जीवनाची फुलबाग करावी

January 31, 2008 at 5:15 pm (अनुवादीत)

जीवनाची फुलबाग करावी

मनाशी मन मिळवून प्रीती करावी
काही सुखदायी प्रतीज्ञा करावी

लज्जा कसली भिती कसली
जगण्या पुर्वी मरणे कसले
लांबच लांब सांवल्या पाहून
आनंदी आनंद भोवताली पाहून
जीवनाची फुलबाग करावी

सुखे येती सुखे जाती
उभी राहाती दुःखे सामोरी
आशा झाल्या एकाकी
सांगु पाहे जिंदगी
उमेद प्रजोलित करावी

विसरून जावे मनातून
अपमानाचे शल्य
एकांताला स्वर्ग करावे
तीव्र ईच्छा सफल समयी
खूष मनाला साथ द्दयावी
जीवनाची फुलबाग करावी

   श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
    shrikrishnas@gmail.com

Permalink No Comments

रिम झिम पाऊस पडतोय

January 29, 2008 at 5:11 pm (अनुवादीत)

रिम झिम पाऊस पडतोय
रिम झिम पाऊस पडतोय
मन माझे उचंबळून येतय
परीसर सगळा भिजून गेलाय
मग दाह कसला होतोय

असाच सदा मेघ बरसला
असाच तुझा पदर भिजला
आजच सजणे माझे मन
असे का उचंबळतय

ह्याचवेळी दाह पावसाचा
ऋतु आहे कडक थंडीचा
वारा प्यालेल्या तुफानाचा
परीसर सगळा भिजून गेलाय
मग दाह कसला होतोय

थेंबामधूनी घुंघुर वाजती
आशा अपुल्या फोल होती
नयन पाहती स्वप्ने कसली
आजच सजणे माझे मन
असे का उचंबळतय
      श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
       shrikrishnas@gmail.com
 

Permalink No Comments

बोलेन तर ऐकवीशी दुषण तुझे

January 28, 2008 at 12:45 am (अनुवादीत)

बोलेन तर ऐकवीशी दुषण तुझे

येती आशा उफाळून उरामधे
वसे छाया उदासीची नजरेमधे
कुठे घेवून आलो नशिब माझे
होतो मी तुझ्या दुनियेमधे
बोलेन तर ऐकवीशी दुषण तुझे

नयनी माझ्या आंसवे येती
असती माझ्या दुःखाचे साथी
मन ही नाही नाही आशा मनात
आहे फक्त मी अन माझा एकांत

नसे कसली नाराजी तुझ्याशी
अन दुराग्रह तुझ्या दुनियेशी
दिसू लागे मंझील नजरेला
लागे ठोकर माझ्या नशिबाला

असा दाह माझ्या मनी होई
जगु ना दे ना मरु देई
अबोल राहून जळे मन माझे
बोलेन तर ऐकवीशी दुषण तुझे

    श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
    shrikrishnas@gmail.com
 

Permalink No Comments

लळा जिव्हाळा शब्दच मोठे

January 26, 2008 at 6:02 pm (कविता)

लळा जिव्हाळा शब्दच मोठे

(लळा जिव्हाळा शब्दच खोटे
कोण कुणाचे नाही
राजा
कोण कुणाचे नाही)

ह्या ऐवजी
लळा जिव्हाळा शब्दच मोठे
कोण कुणासाठी जगते
राजा
कोण कुणासाठी जगते

पिसे,सनतडी.काड्या जमवी
चिमणी बांधी कोटे
दाणा,दाणा आणून जगवी
जीव कोवळे छोटे
चिमणा उचलूनी नेई बाळा
जगविण्या साठी त्याते
कोण कुणासाठी जगते
राजा
कोण कुणासाठी जगते

रक्तहि सगळे नसते
असू शकते माया
कोण कुणाचे नसून ही
अंतरी असते दया
सांगायाची नाती नसेतना
प्रेम कुठे जाते
कोण कुणासाठी जगते
राजा
कोण कुणासाठी जगते

