म्हणून म्हणतो नका घालूं वाद
जो तो वागे अपुल्या अक्कलेनुसार
शहाण्यानी करावा ह्यावर नीट विचार
शक्य कसे झाले असते
ज्ञानेश्वराना सोळाव्या वर्षी
ज्ञानेश्वरी लिहीणे
अन
शिवरायाना तोरणा जिंकणे
संपादूनी ज्ञान पस्तीस वर्षावरी
करूनी अमेरिकेची वारी
अचंबीत केली जनता सारी
देवूनी भाषणे आध्यात्मावरी
झाला ऐकून पाश्चिमात्यां आनंद
कोण असती ते शिवाय विवेकानंद
जसे वाढे एखाद्दयाचे वय
होई कदाचीत अक्कलेचा क्षय
लहान मोठा न कळे त्याला
अपमानीत करूनी ज्याला त्याला
शहाणा म्हणोनी मिरवीतो स्वतःला
म्हणून म्हणतो नका घालूं वाद
असो समोर लहान अथवा थोर
जो तो वागे अपुल्या अक्कलेनुसार
शहाण्यानी करावा ह्यावर नीट विचार
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

mehhekk said,
March 1, 2008 at 5:37 pm
barobar vayavar akal naste avalambun,kruti var aste,khupch sundar.