघाला तरी शाळेत जात नव्हता. थोडे दिवस तो ईकडे तिकडे वेळ घालवत राहीला.कुणाच्यातरी दुकानात जाऊन गप्पागोष्टी करीत राहिला.शाळा सुटण्याच्या वेळी घरी यायचा.परिक्षेत बऱ्याच अश्या विषयावर लाल लाईन्स आलेल्या पाहून भाऊनी त्याला विचारल्यावर त्याचा त्यांच्याशी वाद व्हायचा. भाऊना तोंड बंद बुक्याचा मार सहन करावा लागायचा.
एकदा त्याला इंगळ्यांचा चिंतामणी रस्त्यावर भेटला असता म्हणाला “हेड पोस्टात जाऊन गरीब अशिक्षीत लोकांच्या मनीऑर्डरी किंवा पत्र लिहून पैसे का कमवीत नाहीस? ईकडे तिकडे वेळ का घालवतोस.” दाजीला ही कल्पना नामी वाटली.तसे तो करू लागला. रोजाना चार पैसे खिशात पडू लागले.हे गुपित फक्त त्याने आपल्या आईला सागितलं. तिला पण घरखर्चाला त्याच्याकडून मिळू लागल्याने भाऊंच्या तुटपुंज्या कमाईत हाल करून घेण्यापेक्षा हा मार्ग तिला सुखकर वाटला.लहान वयात दाजीला शिक्षणाला दांडी देवून असं करावं लागतं त्याचं तिला वाईट पण वाटत होतं.

कधी कधी रविवारी ताटात सरंग्याची तळलेली कापं आणि सुंगटाच कालवण जेवताना भाऊना अचंबा वाटायचा पण कदाचित बायको दिलेल्या पैशातून काटकसर करीत असेल अशी भाबडी समजूत करून घेऊन जेवून झाल्यावर मुकाट्याने हात तोंड धुऊन उठून जायचे.नंतर काही दिवसानी कानावर कुणकुण आल्यावर त्यानी सर्व बाबतीत दुर्लक्षच केलं.अशा तऱ्हेने दिवस जात होते.

आम्ही काही दिवसासाठी उन्हाळ्याच्या सुटीत कोकणात आलो होतो. दाजीच्या आईने माझ्या आईकडे दाजीचा विषय काढून त्याला आमच्या बरोबर मुंबईल नेऊन नोकरी लावण्याची कल्पना दिली.आणि अश्या तऱ्हेने दाजी मुंबईला राहू लागला.असाच एकदा दाजी दादर पोस्टात नोकरी मिळेल का यासाठी गेला असता योगायोगाने त्याला चिंतामणी भेटला .चिंतामणी पोस्टात क्लार्क म्हणून काम करत होता.पोस्टमास्तराच्या ओळखिने त्याने दाजीला पोस्टात चिकटवलं.सुरवातीला पोस्टात शिपाई म्हणून त्याला नोकरी मिळाली.पोस्टमनांचेच कपडे घालायला फुकट मिळाले.महिना चाळिस रुपये पगार मिळू लागला.दाजीने आईला पहिल्या पगारात मनिऑर्डर करून खाली दोन ओळीत लिहीले की “तुझ्या आशिर्वादाने मी पोस्टात नोकरीला लागलो.दर महिन्याला मी तुला २० रुपये पाठवित जाईन.भाऊना नमस्कार सांगावास.” दाजीच्या आईचा आनंद गगनांत मावेना.ज्याला त्याला ती सांगू लागली की “आमचो दाजी पोष्ट्मन झालो. “

