आज कालचा उद्दया असतो
आणि
आज उद्दयाचा काल असतो
मग
उद्दया जेव्हा ’आज’ होईल
आणि
’आज’ त्याचा ’काल’ होईल
तेव्हा
त्या उद्दयाच्या उद्दयाला
’आजचा’ ’उद्दयाच’ म्हटलं जाईल
आता
आज जे होत राहिलंय
त्याचं
काल म्हणून होत जाणार
जे
उद्दया म्हणून होणार आहे
त्याला
आज म्हणून म्हटलं जाणार
म्हणून
“आता कशाला उद्दयाची बात
बघ उडुनी चालली रात
भर भरूनी पिऊ
रस रंग नऊ
चल
बुडुनी जाऊ रंगात”
हे माणूस सिनेमातलं गोड गाणं शांताबाई हुबळीकरांच्या तोंडून ऐकून मजा यायची.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
No Comments
मी तुजवर प्रीति करू
की काव्य करू
नीष्टा माझी बहरून येईल
होवून एक सुगंध
मनात माझ्या सदैव राहिल
तुझाच एक छंद
नशिब माझे चमकून दिसेल
मिठीत तुझ्या राहून
सूर मुरलीचे ऐकून म्हणतील
लोक अपुले मिलन
तुझ्याविना जीवन माझे राहिल
सदाचे दुर्दम
तुझ्या नी माझ्या श्वासामधून
गुणगुणेल सरगम
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
2 Comments
“अमुक अमुक असा,असा,होता.तसा,तसा होता. पण मात्र तो माणूसही होता”असं काही व्यक्तिना श्रद्धांजली देताना म्हणतात ते उगाच नाही.
त्याचं असं झालं,अलीकडे मला जरा थकल्या थकल्या सारखं वाटू लागलं होत.माझ्या डॉक्टरांकडे ही माझी तक्रार मी गेले कित्येक दिवस करीत होतो.ह्यावेळी परत तेच माझं रडगाणं ऐकून डॉक्टर मला म्हणाले आपण तुमचं पुर्ण चेकअप करून घेवूया.पण त्यासाठी मी सांगतो त्या नर्सिंग होम मधे तुम्हाला कमीत कमी एक आठवडा ऑबझरव्हेशन खाली राहवं लागेल.मी मनात म्हणालो ’बापरे! काय बुद्धि मला झाली आणि ही नर्सिंग होंम मधे राहण्याची बला मी माझीच मला करून घेतली.
माझी जी बेड होती तिच्या बजूच्याच बेडवर एक सदगृहस्थ कसल्या तरी ट्रिटमेंटसाठी माझ्या अगोदर एक दोन दिवस आले होते.सहाजीकच दिवस जाता जाता त्यांच्याशी ओळख झाली.बोलता बोलता मला कळलं की ते एक डॉक्टरच होते हे त्यानी मला नंतर सांगितल्यावर कळलं. ते जनरल चेकअपसाठी आले होते.एक दोन दिवसात परिचय वाढत गेल्यावर गप्पा गोष्टी करता करता ते मला एक दिवस म्हणाले,
“तुम्हाला मी एक गम्मत सांगतो. मी पण एक डॉक्टरच आहे.आपलं तनमन,शक्ति,आणि आपली आध्यात्मिक श्रद्धा ह्या बद्दल जागृत न राहिल्यास आपल्या डॉक्टरी उपचार करण्याच्या क्षमतेची आपल्या आपण मर्यादा घालून घेतो.मला वाटतं आपली विचारशक्ति पण तसं करायला कारणीभूत असते.
मला वाटतं,आपल्या मनातले उद्देश आपण काबूत ठेवू शकतो.आणि ही एक फार महत्वाची बाब आहे. डॉक्टरी उपचार करायला जर का मला कुणाचं सहाय्य करायचं असेल तर प्रथम माझा उद्देश पडताळून पाहिला पाहिजे असं मला वाटतं पाश्चिमात्य औषध प्रणाली बाबत मी जसा असमाधानी होवू लागलो तसा मी दुसऱ्या उपचाराच्या प्रणालीचा अभ्यास करू लागलो. शरिराच्या शक्तिकडे निराळ्या दृष्टिकोनातून पाहून त्याचा अभ्यास करू लागलो.एक बाई माझ्या क्लिनीक मधे आली.
