अज्ञातवासातला एक पांडव….अर्जून (दिगसकर).

April 7, 2008 at 9:45 pm (टिका)

“अजाबात पडून घेवचंय नायं.असात तो  पाटील गांवचो.म्हणून काय भर नाटकांत, अर्जूनान हार खांवूक होयी? आणि पडान घेवूंक होयां?महाभारत असो नायतर रामायण असो,पायलीक पांच शेर लेखक मियां पण बघीतलेत.”

आता पर्यंत अगणीत लेखक महाभारतकारावर आणि रामायणकारावर टीका करीत आले आहेत.Copy Right चा हक्क तेव्हा अस्थीतवात नसल्याने,अद्दयाप पर्यंत कोर्ट कचऱ्यात खेचण्यापासून  हे लेखक बचावले गेले आहेत.
उदा.
रामाने सीतेला मात्र आपल्याबरोबर वनवासात नेलं,
“निरोप कसला घेतां आता
जेथे राघव तेथे सीता”
ह्या गीत रामायणातल्या दोन ओळी कश्या विसरता येतील.हे सीतेचे रामाला उद्देशून म्हटलेलं लक्षात घेवून,
“उर्वशीवर झालेला अन्याय”
असा विषय घेवून  बऱ्याच लेखकानी त्यावर खर्डे घासलेत ते काय कमी आहेत? काही कविनी पण उर्वशीवर झालेल्या अन्यायावर काव्ये पण केली आहेत.
उर्वशीची बाजू घेवून कुणीसं म्हटलंय,
“पण म्हणून लक्षमणाने आपल्या- बायकोला उर्वशीला- कां नेलं नाही आपल्याबरोबर वनवासात? .हा तिच्यावर अन्याय नाही काय?.
रावणाने सीतेला उचलून नेई पर्यंत रामाला वनवासात पत्नी सूख मिळत होतं मग लक्षमणाने काय गुन्हा केला होता.?”

आणखी कुणीसं रामायणावर टीका करताना आपल्या लेखात म्हटलंय,
“उर्वशी म्हणते,मला सोडून लक्ष्मण वनवासात निघून गेला.जाताना माझ्यासाठी लक्ष्मणरेषा आखून गेला. सासू-सासऱयांची, कर्तव्याची, अपेक्षांची”वाट बघ माझी ” अशी शिक्षा मला देऊन गेला अनेकदा वाटल, सगळ सोडून वनवासात निघून याव. पती नसलेल्या संसाराला त्यागून जाव,वनवास मीही भोगलाय हया राजमहालातपण माझा संयम कोणी जाणलाच नाही”

असल्या काहीशा कपोलकल्पीत टीका डोक्यांत आणून बऱ्याच लेखकानी महाभारतकारावर आणि रामायणकारावर रकानेच्यारकाने कागदावर ओढले आहेत.पुर्वी internet आणि blog वर लिहीण्याची आता सारखी सोय नसल्याने काही लेखक आपले लेख मासिकात फूकट publish करीत असत. आणि काही मासिके पण असल्या लेखावर जगत असत.

हे सगळं सांगण्याचा मतितार्थ असा की कोकणात “धयकालो” नावाने उस्फूर्त नाटकं व्हायची.
“धारणकाराचो धयकालो ईलो हा रे!”
असं गावातला एक माणूस दुसऱ्याला सांगायचा.आणि बातमी अख्या गावात पसरायची. लहानपणी आम्ही हटकून ह्या धयकाल्याला जायचो.नाटक-पार्टीने कुठे तंबू ठोकले आहेत ते आमच्यापैकी एक शोधून काढायचा.नाटक पाहून झाल्यावर दुसऱ्या दिवशी परत त्या तबूं जवळ घुटमळत रहाण्यात आम्हाला मजा यायची.
त्यावेळी पुरूष, स्त्रीपार्ट करायचे. द्रौपदी,कुंती,गांधारी हे स्त्रीपार्ट करणारे पुरूष सकाळी उठल्यावर दाढीमिशी करताना पाहून जरा गम्मत वाटायची.
” रे मन्या,तो बघ द्रौपदी दाढी करतां!”
असं म्हटल्यावर आम्ही त्या न्हाव्याला कौतुकाने नटाच्या गम्मती विचारायचो.पुरूष असून स्त्रीपार्ट करण्याची जबाबदारी असल्याने डोळ्यात काजळ घालून,लांब लांब केस ठेवून स्टेजवरची चाल बायकी राहण्याची संवय म्हणून दिवसा पण तसेच चालताना ह्या नटाना पाहून जरा कुतुहल वाटायचं.
नेहमीच्या व्यवहारात बोलताना सुद्धा ते बायकांसारखे लाडिक हावभाव करून बोलायचे हे पाहून सुद्धा हसूं आवरंत नसायचं.
कधी कधी एखादा नट आयत्यावेळी हजर नसायचा.कधी कधी दारू झोकून तर्र असायचा अशावेळी त्याच्या कडून ऐनवेळी काम करून कसं घ्यायचं हे नाटकाच्या मालकाला संकट व्हायचं.