त्यानंतर दोन वर्षात दाजीला खरोखरच पोस्टमनच्या जागेवर बढती मिळाली,दाजीच्या आईचे शब्द खरे ठरले.निवडीच्यावेळी दाजीला पत्रावरचे मराठीत,हिंदीत,आणि इंग्रजीमधे पत्ते वाचायला सांगितले होते,ते त्याने न चुकता वाचले तसेच दादर भागातील निरनिराळ्या रस्त्यांची नावं वाचायला दिली ती पण त्याने बिनचूक वाचली. दाजीला आता चार खाकी प्यान्ट्स,चार खाकी बुशशर्टस आणि चार पोस्टमनच्या खाकी टोप्या मिळाल्या.आठ्वड्याला ते कपडे धोब्याकडे धुवायला अलाउन्स मिळू लागलं.आमच्याकडे राहात असल्याने तो आईला खर्चाचे पैसे देऊ करीत चक्क आईला साष्टांग नमस्कार घालून बसला.आईने त्याला आशिर्वाद दिले पण त्याचे पैसे घेतले नाही.उलट पोस्टात स्वतःच्या नावावर सेव्हिंग खाते उघडून घेऊन पैसे जमा करण्याचा सल्ला दिला.
आता दाजी नोकरीत खूप रुळला होता.दादर एरिया त्याची पाठ झाली होती.प्रामाणिकपणा,साधा स्वभाव आणि मद्तीला पुढे धावणारी वृत्ती असल्याने दाजीची प्रगती होत गेली.आता त्याला सांताकृझला सरकारी क्वार्टरसमधे तिन रूमचा ब्लॉकपण मिळाला.तो आता तिकडे राहायला गेला.दर रविवारी आमच्या घरी यायचा.येताना एक डझन उत्तम केळी घेऊन यायचा.माझ्या हातात देताना म्हणायचा “हिरव्या सालीची आसत पण आतून मात्र पिकी आसत हां! ” हे त्याचे बोलणे ऐकून आई हंसायची.”मावशे हंसू नकोस आता मी शुद्ध मराठीत बोलतंय हां! ” असं तिला निक्षून सांगायचा. आई म्हणायची “अरे दाजी,आता लग्न कर बघू! म्हणजे तुझ्या पायाच्या चाकाना ब्रेक लागेल.” त्यावर तो म्हणायचा ” मावशे, पोस्टमनाच्या पायांक सदाचीच चाकां,पत्रां टाकूक गांवभर फिरूक लागतां. ” दाजी एकटाच एव्हड्या मोठ्या ब्लॉकमधे राहतो म्हणून लोक त्याला पेईंग गेस्ट ठेव म्हणून सुचना करायचे पण दाजी कसला रिटायर्ड होई पर्यंत त्याने आपला हेका सोडला नाही.” मी सरकारी नोकर असल्याने कायद्दयाने मला असं करता येत नाही,जे करतात त्याना बापड्याना करू देत,मी  कोर्टाची पायरी चढणार नाही ” असं ठासून सांगायचा.

एका वर्षी दाजीचे वडील त्याच लग्न करून टाकण्यासाठी पहिल्यांदाच मुंबईला आले होते.वडीलाना तो आमच्या घरी घेऊन आला होता.आईकडे वडीलांसमोर लग्नाचा विषय काढून कसा म्हणतो” मावशे, पोस्टमनाच्या जातीक लग्न परवडूचां नाय. बायकोच्या लिपस्टीक आणि पावडरीत सगळो पगार संपतलो,मग महिनाभर खावूंचा काय? ” आई नेहमीप्रमाणे हंसायची.त्यांच्या मुक्कामात वडीलानी मोठा प्रयत्न करून एक मुलगी दाखवली तिचा इंटरव्ह्यू घेणार म्हणून त्यांच्या खणपटीला बसला.आणि त्यात त्याने तिला स्पष्ट विचारलं “  काय हो,तुम्ही माझ्याशी लग्न करायला निघालात पण तुम्हाला माझ्यापेक्षा चांगला  मुलगा मिळाला नाही काय ? ” मुलीच्या बापाने कपाळावर हात मारून घेत त्याची रजा घेतली.नंतर कंटाळून दाजीचे वडील कोकणात परत गेले.

दाजी कायमचा ब्रम्हचारी राहीला आणि रिटायर्ड होवून ६० वर्षावर कोकणात परत गेला.आता तो त्याच्या वडीलांच्या गावी आजगावात रहातो.आई वडील केव्हाच निर्वतले.दाजी जाताना सरकारी कपडे घेवून गेला.गावात फिरताना ते मधून मधून वापरतो.नोकरीवर असताना पावसाळ्याच्या दिवसात सरकारने त्यांना लांब प्यांन्ट भिजूनयेत म्हणून शॉर्ट प्यान्ट्स (तो त्याला “हाफ प्यांन्ट” म्हणायचा.) त्याही नेल्या होत्या.त्या “हाफ प्यांन्ट्स ” घालून कोकणात खूप उकडतं म्हणून वरती उघडाच राहून गांवभर भटकत असतो.आपल्या ४० वर्षाच्या सरकारी नोकरीतला अनुभव न विचारला असतानाही सांगत असतो.त्याच्या उजव्या हाताचा आंगठा सरळ न रहाता खांद्दयाकडे वळलेला दिसतो त्यावर कुणी प्रश्न केल्यास “रिटायर्ड होता होता सॉरटरची जागा मिळाल्याने हजारो पत्रे सॉर्ट करून करून आंगठा हा असा वाकला “असे अभिमानाने सांगत असतो.
कुणी म्हणतात “दाजीचं डोकं फिरलंय” म्हणून तो असा बडबडत असतो.एकएकाच्या आयुष्यात कायमचा संघर्ष असल्यावर “डोकं फिरलं नाही तर नवलच म्हटलं पाहिजे”

