“मी माझ्या आयुष्यात लक्षात ठेवण्यासारखं एका अनोळख्या कडून हे एका रेस्टॉरंट मधे शिकले.”
त्यादिवशी आम्ही एका सेमिनारला गेलो होतो.ललिता प्रधान माझ्या बरोबरच काम करते.सेमिनार संपल्यानंतर मी दरवाजातूनबाहेर पडत असताना दरवाजा रोखून धरून उभी असलेली तिला पाहून मी तिच्या बरोबर गप्पा मारतच उभा राहिलो.नंतर आम्ही दोघं कॅन्टिन मधे जावून एक एक कॉफीच्या कपावर गप्पा पुढे चालू ठेवित बोलत होतो.दरवाजा उघडा करून धरून ठवलेलं मी तिला यापूर्वीच एक दोनदा पाहिलं होतं म्हाणून ह्यावेळेला जरा कुतुहल म्हणून मी तिला विचारलं तेव्हा मला ललिता म्हणाली,
“हा विषय मी जरा माझ्या दृष्टीने मनाला लाऊन घेतल्यासारखा करते.काही लोक दरवाजा थोडासा तुमच्यासाठी उघडून धरतात असा की दरवाजा तुमच्यावर आपटणार नाही,पण कदाचीत तुमच्या मनगटाला इजा व्हायची संभव आहे.काही लोक तर दरवाजा सरळ सोडून देतात आणि तुमच्या तोंडावर जरी तो आपटला तरी ते मागे वळून पण पहात नाहीत आणि सॉरी पण म्हणत नाहीत.
आणि काही एकदम अनोळखे असून ते तुम्हाला एखादा छोटासा धडा शिकवून जातात.जणू सांगतात,
“तुम्ही लोकांसाठी दरवाजा उघडा करून धरून ठेवा.”
हे मी एका अनोळख्या कडून शिकले.
एकदा मी अशीच शुक्रवारचा रात्रीचा एका रेस्टॉरंटमधे तट्ट जेवून वेटरला टेबलावर टीप ठेऊन एका मैत्रिणी बरोबर दरवाज्यातून बाहेर पडत होते. दुसर्या एका गृहस्थाने आपल्या येणार्या मित्रासाठी दरवाजा उघडा ठेऊन धरून ठेवला होता.तो दुसरा गृहस्थ अर्धा दरवाजातून बाहेर पडत असताना पहिल्याने त्याला कोपराने खूणावलं,त्या दुसर्याने त्याला रागाने खूणावून-तसच कोपर्याने खूणावून- विचारलं” तुझा प्रॉबलेम काय आहे.?”
तो त्याला गंमतीत म्हणाला,
”तू स्त्रीयांसाठी नक्कीच दरवाजा उघडून धरून ठेवतोस बाकी”
मला अजून त्या प्रसंगाची आठवण येते ज्यावेळी त्याने माझ्यासाठी दरवाजा धरून ठेवला होता.आणि त्या प्रसंगाचा माझ्या मनावर निराळाच परिणाम झाला होता.जरी मी स्त्री असले आणि रीतरीवाजाने दरवाजा धरून जरी ठेवला नाही तरी मी तसा धरून ठेवते. कारण इतरानाही माझ्या सारखं वाटत असावं.
काही आठवड्या पूर्वी मी एका सेमिनारला गेली असताना माझी एक मैत्रिण आणि तिची आई दरवाजातून बाहेर येत असताना मी त्यांच्यासाठी दरवाजा धरून ठेवला होता एव्हडच नाही तर त्यांच्या मागून एक घोळका येत होता त्यांच्यासाठी पण मी दरवाजा धरून ठवला होता.मला मिळालेला त्या गृहस्थाकडचा धडा मला दुसर्याना पास-ऑन करायचा होता.
काय करतेस म्हणून माझ्या मैत्रिणिने मला विचारलं.आणि माझ्या बाजूला ती पण उभी राहिली.
“जे मी माझ्या मला वचन देऊन बसले होते ते मी करणार आहे.”
ती माझ्याकडे जणू मी विचित्र आहे असंच बघत होती.
प्रत्येक जण त्या दरवाजातून जात होता त्या प्रत्येकाने माझ्याकडे बघून स्मित दिलं आणि आभार म्हणाले.आणि ते त्यांचे उद्गार मनापासूनचे होते असावे.
माझी मैत्रीण मला म्हणाली,
“आपल्या वयाचे लोक असं काही करीत नाहित.”
तोपर्यंत शेवटचा माणूस दरवाजातून बाहेर पडला होता.आणि मग मी त्याच्या मागे दरवाजा सोडून दिला.
“तू पण असं कधीतरी करावंस”
असं मी तिला म्हणाले.सर्वच गोष्टी काही आपल्या आईवडिलांकडून आजी आजोबांकडून मित्रांकडून किंवा शाळेतून शिकायच्या नसतात काही.एखाद्दा एकदम अनोळखी माणसाकडून पण काही गोष्टी शिकायच्या असतात त्याचा मोठा परिणाम ही आपल्या जीवनावर होतो.मी माझ्या आयुष्यात लक्षात ठेवण्यासारखं एका अनोळख्या कडून हे एका रेस्टॉरंट मधे शिकले.
हे ऐकून मी मनात म्हणालो,
“लोकं बारिक बारिक गोष्टी पण किती मनाला लावून घेतात.कौतूक करण्यासारखं आहे”
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

2 Comments
सामंत साहेब ,
हे स्फुट फार आवडलं – नवीन विचार मिळाला !
नमस्कार सतिशजी,
आपली प्रक्रिया वाचून बरं वाटलं.आभार