“मेल्या ही काय वेळ दारू पिवची?.अरे,तुझो पार्ट येवची वेळ आयली मरे.”
असं दिगंबर गुरुजी - नाटकाचे डायरेक्टर -वैतागून म्हणायचे.पण दुसरा काही उपाय नसल्याने कोण जवळपास दिसेल त्याल तो पार्ट करावा लागायचा.
तेच तेच नाटक बरेच वेळां पाहिल्याने डायलॉग सर्व पाठ झालेले प्रेक्षक कमी नसायचे.असंच एकदा दुर्योधन दारू पिवून आयत्यावेळी तर्र झाला होता.दिगंबर गुरूजीने गावातल्या पाटलाला दुर्योधनाची भुमिका करायला विनंती केली,नव्हे तर ते त्यांच्या गळीच पडले.

धयकाल्याची आयत्यावेळी लाज राखावी म्हणून बाबलो पाटील - गावातला प्रतिष्टीत आसामी- कुरकुरून का होईना तयार होतो.गुरुजी,त्याचा पार्ट येण्यापुर्वी थोडेसे संवाद बाबल्या पाटलाला येतात याची खात्री करून घेवून  त्याला दुरयोधनाचे कपडे चढवायला सांगतात.
अर्जून दिगसकर  दिसायला स्मार्ट, तरतरीत नाक,आणि नाटकाचे संवाद स्पष्ट बोलायला तत्पर असल्याने त्याला गुरुजी अर्जूनाची भुमिका देतात. अर्जून दिगसकर गावातली एक सर्वसाधारण व्यक्ति असते. तसंच दुर्योधनाची भुमिका करणारा बाबल्या पाटील  दुर्योधनाला शोभेल असा दंडकट, राबस-रोबस्ट-आणि काळसावळा दिसायला असतो.
अर्जूनाचा आणि दुर्योधनाचा वाद होवून लढाई होते असा सीन असतो.दोघांच्या वादसंवादाच्या ओळी बोलून झाल्यावर घनघोर युद्ध व्हायचं असतं.म्यानातून तरवारी काढून दोघे ही एकमेका वर तरवारीने वार करण्याचा पार्ट करतात. सीनच्या शेवटी दुर्योधनाने पडायचं, असा सीन असतो.आणि  मग अर्जून त्याच्यावर शेवटचा वार करण्यापुर्वीत्याला लाथेने ढकलतो. आणि ठार मारण्या ऐवजी माफ करून सोडून देतो.

अर्जून हा पांडवातला एक पांडव अज्ञातवासात असल्याने दुर्योधनाला हा अर्जून आहे हे खऱ्या गोष्टीत माहित नाही असं समजायचं असतं.काही झालं तरी दुर्योधन खाली स्टेजवर पडण्याचा सीन करत नाही हे पाहून गुरुजी आतून प्रॉम्ट करतात आणि दुर्योधनाला-म्हणजे बाबल्याला- सांगतात,
“लढाई खूप झाली आता तू जमिनीवर पड.”