माझी तिची नजरा नजर झाल्यावर मला ती जरा साशंक वृत्तीची दिसली.तिची मेडिकल हिस्ट्री कळण्यासाठी मी तिला नेहमी प्रमाणे प्रश्नाचा भडीमार केला.काही वेळाने माझ्या लक्षात आलं की तिच्या डोक्यावर परिणाम झाला असावा. मी जरा मनात चलबिचल झालो. कारण हिच्या उपचारावर माझा बराच वेळ जाणार होता. डॉक्टरी उपचारासाठी आपला उद्देश कसा पडताळून पाह्यचा ह्याचा जो मी अभ्यास करीत होतो,तो विचार माझ्या एकसारखा मनात येवू लागला.ती बाई माझी पेशंट असल्याने तिला काय होतंय ह्या बद्दलचा उपचाराचा विचार मला मनात आणणं भाग होतं.मी ठरवलं की तिला माझ्याकडून जास्तीत जास्त आदर देणं,तिच्याकडे सतत लक्ष देणं,आणि तिच्याबरोबर प्रेमळपणाची वागणूक असणं ह्याची जरूरी होती.तसं केल्यानंतर ती बाई माझ्याकडे आता त्या नजरेनी न पाहता एखादी बारा वर्षाच्या अल्लड मुली सारखी बोलू लागली.मी पण तिच्याशी हसंत खेळत रहिलो.
तिची खरीतर पाठ दुखत होती.आणि त्याच्यासाठी मी तिला फिझीकल थेरपीसाठी एका डॉक्टरकडे पाठवलं.आणि नंतर काही दिवसानी मला येवून भेट म्हणून सांगितलं होतं.काही आठवड्यानंतर मला तिच्या मुलीचा कॉल आला,की खूपच पाठीत दुखत असल्याने सध्या ती एमरजन्सी म्हणून एका हॉस्पिटलात ऍडमिट झाली आहे.तिच्या पाठीच्या मणक्यात ट्युमर असल्याने तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार होती.त्यानंतर ती फक्त एकच आठवडा जगली.
मला तिची मुलगी म्हणाली,
“आपल्याला कॉल करून आपण जगणार नाही हे कळवायला सांगितलं होतं.त्यामुळे आपली भेट होणार नाही.असंही पुढे म्हणाली होती.”
तिने आपल्या जाण्यापुर्वीच्या शेवटच्या दिवसात पण माझी आठवण काढली ह्याचा विचार येवून मला दुःख असह्य झालं.तिच्या शेवटच्या दिवसात सुद्धा ती माझी आठवण ठेवून होती ह्याचा विचार येवून मी सद्गदीत झालो.
त्या घटनेचा विचार येवून मी अजून गर्भगळीत होतो.त्या घटनेनेच माझ्यात बदल आला.माझ्या मनातल्या विचाराना कसलीच कारणमिमांसा नसते असं मनात आणण्याचं मी सोडून दिलं.माझा आता जगाकडे पाहताना ते जग माझ्या भोवती मीच निर्माण करतो असं दिसूं लागलं.मला आता असं वाटू लागलं,की जेव्हा मी आनंदी किंवा रागाचे विचार मनात आणतो तेव्हा एक प्रकारचं केमिकल माझ्या शरिरातल्या प्रत्येक सेलमधे जावून पोहोचत असावं आणि त्यांना समजत असावं की मी आनंदात तरी आहे किंवा रागात आहे. माझं शरिर माझ्या भावना प्रत्येक सेलला नुसतंच कळवत नसून माझ्या शरिरातल्या शक्तिची क्षमता माझ्या त्या भावनेप्रमाणे बदलते आणि माझ्या बद्दल इतराना माझ्या भावनापण कळत असाव्यात.