     श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
       shrikrishnas@gmail.com

Permalink No Comments

कसं आहे तुझं

November 21, 2007 at 5:56 pm (अनुवादीत)

कसं आहे तुझं
कुणी विचारेल का
माझ्या दुःखी मनाला
कसं आहे तुझं
कसं आहे तुझं

नशिबा तुझं निराळंच वागणं
छळायचंच तर खूप छळणं
फूल बहरलं तर डहाळी तुटणं
कुणी बरोबर तर कुणी चुकणं

म्हटलं ज्याला अगदी जवळचं
नजरच म्हणाली आहे ते चुकीचं
करण्य़ा गेलो अतिव स्नेह
पदरी पडला अतिरेकी विरह

पहिल्या पाऊली झाली घाई
शेवट होऊनी ठोकर खाई
घालवून बसलो आझादी
कुणी समजावे कुणी जाणावे
प्रेमापासून होई कशी उतराई

कुणी विचारेल का
माझ्या दुःखी मनाला
कसं आहे तुझं
कसं आहे तुझं
       श्रीकृश्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
         shrikrishnas@gmail.com

Permalink No Comments

अर्धी नियत छुपी छुपी

November 19, 2007 at 5:33 pm (अनुवादीत)

अर्धी नियत छूपी छूपी

स्वभाव ज्यांचा छूपा छूपा
कसल्या कराव्या अपेक्षा
नकली चेहरा सामोरा येई
असली भाव छपून राही

स्वतःशी स्वतः लपून छपून
कसली अपेक्षा ओळखीची
कसली द्दयावी अलिंगनें
कसल्या कराव्या शुभेच्छा
अर्धी नियत उभारलेली
अर्धी नियत छूपी छूपी

दिलदारीचे ढोंग रचवून
जाळे पसरवीत गप्पांचे
ढकलती जीवन दिवसाचे
सुखं शोधती रात्रीचे
दुःख अंतरी ओठी येई
दुःख शरिरी छपून राही

अर्धी नियत उभारलेली
अर्धी नियत छूपी छूपी
      श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
      shrikrishnas@gmail.com
 

Permalink No Comments

आली फिरून उत्कंठा जगण्याची

November 18, 2007 at 5:03 am (अनुवादीत)

आली फिरून उत्कंठा जगण्याची

पदर ओढिला काट्यानी
चाळ तोडिला पायानी
उडत्या माझ्या मनाला
कुणि आता नका आवरूं
चालले होऊन माझे मन
जणू वाऱ्या वरचे पाखरूं
आली फिरून उत्कंठा जगण्याची
आला फिरून ईरादा मरण्याचा

गत रात्रीच्या कभिन्न अंधारातून
देखिले चोहिकडे नयन मिचकावून
बहरले जीवन फुला फुलातून
निश्चय झाला मग हे देखून
आली फिरून उत्कंठा जगण्याची
आला फिरून ईरादा मरण्याचा

का भारावलेले असे माझे जीवन
का मोकाट सुट्लेले मी असे तुफान
मन होई साशंक करीता जीवन प्रवास
वाटे जाईन हरवून मी तुझा सहवास
आली फिरून उत्कंठा जगण्याची
आला फिरून ईरादा मरण्याचा

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Permalink No Comments

लपून छपून येई दुलहन

November 17, 2007 at 5:01 pm (अनुवादीत)

लपून छपून येई दुलहन

ढळून होई दिवसाचा अस्त
होवून संध्या दुलहन मस्त
लपून छ्पून येई
छंदिष्ट माझ्या मनाच्या अंगणी
लावील का कुणी
स्वपनांच्या दीपज्योती त्याक्षणी

असेच केव्हा होती जेव्हा
बोजड निश्वास
भर भरूनी येती जेव्हा
अश्रू नयनी
मुरडत मुरडत येऊनी तेव्हा
करील का कुणी
मजवरी प्रेमाचा वर्षाव

दोन मने का कधी न जुळती
कुठून आली जन्माची नाती
वैरी होऊनी अपुले मन
असून अपुले
का दुःख साही ईतरांचे

न जाणे मन माझे भेद गहिरे
न जाणे स्वप्न माझे कसे सुनहरे
स्वप्न माझे माझेच असुदे
असून माझे
न होई केव्हाही वेगळे

        श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
         shrikrishnas@gmail.com
 

Permalink No Comments

कोचऱ्याची लिलू

November 14, 2007 at 1:22 am (लेख)