माणुस सुद्धा प्रेम करतो
समजून दुसरा अपुला
दुसरा ओळखी उपकाराते
देई सर्वस्व त्याला
कोण कुणाचा जोडू
पाहतो या जगती नाते
लळा जिव्हाळा शब्दच मोठे
कोण कुणासाठी जगते
राजा
कोण कुणासाठी जगते

       श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
    shrikrishnas@gmail.com

Permalink No Comments

“लाख चूका असतील केल्या”

January 25, 2008 at 2:00 am (व्यक्ती आणि वल्ली)

“लाख चूका असतील केल्या”

हे गृहस्थ आमचे शेजारी.शिरोडे गावाला जाताना नदी काठी एक टांक नावाचं छोटंस गांव आहे.भाऊ टांककार त्या गांवचे. आमच्या घराच्या बाजुला त्यांचे वखारवजा घर होतं. चांगलं चिरेबंदी भिंतीचं, पुढचा भाग माल ठेवण्यासाठी जरुरी पेक्षा जास्त उंच आणि ऐसपैस, आणि त्याच्या मागे पांच,सहा खोल्या आणि मागे मोठे पोरस,त्यात चार पाच माडाची फळ देणारी झाडं,मधेच एक खोल विहीर एक उंच सोनचाफ्याचं झाड,आणि कपडे धुण्यासाठी जागोजागी,ढोण्या (कपडे धुण्यासाठी सिमेंटची बनवलेली टाकी)होत्या. विहीरीतून भरपून पाणी मिळत असल्याने ह्या ढोणीत पाणी घालून एकावेळी खूप कपडे धुता येतात.

अशा ह्या घरात पुढच्या भागात भाऊंची पेढी (ऑफीस) सजवली होती.दोन तीन कारकून असल्याने त्यावेळी प्रचारात असलेली ठरावीक पद्धतची पेढीची सजावट असायची.बैठक मारून खाली गादीवर बसायचं,त्यावर सफेद रंगाचं कव्हर,मागे टेकण्यासाठी लोड म्हणून सिलींडरच्या आकाराची गादी आणि त्याच्यावर तसेच सफेद कपड्याचं कव्हर आणि समोर लिहायाला सुखकर होईल असे चार पायाचे स्टूल (टेबल), त्याचा टॉप उघडल्यावर आत व्यवहाराची पुस्तके (चोपड्या),लाल आणि निळ्या शाईच्या बाटल्या (दौती), लिहीण्यासाठी टाक (पेन) आणि कागदावर लिहून झाल्यावर शाई वाळण्यासाठी वाळू.  ही वाळू हाताच्या चिमटीत घेवून ओल्या अक्षरावर पिंजरल्यावर काही वेळाने ती कागदावरून झटूकन टाकल्यावर शाई पसरत नसायची. ही झाली पेढीची सजावट.

भाऊंची स्वतःची बैठक वेगळी असायची.त्या जागी ते स्वतः क्वचितच बसायचे.बॅंकेतून पैसे आणून ते आपल्या ह्या बैठकीच्या त्यांच्या पेटीत ठेवायचे.त्याला कुलूप लावून त्याची चावी एका रिंगमधे ओवून त्याची सांखळी एका बोटांत गरगर गरगर फिरवत सगळीकडे फिरत रहायची त्यांचीच एक स्टाईल होती.
वामनमूर्ती भाऊ अंगात झूळ्झूळीत मलमलची पैरण खाली मसराईजचे सफेद शुभ्र धोतर,गळ्यात दोन पदरी सोन्याची चेन, छातीवरचे दाट केस दिसतील अश्यातऱ्हेने पैरणीची बटणे उघडी ठेवायचे,तोंड पान खावून पुरं लाल झालेलं, डोक्यावर विरळ असे केस आणि एका हातात तपकरीची चांदीची डबी,पायात कोल्हापूरी चप्पल,आणि नाकातून बोलल्या सारख्या आवाजाने गडी नोकराकडून सर्व कामं करून घ्यायचे.