काही लोक ह्या सहज न कळणाऱ्या भावने विषयी फार जागृत असतात तर काही त्यातून विलग व्हायला शिकत असतात.”
हे त्या डॉक्टरचं सगळं बोलणं ऐकून झाल्यावर माझ्या मनात विचार आला किती दूरवर हे डॉक्टर लोक विचार करीत असतात.मशिन रिपेअर करणं आणि माणूस रिपेअर करणं ह्या मधे यांत्रीक बाब वगळल्या नंतर माणसाचं मन,भावना, आनंद,राग असल्या बाबी देवाने किंवा निसर्गाने केल्या नसत्या तर माणूस मन नसलेला कंप्युटर म्हणून सहज काम करू शकला असता आणि कंप्युटर मन नसलेला माणूस म्हणून काम करू शकला असता.
एखादा माणूस निर्वतल्यावर,
“अमुक अमुक असा,असा,होता.तसा,तसा होता. पण मात्र तो माणूसही होता” असं त्याला श्रद्धांजली देताना म्हणतात ते उगाच नाही हे लक्षात येतं.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
2 Comments
अर्ध्या रात्री खणकली माझी कंगणी
आलास का रे साजणा माझ्या अंगणी
जा सांग रे! काळ्या काळ्या घना
माझ्या करीता माझ्या साजणा
प्रीतिच्या रंगामधे रंगविली मी
कोरी चुनरी तुझ्या कारणी
अर्ध्या रात्री खणकली माझी कंगणी
आलास का रे साजणा माझ्या अंगणी
ऐकूनी खणखणे कंगणाचे गे! साजणे
नसे कठीण काय ते समजणे
कोण पुकारून सांगे हे इशारे
समजलो काय ते समजणे
समोर मी उभा असे गे! साजणे
होईल ते होवूदे काहीही यापुढे
तुटू न जावो तुझी कंगणे
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
No Comments
“मला खरंच उभं आयुष्य खर्चून सुद्धा फक्त एखादा दिवस इतका चांगला असू शकतो हे शिकायला मिळालं”
असं विरेन मला ज्यावेळेला मी त्याच्या घरी तो एकाएकी आजारी झाल्याचे कळल्यावर भेटायला गेलो तेंव्हा सांगत होता.
विरेन माझ्या मित्राचा मोठा मुलगा.त्याचे वडिल माझा मित्र,तो संगीततज्ञ माणूस.
तो मराठी सिनेमात खूपदा पार्श्वसंगीत द्दयायचा.त्याचा वाद्दयवृंद पण होता. निरनिराळ्या महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या शहरात निमंत्रण मिळाल्यावर हा वाद्दयवृंद घेवून जायचा.
अलीकडे प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांने हा सर्व कामाचा भार विरेन वर- आपल्या मुलांवर- टाकला होता.
नेहमीच गावोगाव फिरून, नाही म्हटलं तरी खाण्या पिण्याची आणि विश्रांती आणि झोपेची नकळत आबाळ होत असतेच.
विरेनला असंच कुठेतरी इंनफेक्शन झाल्याने त्याला अचानक हॉस्पिटलात जावं लागलं. आठदहा दिवसांनी त्याच्या आजाराला उतार मिळाल्याने डॉक्टरनी त्याला घरी पाठवलं होतं.आणखी थोडी विश्रांती पण घेण्याची सुचना केली होती.
विरेन मला म्हणाला,
” आठ दिवसापुर्वी मला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला.मला छातीत खूप कळा येवून भयंकर श्वास लागला होता.स्कॅन केल्यावर माझ्या फुफ्फुसात ब्लडक्लॉट आला होता असं समजलं.
मी वाचलो हे पाहून सर्वजण मला तक्दीरवान म्हणत होते.रोगाचं इंग्लीश नांव मला माहित असलं नसलं तरी,ते दुखणं,ती भिती आणि त्यातून आलेले ते डिप्रेशन ह्याची मला मुळीच कल्पना नव्हती.”