पण ते कसं शक्य आहे.बाबल्या पाटलाला जमिनीवर पडून अर्जूनाची लाथ खावून वर,
 ” जा,तुला जीवदान दिले “
असं म्हणून घ्यायची तयारी नसते.कारण प्रेक्षकात गावातल्या बायका आणि त्याची सुद्धा बायको बसलेली असते. ईतर लोकही बसलेले असतात, त्यांच्या पुढे लाज जाईल असं कसं करायचं.असं दुर्योधनाला म्हणजे बाबल्या पाटलाला वाटतं.
अर्जूनाला डोळे करून दुर्योधन सांगतो की तू पड मी पडणार नाही.अर्जूनही त्याला डोळ्याने खुणावतो की सीन मधे तू पडायचं असतं मी नाही.बराच वेळ हा सीन जरूरी पेक्षा जास्त वेळ चाललेला असतो.प्रेक्षकाना सुद्धा स्टोरी माहित असल्याने त्यांचे पण पेशंस संपत येतात.

शेवटी बाबल्या पाटील म्हणजेच दुर्योधन उस्फूर्त गाणे म्हणून गाण्यातून त्याला संदेश देवून चिडून सांगतो,
“अर्जूनग्या माय‌‍++ या पडान घे
 रे पडान घे.
मी आसंय पाटील गावचो
माकां अपमान नाय करून घेवचो
(प्रेक्षकांत)
 चेहरो दिसतां माझ्या बायलेचो
 अर्जूनग्या माय‌‍++ या पडान घे
 रे पडान घे.”
( टीप. कर्म धर्म संयोगाने नाटकातल्या अर्जून ह्या भुमिकेचं आणि खऱ्या नटाचं नाव अर्जून (दिगसकर) असणं हा योगायोगच म्हटला पाहिजे)
गाणं ऐकून प्रेक्षक हंसायला लागतात.दिगंबर गुरुजीनां हे सर्व कळल्यावर नाटकाचा पडदा पाडल्याशिवाय त्यांना गत्यंतरच उरत नाही. पडदा पडल्यावर अर्जून दिगसकर गुरुजीना सांगतो,
 ”अजाबात पडून घेवचंय नायं.असात तो  पाटील गांवचो.म्हणून काय भर नाटकांत, अर्जूनान हार खांवूक होयी? आणि पडान घेवूंक होयां?महाभारत असो नायतर रामायण असो,पायलीक पांच शेर लेखक मियां पण बघीतलेत.”

तात्पर्य अ़सं की अनादिकालापुर्वी लिहीलेल्या रामायण आणि महाभारत ह्या दोन असामान्य ग्रंथावर प्रत्येकाने आपाआपले विचार सांगून भरपूर तोंडसूख घेतलं आहे.
कोकणातला धयकाला हा त्यातला अलिकडचा एक प्रकार. 

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Permalink No Comments

बालपण देगा देवा

June 17, 2007 at 2:31 am (टिका)

बालपण देगा देवा

“जेव्हा वृद्धाश्रमाला भेट दिली त्याची “याद”मी तुम्हाला सांगतो”,
असं प्रो.देसाई मला तळ्यावर एकदा भेटले त्यावेळी म्हणाले.मी निमूटपणे ऐकण्याचं ठरवलं.
प्रो.देसाई आज जरा रंगात आले होते.
ते पुढे म्हणाले,

त्या आश्रमाच्या उत्साही संचालकाने आम्हाला माहिती देण्यासाठी त्यांच्या बरोबर येण्याची विनंती केली.
एका मोठ्या हॉलमधे, वयाने  पंचाहत्तरीच्या आसपास   असलेले आजीआजोबा आम्हाला पाहून
   आमचे स्वागत करण्याच्या इराद्याने धडपडत उभे रहाण्याचे प्रयत्न करताने दिसले.
गोंधळलेल्या मनस्थीतीत असलेल्या त्या वयस्कर आजोबाना,”बसा,बसा”असे म्हणण्यापुर्वीच
  त्यांचे धडपडीचे हे चाललेले  द्रुश्य पाहून माझी मलाच अत्यंत लाज वाटली.