बेळगांव,कोल्ह्यापूर,गोवा,मुंबईवरून गांवात लागणारा माल भाऊ, घावूक मागवायचे.गावातले लोक फूटकळ घेवून विकायचे.भाऊंचा धंदा चांगल्यापैकी चालायचा.भाऊची घरातली मंडळीत एक मुलगी, बायको आणि म्हातारी आई.
भाऊंची बायको घाटावरच्या एका श्रीमंत गृहस्थाची मुलगी होती.तिला गावातली मालवणी भाषा येत नसे,म्हणून भाऊ तिच्याशी शुद्ध मराठीत बोलत असत.बाकीच्याशी व्यवहार मालवणीतून चालायचा. भाऊंच्या धंद्दयात त्यांच्या बायकोच्या माहेरहून आर्थिक मदत झाली होती.

सकाळची आंघोळ पांघोळ पुज्या आरच्या झाल्यावर भाऊंची एक खेप मार्केट मधे जाण्यात जात असे.बाकी तोच ड्रेस फक्त डोक्यावर सफेद गांधी टोपी चढवली झालं.हातात नोटांच पुडकं घेवून जायचे. दुपारच्या जेवणाला लागणारा भाजी बाजार, आवडेल ती वस्तु घेण्यात आणि त्याची दरखोरी न करता,विकत घेण्यात त्याना विशेष वाटायचं. बाजारात बरोबर नेलेल्या गड्याबरोबर भाऊ भाजीची पिशवी पाठवून द्दयायचे आणि आजुबजुच्या ईतर व्यापाऱ्याबरोबर थोडावेळ गप्पागोष्टी मारून परत पेढीवर येवून बसायचे.

भाऊंचा धंदा चांगलाच दम बसलेला असल्याने त्याना गिऱ्हाईकाची वाट बघत बसायची जरुरी भासत नव्हती. आलेली कॅश आपल्या पेटीत जमा करून दुपारच्या बारा वाजण्यापुर्वी कॅनरा बॅंकेत जावून स्वतः जमा करायचे. ह्या बाबतीत त्यांचा नोकरावर विश्वास नव्हता. आणि दुसरे म्हणजे तिथून ते तडक मासळी बाजाराची वाट धरायचे. भाऊंना जेवताना मासे नसतील तर घांस तोंडात जात नसे.

मासळी बाजारात भाऊ मासे विकणाऱ्या कोळणीत चांगलेच प्रसिद्ध होते.त्याचं कारण असं की कोळीण सांगेल ते दाम देवून भाऊ मासे विकत घ्यायचे.भाऊंना कोळणी पण बाजारभावापक्षा पाच दहा रुपये जास्त भाव सांगत असत. त्यामुळे भाऊ बाजारात दिसताच कोळणींचा हा आरडाओरड व्हायचा.”रे भाऊ, हयसर ये मरे,बघ तुझ्यासाठी ताजो सरंगो ठेवलसंय,बर्फातलो नाय ” असं म्हणून आपला तेव्हडा सरंगा ताजा दुसऱ्यांकडे जावू नकोस असं भाऊंवर इंप्रेशन मारण्याचा प्रयत्न होत असे.पण भाऊ करायचं तेच करायचे. सरंगा आणि बांगडे गड्याबरोबर घरी पाठवून द्दयायचेआणि साधारण दोन वाजायच्या दरम्यान घरी जेवायला यायचे. सरंग्याची आमटी, बांगड्याचं तिरफळं घालून केलेलं तिखलं, तळलेले सरंग्याची कापं आणि जिरेसाळ भात असलं जेवणाचं सागरसंगीत झाल्यावर झोप कुणाला येणार नाही?
संध्याकाळचा चहा आणि बेकरीतली ताजी “भिस्कुटं” खावून झाल्यावर समोरच्या कल्पना मेडिकल स्टोव्हरच्या मालकाबरोबर गोष्टी रंगायच्या,त्यावेळी तिथे नियमाने, साफळे फौजदार,वैनतेयचे संपादक बापट,डॉक्टर वसंत पंडीत, निष्णात वकील निळकंठराव पुनाळेकर वगैरे बडीमोठी मंडळी संध्याकाळच्या अड्ड्यावर येवून जगातल्या सर्व विषयावर चर्चा व्हायची. संध्याकाळ लोटल्यावर पेढीचे व्यवहार जरा मंद व्हायचे. भाऊंच्या पेढीत पेट्रोमॅक्सची बत्ती पेटली की समजावं रात्र झाली.नऊ वाजता पेढी बंद झाल्यावर भाऊ रात्री थोडसंच खाऊन झोपायचे.