मी त्याला म्हटलं,
“सतत कामात व्यग्र असलेल्या तुला एव्हडे दिवस काढायला मोठं संकटच वाटलं असणार.”
त्यावर म्हणतो कसा,
“सांगतो काय! रोजच्या डॉक्टरच्या व्हिझीट्स,नर्सीसचे तासा तासाने औषध आणि इतर उपाय,ते हॉस्पिटलातलं वरचेवर येणारं खाणं,याने वेळ जात होता.पण आता घरी आल्यावर ही नकळत मला मिळणारी विश्रांतीची भेट अगदी जीवावर आली आहे.एखादं पुस्तक वाचायला घेतलं तर लक्ष केंद्रीत होत नाही.रेडिओ चालू करून नकोसा होवून परत बंद करावासा वाटतो.साठलेल्या कामाचे काळे ढग माझ्या डोक्यावर जमा होतात,पण एखादी औषधाची गोळी घेवून,किंवा एखादा व्हिडीयो पाहून काळजी दूर जात नाहीत.
हा अनपेक्षित मिळालेला विरंगुळा नकोसा होतो,जणू शाप कसा वाटतो.बरेच दिवस न भेटलेल्या एखाद्दया मित्राचा फोन आला तर जरा वेळ जातो.”
मग मी त्याला विचारलं,
“मग तू तुझा वेळ कसा घालवतोस?”
त्यावर त्याने मला एक गम्मतीदार किस्सा सांगितला.
तो म्हणाला,
” एखाद्दया अनोळख्याचं गोड स्मित पुन्हां आयुष्याची दोरी पकडून धरायला उद्दुक्त करतं.माझीच एक विद्दयार्थीनी मला त्यादिवशी भेटायला आली.आणि नंतर जाताना मला
”ह्याव ए नाईस डे” म्हणाली.
तिच्या नजरेत मला सच्चायी दिसली.ती निघून गेल्यावर माझ्या मनात आलं,की आजचा माझा हा दिवस,नव्हे तर उद्दयाचा दिवस, कदाचित येणारे पुढचे दिवस मी सदिच्छेने संभाळले पाहिजेत.
माझ्या डॉक्टरला विचारून सुद्धा, तो माझा जीवघेणा दिवस माझ्या आयुष्यात का आला ह्याचं समर्पक उत्तर मिळालं नाही.आणि त्या माझ्या विद्दयार्थीनीने मला तो दिवस चागला जाण्याची दिलेली सदिच्छा ही मला करून दिलेली एक भरवंशाची आठवण असावी.”
हे विरेनचे उद्गार ऐकून मी त्याला विचारलं.
” मग आज मी तुला भेटायला आलेला दिवस तुला कसा वाटला?”
मला म्हणाला,
“काका,त्यानंतर मी एव्हड्या झपाट्याने बरा होत आहे,की रोज मी माझ्या आई बाबाना नतमस्तक होवून अस्थाला जाणाऱ्या सूर्याचे दर्शन घेवून विश्रांतीसाठी सध्यातरी लवकर झोपायला जातो.
मला खरंच उभं आयुष्य खर्चून सुद्धा फक्त एखादा दिवस इतका चांगला असू शकतो हे शिकायला मिळालं”
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया )
shrikrishnas@gmail.com
Permalink
No Comments
तरूण आहे किती दुनिया प्रीतिची
वाटे कसे हे शांत शांत ह्या एकांती
ह्या उंच उंच पर्वतांच्या मग्रूर सावल्या
सांगत आहेत नजर भिडवीण्या
देवदूत ही इथे निःशब्द असती
वाटे कसे हे शांत शांत ह्या एकांती
तरूण आहे किती दुनिया प्रीतिची
नाही इथे कसला पडदा नाही झालर
ठेविल्या पाउली सर्वच घसरण
पावला पावला खाली सोडते निशाण
वाटे कसे हे शांत शांत ह्या एकांती
तरूण आहे किती दुनिया प्रीतिची
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
No Comments
“माझं मन मला म्हणालं,आजच्या आज पेक्षा उद्दयाचा उद्दया नक्कीच ग्रेट असणार.ज्या जगात माझी पिढी वाढणार आहे ते जग नक्कीच जास्त चांगलं असणार,वाईट नक्कीच नसणार.”