संचालकाने मला एका कोपऱ्यात नेऊन प्रत्येक चेहऱ्याच्या मागे दडलेली कथा माझ्या कानी घातली.
ते ऐकून  क्षणभर माझ्या मनात आलं की जर का हा वृद्धाश्रम नसता तर कदाचीत ह्यातले बरेचसे
  आजीआजोबा रस्त्यात भिक्षेंदाही करीत  असते.ही संस्था जणू एखाद्या मुलासारखी असून
  आजीआजोबांच्या त्या कापणाऱ्या  हाताना एखादं खोल रुतलेलं मूळ प्रेमाचा आधारच असावा.

एका आजीचा नवरा हयात नव्हता आणि तिला मुलगापण नव्हता.समवयस्क मित्र,मैत्रीणी
 बरोबर ती बिचारी “अन्ताक्षरी” खेळत होती.ती मजा करत होती.तिला जवळचे नातेवाईक पण नव्हते.
ह्या अशा संस्थेमधे तिला संगीताच्या सुरात मित्र गवसले होते.ह्या संस्थेतल्या संगीताच्या सूरानी
 तिला शेवटच्या श्वासापर्यंत उसंत दिली होती.

पण एका वृद्ध चेहऱ्याने माझ्या मनाला एव्हडी ओढ लावली होती, की  भग्न आणि सुरकुतल्यांचे
 जाळे असलेला तो चेहरा आठवून मन अचंबीत झालं.

ते संचालक म्हणाले “पंधरा दिवसापुर्वी एक उमदा, लाघवी तरूण, ह्या आजीला इथे घेऊन आला,
ती त्याची अनाश्रीत शेजारीण,तिला प्रेमाचे असं कोणी नाही.तिचा नवरा निर्वतल्या नंतर ती एकाकीच झाली.
शुल्लक पेन्शन्ची ती अपेक्शीत आहे,ती एकटी असल्याने , आजारी पडली तर तिची
  देखबाल कोण करणार?,आणि दुसरं काही झालं तर कोण बघणार?”म्हणून ह्या सुस्वभावी
उमद्या तरुणाने प्रेमाचा ओलावा ठेऊन तिला  एकडे आणून सोडली.

 ”धन्य,धन्य”, शेजारी असून सुद्धा शेजारधर्म पाळून आणि तिच्या भविष्याची
खंत ठेऊन त्याने तिला इकडे आणून सोडलीत्याचा गौरव करीत मी माझ्याशी पुटपुटलो.

संचालक पूर्ण शांत राहून म्हणाले” अगदी खरं,पण ह्या तरुणाचा खरा गौरव अजून बाकीच आहे.
हा मदतीचा हात पुढे करणारा उमदा तरूण तिचा सख्खा मुलगा आहे.” “काय?”असे म्हणताना,
 माझ्या हातातल्या चहाच्या कपातला चहा डुचमळला,पण मी काही थरथरलो नाही.

“होय,इथे आल्यावर पहिले दहा दिवस ती कधी हसलीच नाही,की काही बोलली नाही.
एखाद्या जीवंत मुडद्या सारखी ती अबोलच राहिली.अलिकडेच थोडा भराव वाटल्यावर म्हणाली
“माझ्या मांसाचा तो गोळा आहे,असं मूल कुणाचं असूं शकतं का?”आणखी माहिती देण्याच्या
उद्देशाने संचालक बोलून गेले.

“काय?” ह्या माझ्या निरपराधी प्रश्नाचे उत्तर, जीवंत मुडदा म्हणून भटकत होतं.
“वृद्धाश्रम म्हणजे काय कृतघ्ज्ञ आणि भांडकुदळ मुलांनी, घाण म्हणून आईवडिलांना
फेकून देण्याची गायरी आहे काय? कृतज्ञ असण्याचा गूणाचा लोप होत आहे
” संचालक तावातावाने सांगत होते.