नंतर बरोबर रात्री दोन वाजायच्या सुमारास भाऊ उठायचे. रात्रीचे जोरजोरात खाकरून तोंड धुण्याचा आवाज झाल्यावर भाऊ उठल्याचे समजायचे.एक ग्लास पाणी पिऊन झाल्यावर नेहमीचेच कपडे करून डोक्यावर गांधी टोपी चढवून कंदील पेटवून सायकलला टांगायचे आणि कुत्रे मागे लागू नयेत म्हणून एक छोटीसी काठी जवळ ठेवून सरळ तुळस गांवाच्या दिशेने कूच करायचे.
बायजा नांवाची भाऊंची ठेवलेली बाई एका लहानश्या घरात राहायची.तिला एक छोटी मुलगी पण होती.भाऊ बायजाकडे पहाटे पर्यंत वेळ घालवायचे.हा त्यांचा आज कित्यक वर्षाचा रिवाज असायचा.उजाडल्यावर भाऊ आपल्या घरी परत यायचे.भाऊंच्या बायकोला हा त्यांचा संबंध माहित होता.पण ती बिचारी काहीही करू शकत नव्हती,फक्त हल्ली म्हणे तिने त्यांचाशी संबंध सोडला होता. जगाच्या लाजे करीता ती मान खाली घालून जीवन जगत होती.

आतापावेतो पुलाखालून खूप पाणी वाहून गेलं होतं.भाऊंच्या एकच एक मुलीचं लग्न झालं,भाऊनी बायजाच्या मुलीचं पण लग्न लावून दिलं होतं.बायजा पण आता थकली होती. भाउंचा पण पुर्वीचा दम खचला होता.अलिकडे ते बायजाकडे जायचे पण बंद झाले होते.तुळस गांवाला रात्री दोनला  उठून सायकलेने जायला त्याना जमत नव्ह्तं. भाऊंची म्हातारी आई अलिकडेच निर्वतली होती.पेढीचे व्यवहार आता त्यांचा जांवई पाहत होता.बाजाराचे सर्व व्यवहार आता गडी नोकर पहात होते.भाऊना हात धरून घरातून पेढीवर आणून बसवावं लागत होतं.

मधून मधून भाऊ आपल्या जीवनाचा आढावा घेण्यात वेळ घालवीत. आपल्या आप्पल-पोट्या जीवना पलिकडे त्यानी दुसरं काही पाहिलं नव्हतं,त्याचा त्यांना खंत होत होता.एक दिवस भाऊना पऱ्यालिसीसचा ऍटॅक आला. सर्व कारभार संपला असं त्यांच्या लक्षात आलं.शेवटी बायजा उपयोगी पडली नाही.त्यांच्या बायकोनेच त्यांची सेवा केली.ते त्यांच्या लक्षात पण आलं असणार.

“लाख चुका असतील केल्या
केली पण प्रीती”
हे गाणं त्याना किती लागू होतं देव जाणे.

     श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
     shrikrishnas@gmail.com
 

Permalink 1 Comment

प्रीती नसे सर्वस्व जीवनासाठी

January 23, 2008 at 4:10 am (अनुवादीत)

प्रीती नसे सर्वस्व जीवनासाठी

सोडशी सारी दुनिया कुणासाठी
शक्य नसे ही कृती प्रत्येकासाठी
प्रीती शिवाय असती अनेक कामे
प्रीती नसे सर्वस्व जीवनासाठी

न होवो मिलन देहाचे
होवू दे मिलन मनाचे
जवळी नसो बगिचा फुलांचा
येवूदे मंद वारा सुगंधाचा
न मिळो चंद्र जीवनामधे
असुदे प्रकाश मंद ज्योतीमधे

