Monthly Archives: मे 2008

तू यावे,तू यावे,तू यावे

गुणगुणे सारी ही हवा
खणखणती साऱ्या ह्या दिशा
मन माझे आनंदूनी बोले
तू यावे,तू यावे,तू यावे
झुमझुमती सारे ऋतू
घळघळती सारे घन
स्वप्ना मागून स्वप्ने सांगती
तू यावे,तू यावे,तू यावे
धडधडत्या मनावरली तुटली बंधने
प्रीतिच्या दंवानी धुवूनी गेली शरिरे
मनातल्या उत्कंठेने तोडली सारी वचने
प्रीतिच्या नशेतूनी सारे श्वास धुतले
स्वप्ने सजू लागली स्वर गाऊ लागले
फुला मागूनी फुले सांगती
तू यावे,तू यावे,तू यावे
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
 
 

” एखादा वेटर सुद्धा छोटासा संदेश देवून जातो”

” एखादी क्षुल्लक गोष्ट सुद्धा अशा घटनेला अर्थ आणून देते.एक मैत्रिचा हात, मनाला शांती आणून देतो.एका माणसापासून सुरवात होते आणि प्रसाद वाटावा तसं त्याचं होतं.”
  तसा मी वरचेवर गोव्याला जात येत असतो.एखादा आठवडा राहायचं असल्यास मी माझ्या नेहमीच्या रेस्टॉरंट मधे राहतो.त्यामुळे माझा आजुबाजूच्या लोकांशी परिचय झालेला आहे.त्यांच्याकडे वेळ असेल तेव्हा ख्यालीखुषालीच्या गप्पाही होतात.असंच एकदा त्या होटेल [...]

थोडक्यात, न विचारलेला विचार.

“सुख जवापाडे दुःख पर्वता एव्ह्डे”
यालाच,
 ”जीवन ऐसे नांव ” असं म्हणतात.
जीवनात,
 ”कधी खुषी कधी गम”
असतं,
बालपण,तरूणपण आणि म्हातारपण हे शेवट पर्यंत जगल्यावर आयुष्यातल्या ह्या अनुभवायच्या पायऱ्या  आहेत असं वाटतं.
वसंत,ग्रीष्म वगैरे आयुष्यात ऋतु येतच राहणार.
“नाचरे मोरा आंब्याच्या वनांत “
 असं म्हणता,म्हणता
“कां नाही हंसला नुसते मी नाही म्हटले नसते”
 असं म्हणे पर्यंत,
 ”मोहूनीया तुज संगे नयन खेळले जुगार”
असं म्हणताना
“जीवनात ही घडी अशीच राहूदे”
असं [...]

अरे! माझ्या भोळ्या मना

अरे! माझ्या भोळ्या मना
दुःखाने तू घाबरू नको ना
एकदा तरी समजून घेईल
दुनिया झालेल्या अवहेलना
उमेदीने भरल्या मना मधे
जखमाना जरा जागा दे
भडकलेल्या निखाऱ्याना
थंड अशी झुळक दे
होवूनी जावू दे हवे तर
हे जीवन कथेचा खजाना
एकदा तरी समजून घेईल
दुनिया झालेल्या अवहेलना
साधणार काय फिरयाद करूनी
मिळणार काय अश्रू ढाळूनी
निष्फळ आहे हे सगळे
होणार असे काय निराळे
क्षणभरात अपुले होईल
काय हे कळेना
अरे! माझ्या भोळ्या मना
दुःखाने तू [...]

सुखाची निवड

“जीवनात कसलाही प्रसंग आला जरी, तरी माझा माझ्या सुख निवडण्याच्या क्षमतेवर विश्वास द्विगुणीत झाला.” 
 
शेवटी माझ्या एका डॉक्टर मित्राने मृणालिनीच्या आयुष्यात स्थित्यंतर घडवून आणलं.
त्याच असं झालं,तेव्हा मृणालिनी कोकणातल्या एका खेड्यात रहायची.कोकणातल्या खेड्यात कुठे आलेत मनोविज्ञानीक डॉक्टर. Autism-म्हणजेच स्वतःमधेच गुंतून राहणं,दुसऱ्या बरोबर सुसंवाद ठेवण्यात कमतरता असणं आणि दुसरी आपल्या सारखीच माणसं आहेत हे कटाक्षाने न समजणं-अशा तऱ्हेचा [...]