जंगली जनावराना,  शाळेत न शिकता सुद्धा नैसर्गिक ओढ असते ती  ह्या सुशिक्षीत
 समजणाऱ्या मुलांकडे नाही.गौरवशील घराची व्याखा म्हणे फ्रिज,गाडी,टी.वी.,सेलफोन असतो ते,
 अशी केली जाते पण ज्या घरात आंतरीक जिव्हाळ्याचे धागेदोरे नाहीत ते घर
जरी बाहेरून “ताज महाल” वाटला तरी आतून एखादी “कबर” असते.

विभागलेल्या कुटुंबात आजीआजोबाना स्थान नसतं.आईवडिलानी आपल्या
मुलांना”ते आपल्या कुटुंबाचे भाग आहेत” हे दर्शविलं पाहिजे.एक संघ राहिलं पाहिजे.

वयोमानामुळे वृद्ध माणसे कधी कधी “सरफिरे” होतात,हट्टी बनतात.
घरी कधी कधी वाद होतात.जसे दिवस जातात तसे वाद कमी होतात,संपर्क वाढतात.
पैशाच्या आणि तारुण्याच्या प्राप्तीमुळे मुलानी कृतघ्ज्ञ होवू नये.त्यांच्या वार्धक्यामुळे
 आलेल्या त्यांच्या  अक्षमतेवर भाष्य करण्याचा चालून आलेला आपला अधिकार आहे असे ग्राह्य धरू नये.

घर हे एक जीवंत पुस्तक आहे.तरूण पिढी ते न बोलता वाचत असते
जेव्हा मुलगा यश मिळाल्यावर कृतज्ञ होवून,नतमस्तक होवून (वाकून) आईच्या आशिर्वादासाठी
 पाया पडतो ते पाहून पुढची पिढी आपल्या आजी आणि आईकडे पुनराव्रुतीस प्रव्रुत्त होते.
हे काही शाळेत शिकवलं जात नाही,मुलं ते पाहून आणि समजून तसं करतात.

“तुम्ही काही आमच्यावर उपकार केले नाहीत, तुम्ही तुमचं कर्तव्य केलंत”किंवा
“आम्हाला जन्म देण्याची आम्ही तुमच्याकडे याचना केली नव्हती” असले उदगार
 काढणाऱ्या काही व्यक्ती निवडून काढायला कठीण नाहीत.असे विचार किंवा अशा
विचाराची मुळधारणा असल्यावर तिकडेच सर्व संपतं.नमून वागण्यात जर कमीपणा
मानला तर त्या मुलाची वृद्धी कशी व्हायची?.

अलिकडे, वडिलमाणसं सांपत्तिक परिस्थिती चांगली असल्यावर स्वतःची
मंडळं स्थापून “आता आम्हाला आमचं जीवन जगायचं आहे,चांगली पुस्तकं वाचायची आहेत,
चांगली नाटकं पहायची आहेत,देशात आणि बाहेर जग फिरायचं आहे,घरातली कामं
 आणि कर्तव्यं करायची नाहीत.”असे म्हणणारे नवीन आजीआजोबा दिसतात.
पन्नास वर्षापुर्वीचे ते आजी आजोबा आता राहिले नाहीत.

स्वतःचं स्वातंत्र्य ठेवण्यासाठी जरी अशी व्रुती आणली आणि मुलांवर अवलंबून
न रहाण्याचे जरी मनात असलं  तरी तो संपर्क तो दुवा ठेवणं आवश्यक आहे,
कारण आयुष्याच्या उतरणीवर मुलांची मिळणारी प्रेमाची आस्था मुकून जाणं योग्य नाही.
ही एकमेकाची जरुरी असते.हट्टवादी राहून शेवटी एकमेकास असून नसल्यासारखे होणं
 ह्यातून काही साध्य होत नाही.

हजारो लोक आजुबाजुला असून सुद्धा आपल्या यशाची शिफारस अथवा पाठ
 थोपटण्यासाठी आपलं माणूस जवळ नसल्यास किंवा “जीवन असंच असतं काळजी करू नको सर्व
काही ठिक होईल पुढे जा मागे वळून बघू नको “असं सांगणारे आपले वडिलधारे जवळ नसतील तर
 त्या यशाचा काय उपयोग? 

                  श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया) 

Permalink No Comments