त्यादिवशी तळ्यावर मी प्रो.देसायांची वाट बघत बसलो होतो.नेहमीच्या वेळेवर प्रोफेसर काही आले नाहीत त्यावेळी मी समजलो की आता जास्त वेळ त्यांची वाट बघण्यात अर्थ नाही.म्हणून मी उठतो उठतो तोच त्यांचा नातु माझ्या मागे उभा असलेला दिसला.
मला म्हणाला,
“काका,आजोबाना आज जरा बरं नाही,तुम्ही त्यांची वाट बघत राहाल म्हणून मला त्यानी तसा निरोप द्दयायला तुमच्याकडे पाठवलं आहे.”
बरेच दिवसानी त्यांच्या नातवाची आणि माझी भेट झाली.
काय कसं काय चालंय वगैरे विचारून झाल्यावर माझ्याशी विषय काढत म्हणाला,
” तुम्हाला माझ्या मनात आलेला विचार सांगायचा आहे.”
मी मनात म्हणालो बापरे, भाऊसाहेबांचा नातु पण आजोबा सारखाच विचारी वाटला.रक्ताचा अस्रर कुठे जाणार म्हणा.
“खरं म्हणजे मी हे माझ्या आजोबांशीच डीसकस करणार होतो.पण म्हटलं तुम्ही आणि आजोबा नेहमीच काही ना काही तरी डीसकस करत असताच मग तुम्हाला माझा विचार सांगून तेव्हडंच होणार आहे.”
मी त्याला म्हणालो,
“ऐकुया तर काय तू म्हणतोस ते”
त्यावर मला म्हणाला,
“काका,परवा दिवशी रात्री, ह्या शनिवार,रविवारी काय करायचं,कुणा मित्राकडे जायचं वगैरे वगैरे गोष्टींचा मी विचार करीत असताना,माझे आईवडील काही तरी माझ्या विषयी डीसकस करीत होते ते माझ्या कानावर पडलं.
माझे वडील थोडेसे अपसेट झालेले दिसले.म्हणजे ते नेहमीचं बोलणं जे आईवडील आपल्या मुलांबद्दल करतात, आणि त्याबाबत काळजीत असतात,जसं मी कोणत्या कॉलेजमधे जावं,घरापासून कॉलेज किती दूर असावं,आणि खर्च किती यावा अशा पैकी नव्हतं.”
मी म्हणालो,
” अरे,तू तर प्रो.देसायांचा नातू.तू त्यांच्या सारखाच हुशार असणार.त्यामुळे तुझ्या बाबतीत हेच विषय जास्त डीसकस केले जाणार नाही काय?”
त्यावर मला म्हणतो कसा,
” नाही,नाही,ऐका तर खरं. हे सगळं जगावेगळंच होतं.
वडील आईला वैतागून म्हणत होते,’ आमच्या पश्चात आणि आम्ही जाता जाता आमची पिढी ह्या नव्या पिढीला कसलं जग देवून जात आहे? पुढचे ह्यांचे दिवस महा कठीण आहेत भविष्यपण दारूण आहे.’ जणू आमच्या ह्या पिढीला भविष्यच नसणार असा काही तरी त्यांचा त्रागा होता.”
ज्या अविर्भावात तो मला सांगत होता ते बघून मला त्याचं खरंच कौतुक वाटत होतं.