कोमेजल्या कळ्या पाहूनी
दुःख होई
बहरलेल्या फुलाना पाहुनी
चैतन्य येई
उजाडली जरी दुनिया एक
करीशी निर्माण विश्व अनेक
जरी वाटे मनाशी करावा
संसार नेटका
करण्या खुष ईतराना
जाशी तू एकटा

       श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया )
        shrikrishnas@gmail.com
 

Permalink No Comments

रुदन तू का करावे

January 21, 2008 at 7:25 pm (अनुवादीत)

रुदन तू का करावे

कथीली मी माझी कहाणी
परी तुझे नयन का ओले
बेतले संकट माझ्या मनी
परी तुझे नयन का भिजले

दुःख माझ्या अंतरी असावे
तू सहन का करावे
ते असती माझे नयनाश्रू
धार नयनी तुझ्या का असावी
दाह दुःखाचा मी पेटवीला
रुदन तू का करावे

भिजवीले नयन माझे कितीतरी
करणार नाही ओले ते तुझ्यापरी
जपून सारी उमेद माझी
राखीन सारी उमेद तुझी
दुःख तुला तुझ्या अश्रूनी द्दयावे
रुदन तू का करावे

आवरी तूं नयनाश्रू तुझे
ढाळीन अथवा मी अश्रू माझे
डुबवीन चंद्र ताऱ्याना
मी माझ्या आंसवा मधे
सच्चाईने दुनियेतून नष्ट व्हावे
रुदन तूं का करावे

        श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
            shrikrishnas@gmail.com
 

Permalink No Comments

“लाला! मी पास की नापास “

January 20, 2008 at 2:13 am (गोष्ट)

“लाला!  मी पास की नापास? “

लाला हा जन्माने मुसलमान होता असावा.बुटकीशी व्यक्ति,जेमतेम साडेचार फुट उंची,डोक्याला गुंडाळलेली पगडी (मुंडासे),खाली तोटके धोतर,वरती एक सदरा, रस्त्यातून चालताना मोकळे पाय,हातात आधाराला दांडका त्याची उंची थोडी त्याच्यापेक्षा जास्त,तोंड सतत पान खावून लाल दिसणारे,तिच तोंडातली लाल थुंकी दोन्ही बाजुच्या ओठाच्या फटीतून खाली ओघळणारी, मान सतत रस्त्याकडे खाली झुकलेली,चेहऱ्यावर दाढीचे खुंट,अशी ही व्यक्ति वेंगुर्ल्याच्या मेनरोड वरून सकाळी, मध्यांनी आणि तिन्हीसांजा झाल्यावर चालत जाताना हटकून दिसायची.वाटलंतर त्याला जाताना पाहून, दिवसाची घटका कळायला कठीण होत नसे.

वेंगुर्ल्याचे लाल मातीचे त्यावेळचे रस्ते आणि  सतत पानाचा तोबरा लालाच्या तोंडात असल्याने,त्याचे कपडे वर पासून खाली पर्यंत लाल झालेले असायचे.तोंडातून ओघळणारी थुंकी अधून मधून कपड्याला फुसायच्या संवयीमुळेपण, त्याचे कपडे लाल दिसायला भर पडायची.
” जुम्मेके जुम्मे ” न्हाण्याची संवय असल्याने पुढल्या शनिवारी तेव्हडे ते त्याचे कपडे पांढरे शुभ्र दिसायचे.