 कोचऱ्याची लिलू
दुपारी अकराची वेळ असावी.मी चर्चगेट वरून फौन्टनच्या
दिशेने जात होतो. वाटेत हायकोर्टच्या फुटपाथकडे वळलो असेन,एकदम एक व्यक्ती अचानक सामोरी आली.
“अरे तू मला ओळखलं नाहीस? मी लिलू कोचरेकर”असं म्हणून ती ज्यावेळी हंसली,त्याबरोबर मला तिची ओळख पटली.तिच्या अंगातला काळा कोट आणि ती गळ्यातली सफेद वकिली कॉलर, हातातली ब्रिफकेस बघून मी तिला म्हाणालो “अगं तू वकील केव्हां झालीस ?”
“असं काय तुला माहितच नाही काय ? मी आता गेली दहा वर्ष हायकोर्टमधे केसीस चालवते”
कोचऱ्याला माझ्या वहिनीच्या माहेरचे कोचरेकर त्यांची ही शेजारीण होती. लहानपणी मी वहिनीबरोबर तिच्या माहेरी जात असे.
तिथून माझी ह्या कोचरेकर मंडळीशी ओळख होती.
“ये रे माझ्या घरी कधीतरी week end ला” लिलू म्हणाली. “पुढच्याच week end ला ये,Father’s day आहे नाही का? ” मी हो म्हटलं आणि मी तिला”बरंय” म्हणून पुढच्या कामाला गेलो.
ती गिरगांवात राहात होती.तिने मला तिचा पत्ता पण दिला. त्यादिवशी  मी जेव्हा तिच्या घरी गेलो तेव्हा घरी तिची मुलगी होती. नवरा फिरतीवर दिल्लीला गेला होता.
लिलूने अनंताश्रमातून दुपारच्या जेवणाची order दिली होती.मला काय आवडतं ते तिला माहित होतं.तिसऱ्याचं सुकं,बांगड्याचं तिखलं, पापलेटची आमटी, तळलेली सरंग्याची कापं, आणि लाल सोलाची सोलकढी एव्ह्यडे जिन्नस होते.भात मात्र घरीच केला होता,मला मास्यांचे जेवण असताना भात खूप लागतो हे पण तिच्या लक्षात होतं.”सगळं जेवण तयार आहे ,दोन वाजता जेवूया” ती म्हणाली.आणि कप,कप चहावर आमच्या जुन्या आठवणी काढून गजाली (गोष्टी) चालू झाल्या.”आईवडील कसे आहेत ?”

हया माझ्या प्रश्नावर तिनेच सुरवात केली ती संपेपर्यंत जेवण केव्हा झालं आणि बाहेर अंधार केव्हां झाला हे आंम्हाला कळलंच नाही.
माझ्या प्रश्नाचे उत्तर देताना ती बोलत होती, आणि मी फक्त ऐकत होतो.
Father’s day असल्याने तिने वडिलांचाच विषय चालू केला.
“माझ्या पन्नांसाव्या जन्मदिवशी माझ्या वडिलानी मला एक अजोड किंमतीची भेट देउन गेले.ते त्याच दिवशी वारले रे”
“त्यांच्या मरणशैयेवरून मला त्यानी माझ्या आयुष्याचा एक अनमोल धडा शिकवून गेले.त्यांच्या ८६ व्या जन्मदिवसाच्या तीन आठवडे आधी त्यांना रक्ताचा कॅन्सर झाल्याचे डॉक्टरनी आम्हाला सांगितलं.तीन आठवड्यानंतर ते गेले.आता पर्यंतच्या आयुष्याच्या वागण्याच्या त्यांच्यापद्धतीनुसार, ह्याही गोष्टीचा जणू ताबा घेउन त्यांच्या ईच्छेप्रमाणे ते गेले.उरलेल्या आम्हा सर्वांच्या ईच्छेप्रमाणे ते घरीच गेले.
त्याच प्रसंगी मी माझ्या आईवडीलांच्या खोलीत बसले असता त्यांच्या उभ्या आयुष्याचा मागोवा मी घेत असल्याचे जाणवून किती कणखर आणि किती यशस्वी त्यांचं आयुष्य होते, हे मी त्यांचं मुल म्हणून माझ्या लक्षांत आलं.
माझ्या वडिलानी आपल्या बायको आणि आम्हा तीन मुलांची काळजी घेण्यासाठी तत्परतेने प्रयत्न करीत असताना, ईतर सगळ्या जवळच्याना दुखवले होते. त्यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी, त्यांच्या खोलीत दुखावलेल्या जवळच्यांची लागलेली रीघ बघून, जणू विमान अपघात होवून खाली पडलेल्या सांगाड्याकडे पहात असलेल्या, वाचलेल्या प्रवाशासारखी  माझी दैना झाली होती.