दाखविली मातेची व्यथा कौतुके

तू जन्मी येता देवून प्रचंड वेदना
न्याहळते ती तुला घेवून गोड चुंबना
घेई तुला ती माऊली पोटाशी
रडून मात्र तू जग डोक्यावर घेशी
वेळी अवेळी जवळ घेवूनी
पाजिते ती तुला घेवूनी पदराशी
दुदु पिताना तू मात्र तिला
लाथेने धुसक्या मारिशी
शिकविले चालण्या जिने तुला
हांक मारता दूर धावशी सोडून तिला
तुला खेळण्या आणे ती खेळणी
एक एक करूनी टाकशी तू मोडूनी
गोड खाऊ करूनी देते तुला बशी
जमिनीवर [...]

अंजली अंजली तूच माझी रागिणी

अंजली अंजली पुष्पांजली
फुले देवून देतो ही पुष्पांजली
पायी तुझ्या ही स्वरांजली
गीतात गातो ही गीतांजली
प्रिय वाटे ही कवितांजली
प्रीतीने भरलेले तुझे भोळे मन
तुला पाहूनी सजणी धडके हे मन
जेव्हां मनी माझ्या वाजे प्रीतीची बांसुरी
तेव्हां स्वप्नी माझ्या खुलते एक चांदणी
जीवनाची बहार मिळे मला
प्रीतिचे शिखर मिळे मला
अंजली अंजली तूच माझी रागिणी
संगीतलहरीने डोले माझे मन
प्रीतिरागिणीने डोले माझे तन
भासे मला कशी जादू जाहली
दिसे [...]

“ही तुमचीच मुलगी का?”

कुणी तरी म्हटलंय.
” एखाद्दयाला समजून घेण्यातच  वेळ घातला तर त्याच्यावर प्रेम करायची वेळच निघून जाणार. “
काल मी प्रो.देसायांच्या घरी गेलो होतो.गेले दोन तिन दिवस भाऊसाहेब तळ्यावर येत नव्हते.म्हटलं आपण स्वतः जावून त्यांची चौकशी करावी.त्यांच्या घरी पाहुण्यांची गडबड दिसत होती.जरा जपून जपून आत गेलो.मला पाहून कुणीतरी दार उघडलं.मला पण ती मुलगी जरा अनोळखी वाटली.तिने “भाऊसाहेबाना सांगते” [...]

सजणे! तू कमाल करीशी

पिटुया का आज आपण
अपुल्या प्रीतिचा डंका
का दाखवुया आज आपण
अपुल्या ओळीखीची शंका
करू का भरल्या सभेत
तुजवर जीवघेणी प्रेमचेष्टा
का करूया अपुल्या आपण
प्रयत्नाची आसूरी पराकाष्टा
सांगण्या तू घाबरशी
मनाला लावून घेशी
सजणे! तू कमाल करीशी
नजर लाजूनी तू हसशी
गोड बोलूनी तू लुबाडशी
गरम श्वासातूनी नरम स्पर्शातूनी
मनातल्या ताऱ्याना गुदगुदल्या करीशी
विचारता मतलब तुझ्या मनातला
लालबूंद तुझा चेहरा करीशी
सजणे! तू कमाल करीशी
का न तू गुपचुप राहशी
कसला नवा न्याय [...]

” त्या अनोळख्याने माझं उरलेलं जीवन बदलून टाकलं.”

“मला वाटतं,मी माझे डोळे उघडे ठेवून सर्वांकडे पाहत असावं.आणि त्यांच्या बुध्दितून शिकावं.मला वाटतं,आपले जवळचे आपण गमावले तरच आपलं सर्वस्व आपण गमावतो.
मला वाटतं, त्या अनोळख्याने मला त्या झालेल्या बोलण्यातून माझं उरलेलं जीवन बदलून टाकलं.”असे उद्गार काढण्याची माझ्या एका मित्रावर पाळी आली.ती त्याची कथा सांगताना,
मला म्हणाला,
” मनुष्याच्या आत्म्यावर माझा विश्वास आहे आणि इतरांबरोबर दुवा ठेवण्याच्या आत्म्याच्या क्षमतेवर [...]