वेंगुर्ल्याच्या बंदराच्या दिशेने मार्केटच्या अगोदर उजव्या बाजूला डोंगराकडे चढत जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेने अगदी वर गेल्यावर रस्ता संपतो,त्याच्या उजव्या बाजूच्या डोंगराच्या सपाटीवर तांबळेश्वराचं मंदीर आहे. त्याच्या उजव्या बाजूला उतरणीवर गांवाचं स्मशान आहे.ह्या स्मशाना जवळ एका पडक्या झोपडीत लालाचा,
रात्रीचा झोपण्यासाठी मुक्काम असायचा. त्या स्मशानशांततेच्या एकांताच्या परिसरात लाला कसा राहायचा हे, गावातल्या लोकांचे भयभयीत आश्चर्य असायचं.त्यावेळच्या आमच्या लहान वयांत तर लालाला दिवसा रस्त्यावर पाहून देवचार भुताटकीचा प्रतिनिधी असावा असंच वाटायचं.दिवसा प्रेतं जाळायला येणाऱ्या लोकाना लालाची झोपडी रिकामीच दिसायची,आत डोकावून पाहिल्यावर ईतःस्था पडलेली ऍल्युमिनीयमची कळकटलेली भांडी पातेल्या,लोटा आणि सुंभाच्या दांडीवर लटकणारी एकदोन लक्तरं दिसायची.मात्र रात्रीची प्रेतं घेवून येणाऱ्याना रात्री बारा नंतर लाला आत घोरत पडलेला दिसायचा.तो स्मशानाकडे ढुंकूनसुद्धा पहात नसे,असं नियमीत स्मशानयात्रेला जाणारे लोक म्हणायचे.तसंच प्रेत-संस्कार झाल्यावर लोकं निघून गेल्यावर ईकडे तिकडे पडलेले सामानसुमान, कपडेलत्ते पाहून लाला कशालाही हात लावत नसे.

तो निरपेक्ष,निराधार,निस्पृह असावा असं लोकाच मत, त्याच्या विषयी पक्कं झालं होतं.कधी तरी तापाने फणफणला असेल तर ” अल्ला,अल्ला ” असं ओरडल्याचं कुणी तरी ऐकणारे सांगतात ह्या एकाच शब्दावरून लाला मुसलमान असावा अश्या निर्णयाला लोक आले होते.रस्त्यावरून फिरत असताना तसा तो अल्पभाषीच होता. एखाददुसरा शब्द कुणी ऐकला तर तो मराठीत,मालवणीत किंवा “अच्छा ” असा उर्दूत असायचा त्यामुळे रस्त्यावर पहाणारे लोक लालाला मुसलमान संमजायचं की काय समजायचं ह्याच्या संभ्रमात असायंचे.त्याच्या धर्माचा विषय ओघाओघाने पुढे येणारच आहे.

सकाळी खाली गावात आल्यावर थेट तुळसुली गावापर्यंत जवळ जवळ तिन मैल चालत जायचा.मधे एका चहाच्या दुकानात बाहेरच त्याला रतीबाने एक कप चहा आणि बेकरीतला पाव खायाला मिळायचा. खांद्दयावरच्या झोळीत त्याचा एक कप असायचा तसंच एक ऍल्युमिनियमची थाळी आणि एक पांढऱ्या पोरसिलीनची तबकडी,त्यावर निळ्या गर्द रंगाची किनार असायची.दुपारचा मार्केट मधे आल्यावर सांळगावकरांच्या खानावळीच्या बाहेर बसल्यावर डाळ,भात एखादा माशाचा तुकडा आणि आमटी फुकट जेवायला मिळायची,तसंच बुधवारी आणि रविवारी मयेकरांच्या हॉटेलातून बशीभर मटण आणि दोन पाव दुपारचे मिळायचे.मटण लाला पोरसीलीनच्या तबकडीत न चुकता घ्यायचा लाला कुणाकडे काही मागायचा नाही.दुकानात बाहेर बसल्यावर हॉटेलचा पोऱ्या त्याला पाहून खाणं आणून द्दयायचा.
लालाने कधीच भीक मागीतली नाही.कुणी त्याच्या कमंडलूत एखादं केळं,आंबा,चीकू सारखं फळ दान करायचा आणि लाला ती कधी खायचा किंवा एखाद्दया लहान मुलाला देवून टाकायचा.