माझे वडील एक नामांकीत लेखक,असून माझे डोळे दिपून जातील एव्हडे चातुर्यवान,अत्यंत दयाळू आणि बुद्धिमान असून सुद्धा त्यांच्यात एक खोट होती, हे मला कित्येक वर्षापासून माहीत होतं.त्यानी त्यांच्या नेहमीच्या हताश मनस्थीतून निर्माण होण्याऱ्या उद्वेगावर (रागावर),कसलीच डॉक्टरी मदत घेतली नाही.त्याना असे निक्षून सांगण्याचे कुणालाही धारीष्ट झालं नाही कीे,”वेळीच मदत घ्या अथवा कुटुंबाला मुकाल. “

त्यांच्या मृत्युशय्येवरून त्यांनी मला जी गोष्ट शिकवली ती ते वडीलधारक असूनही शिकू शकले नाहीत.कुटुंबियांशी प्रेमळपणे राहायचं असेल तर स्वतःच्या तृटीशी अणि स्वतःच्या चुकांशी दोन हात केल्याविना गत्यंतर नाही.”

हे सर्व ऐकत असता चवदार मासे केव्हा फस्त झाले हे कळलंच नाही.जेवण संपल्यावर हात धूउन उठल्यावर लिलूने सर्व आवरून घेउन मसालेदार पान माझ्या हातात आणून दिलं.मासे खाल्यावर मला पान लागतं ते पण तिला आठवलं.
“मी माझ्या वडिलावर अत्यंत प्रेम केलं.मी सहा वर्षाची असताना पहिली गोष्ट लिहीली कारण ते माझे गुरू होते म्हणून.मी भावंडात शेंडेफळ असल्याने बरेच वेळा मला त्यानी फुरसद दिली,विनोदी वृत्तीने राहीले आणि बुद्धिपुरस्सर धडे दिले, हे सर्व ते माझ्या मोठ्या भावंडाना देऊ शकले नाहीत.

आमच्या घराल्या ह्या पद्धतीला “कोकणी वृती “असं गमंतीने म्हटलं जाई.माझ्या वडीलांच्या रागाचे वादळ शांत झाल्यावर, आमची आई आश्वासन देउन म्हणायची “मी खात्रीने सांगते ते रागाबरोबर बोलले जरी, तरी त्यांचे तुमच्यावर अत्यंत प्रेम आहे”
एकदा त्यांचा आरडाओरडीचा ओघ कमी कमी झाल्यावर ते मंद्र्सप्तकात आवाज आणून हळू हळू पश्चातापाने दिलासा देत देत पुन्हा असं न होण्याचा जणू आश्वासानच देत असत.खूप वर्षानंतर मला समज येउन खरं वाटू लागलं की, माझे वडील एक उपचार न झालेले रागीष्टविकारी असून, त्यांचा अविचारी राग आणि चांगली मनसथिती ह्याचं दोलायमान आमच्या आईच्या आणि आम्हा तीन मुलांच्या मनाची स्थितीची, चलबिचलते मुळे चाळण व्हायची,आणि त्यांच्या अनिश्चीत रागीटपणामुळे ती स्थिती मनासिक धक्क्यात परिवर्तीत व्हायची.”

दुपारचे चार वाजले.लिलूने आपली कथा जरा आवरती घेउन मला म्हणाली “तू खरोखरच बोर झाला असणार,मी थोडा चहा करते” असे म्हणून ती चहा करायला गेली,आणि मला पण बाथरूममधे जाउन fresh व्हायची संधी मिळाली.
चहाचा कप पुढे करीत ती म्हणाली “मी कुठे थांबली होते?हां,हां लक्षात आलं “असं म्हणून मी उत्तर देण्यापुर्वीच तिने पुढे सुरवात केली. ” रागीष्टविकारी” असे मी त्याना मघाशी म्हणाले त्याचा

अर्थ ते जसा एखादा, रागाच्याभारात violent होवून खिडक्यांच्या कांचा फोडतो तसे काहिही करीत नव्हते.एखादी माझ्या वडीलांसारखी व्यक्ति जिच्या वागण्याची परिणीती  रोजच्या अडचणी आणि हताश परिस्थिती पाहून, उद्बेग करण्यात आणि माथेफीरू होण्यात आपोआप होते,तेव्हा अशा व्यक्तिला मनोवैज्ञानीक “dry drunks” अशा सज्ञेत वर्णन करतात.पुष्कळदा बाहेरच्या जगात असे लोक आपला राग आणि चीडखोरपणा आवरून घेतात,परंतु घरच्या चार भिंतीत मात्र ते उचंबळून येतात.उलट अर्थी माझे वडील खऱ्या संकटकाळी क्वचीतच तोंडाळपणा करीत.पण ते केव्हा फिरतील हे आम्हा घरच्या मंडळीना सांगणं कठीण व्हायचं.अगदी जसं एखाद्दया दारू पिणाऱ्याच्या घरच्या मंडळीना, सामोरे केव्हा जावं लागेल हे समजत नाही तसं.आणि म्हणून घरचे आम्ही सतत नवीन संकटाचे तुफान न येण्यासाठी सतर्क राहून त्यांना उददिपन होईल असे कारण देत नसू.

