आज मी बराच वेळ प्रों.देसायांची तळ्यावर वाट बघत बसलो होतो.काळोख होत आला आहे आता काही भाऊसाहेब नक्कीच येत नाहीत असं मनात आणून जवळ जवळ उठलो होतो.तेव्हड्यात लगबगीने येणार्या प्रो.देसांयाबरोबर आणखी एक व्यक्ति येताना पाहिली.घरी कोणही नवी व्यक्ति आल्यावर भाऊसाहेब माझ्याशी त्याची ओळख करून देण्यात नेहमीच आनंद मानत.
“थांबा, थांबा तुम्हाला डॉ.धारणकरांची ओळख करून देतो.उद्दा ते चालले आहेत.”
असं मला लांबून ओरडून म्हणाले.
मी ते दोघे जवळ आल्यावर त्यांना म्हणालो,
“प्रोफेसरानी आपल्या नावाचा बरेच वेळां मला संदर्भ दिल्याचं आठवतं.विषेश म्हणजे आपण समाजाची सेवा करायला वाहून घेतलं आहे.आणि आपल्या जीवनावर एक पुस्तक पण लिहीत आहा असं मी त्यांच्या तोंडून ऐकलंय.आता प्रत्यक्ष तुमच्या तोंडूनच थोडं काही ऐकायला मला खूप आनंद होईल”.
एव्हडं बोलल्यावर डॉ.धारणकर सांगू लागले,
“नेहमीच यथायोग्यच काम करण्याच्या संवयीचं आणि नेहमीच स्वतःला आणखी सुधारणा करून घ्यायच्या संवयीचं उप -अंग म्हणजे कमी दर्जाच्या कामाबद्दल वाटणारं कुतुहल आणि सतत वाटणारी कमकुवतेची मनातली कुरकुर हेच असावं. समाजावर काहीतरी पॉझिटीव्ह प्रकाश टाकण्याची माझी जबाबदारी आहे असं मला नेहमीच वाटत असतं.त्यामुळेच मी हा संकल्प पूरा व्हावा म्हणून लोकसेवा करण्याचा एक भाग म्हणून मी वैद्यकिय शास्त्राचा अभ्यास करून आणि शास्त्रज्ञ होऊन, लागण होणार्या रोगाबरोबर दोन हात करण्याचा विडा उचलला आहे.
माझा हा प्रयत्न ही माझी मला मिळालेली देणगीच मी समजतो.समाजाला ह्या त्रासदायक समस्येतेतून परावृत्त करण्यासाठी ही देणगी माझ्या ह्या प्रयत्नाला आणि मदतीला सोप करते.
माझी तिन तत्वं आहेत.
पहिलं,
ज्ञानासाठी मला कधीही तृप्त न होणारी तहान आहे.ज्ञान आणि सत्य एकाच माळेचे दोन मणी आहेत अशी माझी धारणा आहे.प्रत्येक व्यक्ति रोज ज्ञान मिळवत असते.प्रयोगशाळेतून,शास्त्रावरिल लिहिलेल्या पुस्तकामधून,आणि आजार्याची देखभाल करून.हे करीत असताना मी क्वचितच कंटाळतो.
दुसरं,
उत्तमत्तोम मिळवीण्यासाठी आटोकाट प्रयत्न करण्यात मी विश्वास ठेवतो.म्हणूनच कमी दर्जाच्या कामाबद्दल वाटणारं कुतुहलआणि सतत वाटणारी कमकुवतेची मनातली कुरकुर हेच मला सतर्क ठेवतं.आणि हे कुतुहलच मला मायूस बनवतं.त्यामुळे माझ्यात एकप्रकारचं टेन्शन येऊन ते टेन्शन माझा एक दुवा वाटून मला माझ्या अपेक्षाना आधार देतं. त्यामुळे मी आता चांगला डॉक्टर आणि चांगला संशोधक झालो आहे.टेन्शन नसतं तर मी एव्हडा एकाग्र राहिलो नसतो.मी मनाशी ठरवलंय की मला हवं तेव्हडं सगळं ज्ञान मिळवता येणार नाही. त्यामुळे आणखी आणखी माहिती मिळवण्यासाठी मी धडपडत असतो.आणि तसं करण्यात मला मजा येते.
तिसरं,
डॉक्टर म्हणून मला ह्या समजाची सेवा करणं हा माझा गोल होवून राहिला आहे. माझं हे सर्व जीवन लोकांची सेवा करण्यात घालवलेलं आहे. त्यातला बराचसा भाग,संशोधन करण्यात,रुग्णांची काळजी घेण्यात,सांथींपासून लोकांचं संरक्षण करण्यात गेलं आहे.
आता हेच बघा,AIDS वर मी एकाग्र होऊन काम करू लागलो तेव्हा माझे सहकारी मला हा रोग “गे लोकांचा रोग” आहे आणि त्याकडे माझं ध्यान देणं हे निर्थक आहे असं म्हणायचे.मला ह्या रोगाची इथ्तंभूत माहिती असल्याने हा रोग समाजाचा र्हासाला कारणीभूत होणार हे मला त्यावेळीच माहित होतं.त्यामुळे ह्या रोगाचं उच्चाटन कसं होईल ह्याकडे मी माझं लक्ष केंद्रित केलं.
ह्या रोगाला काबूत आणायला आपण अपयशी होणं हा काही त्याच्यावर पर्याय होऊ शकत नाही.”
मी डॉ.धारणकराना विचारलं,
“मग तुम्ही काय करायचं ठरवलं?”
त्यावर ते म्हणाले,
” त्यामुळे त्या रोगाचं आणखी ज्ञान घेण्यावर मी भर द्दायला लागलो आहे.आणि यथायोग्य माहिती मिळेपर्यंत मी त्याच पिच्छा सोडणार नाही. कारण समाजाचं भलं हे माझ्या अस्तित्वा पेक्षां जास्त महत्वाचं आहे अशी माझी धारणा आहे.”
जाता जाता मी त्यांना म्हणालो,
“तुमच्या ह्या संकल्पाला घवघवीत यश येवो हीच माझी प्रार्थना.”
अशा दृढ-संकल्प करणार्या व्यक्ति बरोबर दोन घटका चर्चा करायला वेळ मिळवून दिल्या बद्दल मी प्रो.देसायांचे पण आभार मानायला विसरलो नाही.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