मार्केटच्या आवारात असलेल्या एका मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली बांधलेल्या चौथुऱ्यावर दुपारची वामकुक्षी घ्यायचा.कधी कधी बाबल्याच्या पानाच्या गादी जवळ जावून उभा राह्यचा.दोन चार हिरवी खायची पाने,थोडी कुटलेली सुपारी,थोडा तंबाखू आणि एका पानावर चुना लावून त्याची पुरकंडी त्याच्या झोळीत बाबल्या टाकायचा.लालाला असं दान केल्यावर त्याच्या धंद्दयाला
बरकत येईल अशी त्याची भाबडी समजूत असायची.

बाजूच्या दुकानाच्या उंबरठ्यावर दोन चार उपट्सुंभ गांवठी जुगार खेळत बसायचे.चार आण्याच्या (पावलीच्या)  नाण्यावर माशी बसेल त्याला जुगार लागला असा नियम करून ईतरानी ठेवलेली नाणी त्याची व्हायची.उंबरठ्यावर रांगेत ठेवून दिलेल्या कुणाच्या नाण्यावर माशी बसेल हे ज्याचे त्याचे नशिब असायचे.कधी कधी पंधरा पंधरा मिनीटं माशी फिरकायची पण नसायची. लालाला ह्या जुगारात कसलीच उमेद नसायची.
उभं राहायचं म्हणून तो उभा राहायचा.मात्र अन्वर खेळत असेल तर मात्र तो लालाला रोखून धरायचा.लालाच्या पायावर डोके टेकल्याशिवाय त्याला जुगारात लाभ होत नाही असा त्याचा अनुभव होता.आणि खरंच लालाच्या पायावर डोके ठेवून पावली त्याच्या पायावर घासल्याशिवाय त्याला लाभ होत नव्हता,पण ईतर म्हणजे गुरुनाथ,दाजी,दत्या वगैरे हिंदू मंडळी लाला मुसलमान असल्याने त्याच्या पायावर डोकं ठवणं त्यांना पसंत नव्हतं.धर्म बुडतो असा त्यांचा समज असायचा.अन्वर आणि लाला असताना ते जुगारातून काढता पाय घ्यायचे.लाला नसताना मात्र अन्वर कधी कधी हरायचा.

असं कां होतं?, म्हणजे लाला असताना अन्वर का जिंकतो हे चलाख पंढरीच्या लक्षात आलं.अन्वर नक्की काय करतो ते त्याने नीट लक्ष देवून हेरलं.आणि लालालाच्या पायावर डोकं न ठेवता,फक्त पावली लालाच्या पायावर पंढरी घासायचा.नंतर हटकून माशी पंढरीच्या पावलीवर बसायची.पंढरी जुगार जिंकायचा.

त्याचं गुपीत असं होतं की लालाचे मळलेले आणि कधी न धुतलेले पाय एव्हडे अस्वच्छ असायचे की त्याच्या पायावर घोंघावणाऱ्या माशा त्या घासलेल्या पावलीला आकर्षीत व्हायच्या. हे पंढरीच्या चलाख डोक्यात आलं.

अशातऱ्हेने दिवस चालले होते.आम्ही शाळेतून घरी येताना लाला दिसला की “लाला! मी पास की नापास? ” असा प्रश्न केल्यावर, खाली मुंडी ठेवून चालत असलेला लाला हळू आवाजात फक्त म्हणायचा ” पास “. हे ऐकून आम्हा सर्वांना बरं वाटायचं.असंच एकदां दाजी पराडकरने त्याला विचारलं,आणि तो परिक्षेत खरंच नापास झाला. त्याला खूप वाईट वाटलं.परिक्षेसाठीनीट अभ्यास न केल्याने नापास झाल्याचं दुःख दाजीला नव्हतं,तर लालाचं भाकित खोटं ठरलं याच त्याला जास्त दुःख झालं.
पुढल्या खेपेला लाला दिसल्यावर दाजी त्याला म्हणाला
“लाला तू झूट बोलतोस,मी नापास झालो.”
लाला पहिल्यांदाच रसत्यावर थांबून म्हणाला कसा, ” बेटा मैने तुमको ’तुमना, पास’ असं बोललो होतो.मै झूट कभी नाही बोलत.अल्ला की कसम” दाजीच्या लक्षात आलं लाला “तुम, नापास” असं बोलला असावा.