आमच्या घरात आम्ही चलबीचल स्थितित असणे हे आम्ही ओघानेच शिकलो होतो.जस जशी मी वयाने वाढत गेले तस तशी ह्या संवयीतून, सुटका करण्यासाठी मी माझ्या असल्या स्वभावाच्या वडीलांबद्दल ठार प्रामाणिक असायची.त्यामुळे त्यांच्या तावडीतून सुटका झाली तरी, त्यांच्या रागीष्टपणामुळे संकटाला तोंड द्दयायला मी असमर्थ झाली. आणि हे सगळं त्या तीन आठवडे त्यांच्या
मृत्युशैयेवर असताना माझ्या त्यांच्या सहवासात राहीलेल्या अनुभवाच्या सत्यतेची जाणीव होई तोपर्यंत असमर्थ होते.

माझ्या थोड्याश्याच जवळच्यानी त्यांच्या डोळ्यानी टीपलेले त्या प्रसंगाचे सत्य जणू, मला सांगत होते की उपचार न झालेला ह्या माझ्या वडीलांचा रागीष्ट विकाराने, घरातल्या ईतर सर्वांवर भावनीक आघात नव्हे तर शारिरीक आघात सुद्धा होऊन, त्या सर्वांच्या मनाला लूळं करून टाकलं आहे.
आमची आई, माझ्या वडीलांची विश्वासू पत्नी,मानसिक आघाताच्या ओझ्याखाली झालेल्या मूळ कारणानी,  आतापावेतो अगणित शारिरीक विकृत्यानी अंथरूणाला खिळली होती.तिच्या जवळ जवळ पुऱ्या तरूण वयातलं जीवन तिने त्यांचा सततचा चीडचीडेपणा आणि बोंबाटून टाकलेल्या, आवाजाची ओरड आणि टिका झेलीत घालवलं होतं.हे दृश्य अचल असायचं.मानहानीची तिच्यावर खैरात
करून झाल्यावर,आपल्या कमकुवतेची ते तिला कबुली देत,दयेचा आणि भेटींचा जणू पाऊस पाडीत,आई त्यांना चुचकारून समजावी आणि मोठया मनाने समजून घेई.हिच त्यांची एकमेकावर प्रेम करण्याची रीत असायची.”

लिलूच्या लक्षात आलं की sweet dish म्हणून तिने ताजे बेसनचे लाडू माझ्यासाठी केले होते मला हे लाडू आवडतात हे पण तिच्या आठवणीत होतं.
“अरे मी माझी ही कर्मकथा सांगता सांगता बेसनचे ताजे लाडू तुझ्यासाठी केलेत ते द्दयायला विसरले बघ.कप कप चहापण करते” असे म्हणून ती आत गेली.

माझी स्थिती “आंधळा मागतो…..” अशी झाली.जरा पाय मोकळे करण्यासाठी तोवर उठून गॅलरीत fresh हवा घेण्यासाठी म्हणून गेलो.गरम गरम चहा आणि पिवळे जर्द बेसनचे चार लाडू घेऊन लिलू बाहेर आली.आणि पुढ्चे कथानक तिने चालू केलं.
” वय वाढत जाता जाता माझ्या आईचे स्नायू आणि पोट जणू गाठावले होते.डॉक्टर म्हणाले, stess मुळे तिने हळू हळू मृत्युची वाट धरली आहे.माझा भाऊपण मधुमेयाने आणि parkinson disease मुळे अपंगावस्तेत होता.परंतु,मला जे आठवतं त्यानुसार तो भावनिक अपंग होता आणि स्वतःबद्दल आत्मविश्वास गमवल्यामुळे पंगु झाला होता.जर का जीवन हे एक lottery आहे असं समजल्यास, माझ्या भावाजवळ बक्षिस न मिळणारं तिकीट होतं.
माझा भाऊ माझ्या वडीलांची स्वप्नपुर्ती करायला असम्रर्थ ठरला.  त्यांचं त्याच्यावर खूप प्रेम होतं.पण प्रेमाचा त्यांचा अर्थ सतत एखाद्दयाच्या मागे लागणं!आणि त्यामुळे त्याचा शेवट स्वतःला कमी लेखण्यात झाला.त्याच कधी लग्न झालं नाही, नाही तो आयुष्यात काही बनू शकला,आणि शेवटी वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी, एक अपंग म्हणून एका नर्सिंग होममधे जीवन कंठीत होता.

माझ्या भावाच्या तुलनेत माझी मोठी बहिण त्यामानाने एक सुखी जीवन जगत होती.पण त्याचं कारण ती माझ्या वडीलांपासून दूर होती. जवळ जवळ तिचे त्यांच्याशी संबंधच तुटले होते.त्यामुळे त्यांच्या शेवटच्यादिवसात तिन मुलांपैकी एकच मुल (मी) त्यांच्या जवळहजर होतं.

जसजसं माझे वडील अगणित मानसिक आणि शारिरीक वेदनेतून मृत्युच्या दिशेने प्रवासास लागले होते,तसतसं माझ्या मनात वरचेवर डोकावणारा एक विचार उचल खात होता.तो म्हणजे हा त्यांचा दुःखित अंत, स्वतःच्या आणि ईतरांच्या जीविताला निष्फळ करून आणि हानी देऊन, जात असताना माझ्या वडीलाना वेळीच उपचार मिळाले असते, तर हे स्रर्व टाळता आलं असतं.

अगदी अलिकडे अलिकडे समाजाने दारू पिणाऱ्या व्यसनी व्यक्तिंची जोरात पसरणारी समस्या असल्याचे स्विकारून, ती त्यालाच नाही तर त्याच्या कुटुंबियाना पण खाईत लोटू शकते, असे मत केले आहे.आणि त्या व्यक्तीला उपचार करून बरं करता येतं हे पण मानलं आहे. त्याशिवाय संस्था पण अस्तितवात आहेत, की ज्या ह्या समस्येचा अभ्यास करून कुटुंबे दोन हात करून कसं सईसलामत सोडवणूक करून घ्यायचं हे पण शिकली आहेत,परंतु रागीष्टपणाच्या विकारावर असले काही उपाय अजून प्राप्त झालेले नाहीत.उलट हा रागीष्टपणा म्हणजे एक व्यक्तिगत स्वाभाविक दर्गूण आहे, असं समजून उघड पणे बाजूला सारून, त्याची परिणीती अन्यायात होत असावी, अशा निष्कर्षाला आणलं आहे.

खूप उशीर झाल्याने मी लिलूची रजा घेतली,पण” उरलेली तुझी कथा ऐकण्यास पुढच्या आठवड्यात नक्की येतो” असे आश्वासन देऊन मी तिला हिरमुसली करून जात आहे हे लक्षात आल्यावर “तुझ्या कथेचा शेवट कसा झाला आणि यातून काही तरी चांगलं नक्कीच ऐकायला मिळणार” असा आशावाद ठेवून मी घरी परतलो.

पुढच्या weekend ला मी तिला फोन करून सांगितलं की मी संध्याकाळी चहाच्यावेळी येईन.आणि त्याप्रमाणे मी तिला भेटलो. मला पाहून तिचा चेहरा खूपच आनंदी दिसला.कदाचित माझ्या येण्याने तिला मी आनंदी करू शकलो ह्याने मला फार बरं वाटलं.ईकड्च्या तिकडच्या गप्पा झाल्यावर,ती मुळ पदावर आली. मला म्हणाली” शाब्दिक मार जखमेच्या खूणा दाखवित नाही.झालेले नुकसान अद्रुश्य असतं.जर का शारिरीक नुकसान झालं नसेल तर डॉक्टरपण मुद्दाम म्हणून लक्ष घालीत नाहीत,जोपर्यंत रुग्ण त्याची मदत मागत नाही तोपर्यंत.खूपदा मी आणि माझी आई माझ्या
वडीलाना तपासून घ्या म्हणून मागे लागत असू,पण त्यानी कधीही त्या म्हणण्याला भिक घातली नाही.

एकदा आमच्या डॉक्टरने आम्हाला असं सांगितलं की आमच्या आईची प्रकृती दिवसे दिवस खालावत जाण्याचे कारण मुख्यतः आमच्या वडीलांचा तिच्यावर होणारा शाब्दिक अत्याचार हा आहे.आणि जेव्हा आम्ही त्यांना, वडीलाना उपचार देण्याची विनंती केली,त्यावर त्यानी हा उतार वयातला प्रॉब्लेम असून ते स्वतः त्यांच्याकडे तपासायला आल्याशिवाय उपचार करणे शक्य होणार नाही असं म्हणाले.
गेल्या वर्षभरात मी मनोवैदज्ञानीक तज्ञाना भेटून वडीलाना
उपचार देण्याचा प्रयत्न केला.हा काही असंभवनीय विकार नाही असं बऱ्याच तज्ञाचं मत होतं.शब्दिक अत्याचार हा शारिरीक अत्याचारापेक्षा  गंभीर असून त्याचे दूरवर परिणाम होतात.”