लाला अलिकडे रोज रसत्यावर दिसत नव्हता.कधीतरी दिसायचा. साळगावकरच्या खानावळीतला पोऱ्या पण म्हणाला लाला थाळीत दिलेले नीट जेवत नाही.मयेकर हॉटेलवाले पण म्हणाले “लालाने अलिकडे मटण सोडलं थाळीत घेतो पण खात नाही”. करता,करता लाला आता खाली उतरून यायचा बंदच झाला.

असंच एकदा तांबळेश्वराला गेलेल्या काही लोकानी सांगतलं की लाला “पैगंबरवासी” झाला.तो अल्लाला प्यारा झाला. कुणी तरी म्युनसिपालीटीला कळवलं.गाडी आली होती,पण लोकानी लालाला बेवार्शी न्यायला दिलं नाही.प्रश्न पडला लालाला पुरायचं की जाळायचं. त्या गर्दीतून अन्वर पुढे आला आणि म्हणाला ” लाला मुसलमानच आहे.तांबळेश्वराच्या देवळाच्या बाजूला मी त्याला बरेच वेळा नमाज पाडताना पाहिलं आहे.आणि नेहमी ’अल्लाकी कसम’असंच म्हणायचा.  आणि अगदी खाजगीत म्हणजे लघूशंका करताना मी त्याला पाहिलं आहे त्याचा सुंथा झाला आहे.” एव्हडं सगळं ऐकल्यावर लोकानी त्याला तांबळेश्वरच्या पठारावरच एकेठिकाणी पुरला.

तांबळेश्वराच्या स्मशानात आल्यावर लोक न चुकता ईतर सामुग्री बरोबर एक फुलाचा हार आणायला विसरत नाहीत.सर्व संस्कार झाल्यावर बाहेर येवून लालाच्या कबरीवर आस्थापुर्वक हार घालतात आणि कबरीला हात जोडतात.आणि मुसलमान कबरीला हात लावून मग आपल्याच केसावरून हात फिरवतात.

कधी कधी शाळेतून येताना रसत्यावर लालाचा भास व्हायचा.”लाला! मी पास की नापास? “असं विचारल्यावर आता उत्तर द्दयायला लाला नव्हता.

     श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
    shrikrishnas@gmail.com

Permalink No Comments

दुःख तुझे घेवूनी सुख तुला कसे देवू

January 19, 2008 at 4:02 am (अनुवादीत)

दुःख तुझे घेवूनी सुख तुला कसे देवू

नयनी माझ्या बसवूनी कसले वचन देवू
मनी आणूनी प्रीत तुझ्यावर किती करू

नको देवूस जन्माची खूषी
एखादे गोड हास्य तेव्हडे देशी
सामोरे तुला बसवूनी कसले गीत गावू
मनी आणूनी प्रीत तुझ्यावर किती करू

साथ अपुली न सुटो अशी शपथ घेवू
दुःख तुझे घेवूनी सुख तुला कसे देवू
दूर तुला ठेवूनी प्रीती व्यवहार कसा करू
नयनी माझ्या बसवूनी कसले वचन देवू
मनी आणूनी प्रीत तुझ्यावर किती करू

    श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
        shrikrishnas@gmail.com
 

Permalink No Comments

नसे कठीण काही निश्चया पुढे

January 18, 2008 at 6:31 am (अनुवादीत)

नसे कठीण काही निश्चया पुढे
नको करू पर्वा
माझ्या मनाची
घे आहुति हवी तर
माझ्या प्राणाची
ऐकावीस फक्त एकदाच
माझी कहाणी

लागेल सामील व्हावे तुला
ही लोकयात्रा पुन्हा पुन्हा
होईल ओळख माझी खरी
निरखून खरा खरा गुन्हा

मित्रांना मैत्रिचा नसुदेत
अभिमान
घ्यावा कसा तरी परक्यांचा
अहसान

गगन हवे तर धरतीवर
कोसळून पडे
नसे कठीण काही
निश्चया पुढे

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Permalink No Comments

« Previous entries