परत एकदा चहा करण्याच्या कारणानी लिलू उठली आणि तो घेउन, आल्यावर पुढे म्हणाली ते मला खूपच धक्कादायक वाटलं.”माझे वडील निर्वतल्या नंतर तीन महिन्यानी माझी आई गेली.मी ईच्छित होते की निदान ते गेल्यानंतर तरी शाब्दिक अत्याचाराविना ती उरलेले आयुष्य आनंदात घालविल, हे माझे फक्त मनोरथच ठरले.”
” ६३ वर्षांचं त्या दोघांचं आयुष्य एकमेकाशी कमालीचं गुंतलेलं होतं.अगदी तसंच माझ्या भावाचं भविष्य पण.
माझ्या वडीलांच्या पहिल्या डेथ ऍनिव्हर्सरी नंतर अवघ्या पांच दिवसानी माझा भाऊ गेला.
माझ्या वडीलानी त्यांच्या पश्चात एक संपन्न पायंडा मला ठेऊन गेले.धड्यांचे भांडार की जे माझ्या अर्ध्या उरलेल्याआयुष्यासाठी उपयोगी पडावं.

वर्षापूर्वी मी आईवडीलांच्या खोलीत बसले असताना एक संकल्प ठरवून ठेवला. काही लागेल ते लागो ह्या पुढे असा प्रकार माझ्या पिढीत किंवा माझ्या नंतरच्या पिढीत तरी रीपीट होऊ नये.गेलं अख्खं वर्ष मी आमच्या या कुटुंबात आलेल्या ह्या चमत्कारीत पर्वा बद्दल खूप विचार करून मी अशा निर्णयाला आली, की असल्या पर्वाने जर सर्वांना त्रास होत असेल तर ताबडतोब उपचार केल्याशिवाय तरणोपाय नाही.एकदा एका मनोवैज्ञानीकाला माझ्या आई,वडिल आणि भावाचे फोटो दाखवले ते पाहून तो पटकन म्हणाला ह्यांच्या कुणाच्याच तोंडावर हंसं नाही. ते सर्व दिसतात depressed,depressed आणि depressed.
आता पर्यंत तिची ही सर्व कथा निपूटपणे एकून घेत असता कुठेही तिला मी अटकळ केली नाही,हे लक्षात आल्यावर लिलू मला म्हणाली” हे सर्व ऐकून तुझ्या मनात एखादा प्रश्न आला असेलच अशी मी अपेक्षा करते.”

त्यावर मी म्हणालो हो “मला एकच प्रश्न आहे आणि तो म्हणजे झालं ते झालं आता पुढे काय? “
हे ऐकून तिला खूपच गहिवरून आलं.

डोळ्यात पाणी आणून म्हणाली ” मी मेल्यावर माझ्या कुटुंबाचा आलबम पाहून निराळीच गोष्ट लक्षात आली पाहीजे, ती अशी की माझी मुलगी त्या आलबमची पाने परतताना त्यातून, हे लक्षात यायला हवं की माझ्या मुलीने एक खंबीर आणि आनंदायी जीवन भोगलं आणि फोटोत आमच्या स्रर्वांच्या चेहऱ्यावर हंसं,हंसं अणि हंसंच दिसावं”

हे तिचे शेवटचे उद्गार ऐकून झाल्यावर मी उठलो आणि
विषष्ण न होता आनंदी मनाने तिचा निरोप घेतला.

      श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
        shrikrishnas@gmail.com 
  
 
 
 

Permalink No Comments

ते नेत्रांनी गमवलंय

November 12, 2007 at 5:01 pm (अनुवादीत)

ते नेत्राने गमवलंय

भंग स्वपनाने  एक शिकवलंय
मनाने जे वरलंय 
ते नेत्राने गमवलंय
भंग स्वपनाने हे एकच शिकवलंय

शोधून,शोधून सुद्धा जे मिळतं
ते मिळल्यासारखे नसतं
माझा तूं मनस्वी  असून
रुसवा कां कुणाष्टाऊक
काय मनात होतं
अन
काय प्रत्यक्षात झालं
भंग स्वपनाने  एक शिकवलंय
मनाने जे वरलंय 
ते नेत्राने गमवलंय

दूरवर दिलेली माझी हांक
ताऱ्याना आपटून
परत आली
भंगलेल्या माझ्या दुनियेच्या
एकाकी असलेल्या किनाऱ्यावरून
परत आली
पण आता हे तडपणं पण
कुचकामी झालंय
भंग स्वपनाने एक शिकवलंय
मनाने जे वरलंय 
ते नेत्राने गमवलंय

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
              shrikrishnas@gmail.com

Permalink No Comments

« Previous entries