मला पुढे कसा म्हणतो,
“मी खरा आमच्या गेस्ट रूम मधे बसलो होतो,आणि तिकडून हा त्यांचा वैताग माझ्या कानावर पडत होता.आणि काका, मी तुम्हाला गम्मत सांगतो,हे ऐकत असताना माझं लक्ष माझ्या आजीआजोबांच्या फोटोवर केंद्रीत झालं होतं.तो आजोबांचा टाय,सूट,बूट घातलेला प्रोफेसरांचा वेष,आणि त्याच्याच बाजूला माझ्या पणजोबा-पणजीचा फोटो,त्यात माझ्या पणजोबांचे ती डोक्यावर पुणेरी पगडी एका कानात बिगबाळं,भरपुर मिशा,घट्ट गळ्याचा कोट,त्यावर सफेद उपरणं आणि खाली स्वच्छ मसराईझ्ड धोतर,त्याउप्पर जावून त्यांच्या तोंडावर दिसणारं ते समाधान पाहून मला खूपच धीर आला.
माझं मन मला म्हणालं,आजच्या आज पेक्षा उद्दयाचा उद्दया नक्कीच ग्रेट असणार.
ज्या जगात माझी पिढी वाढणार आहे ते जग नक्कीच जास्त चांगलं असणार,वाईट नक्कीच नसणार.त्या त्यांच्या फोटोना पाहून मला असं कां वाटावं, ते समजायला एक प्रकारची मदतच केली आहे.”
मला ते त्याचं म्हणणं ऐकून खूप कुतुहल वाटलं.ओघानेच मी त्याला म्हणालो
“का रे,सांग बघू!”
मला म्हणाला.
“सांगतो ऐका. माझ्या आजीआजोबांच्या आणि पणजीपणजोबांच्या वेळी झालेल्या गंभीर आणि नुकसानदायी घटनांचा मी विचार केला.
दोन जागतिक युद्धं,ऍटॉमीक बॉम्बस,महाभयंकर रोगाच्या सांथीतून झालेला संहार,आणि बरोबरीने चांगल्या गोष्टी पण त्यानी पाहिल्या.दोन्ही महायुद्धांचा शेवट,रोगावर निरनिराळी व्हयाक्सीन्स,रेडिओचा शोध,विमानाचा शोध,असल्याही गोष्टी त्यानी पाहिल्या आहेत.”
मी म्हणालो,
“मग आता,तुला तुझ्या जगात काय चांगल्या गोष्टी दिसणार ह्याचं भाकित काय आहे ते तर ऐकूया”
मला म्हणाला,
“हा तुमचा प्रश्न मला आवडला.माझ्या आजोबानी पण असाच प्रश्न विचारलेला असता.
मला वाटतं माझी पिढी एडसवर जालीम औषध,कॅन्सरचा निप्पात, कदाचीत जगात शांती येईल,मंगळावर माणूस,असल्या गोष्टी पाहील.
आता हेच बघा,माझ्या आजोबाना माझ्या आताच्या वयावर म्हणजे सोळा वर्षावर चंद्रावर माणूस जाईल हे विचारात आणणं देखील शक्य नव्हतं, तसंच माझ्या वडिलांच्या सोळाव्या वर्षी इंटरनेटचा विचार सुद्धा त्याना शक्य नव्हता.”
काका,मी ज्यावेळी लहानपणी एखाद्दया दिवशी थोडा नर्व्हस असायचो त्यावेळी माझे बाबा माझ्या खांद्दयावर अलगद प्रेमाने हात ठेवून म्हणायचे ’द्दयाटस ओके, उद्दयाचा दिवस नक्कीच तुला बरा जाईल.’
मी त्यांना म्हणायचो कशावरून?त्यावर ते म्हणायचे’मला तसं वाटतं त्यावरून!’ मी त्यांच्यावर विश्वास ठेवला.माझ्या पणजोबांचा असाच विश्वास असावा,माझ्या आजोबांचा पण असाच विश्वास असावा,आणि आता माझा पण.”
उशिर होत आहे असं पाहून जाता जाता तो मला म्हणाला
” मला आणि माझ्या पिढीला काय भविष्य असावं ह्याचा त्या रात्री कष्टी होवून विचार करताना माझ्या आईबाबाना पाहून मला क्षणभर वाटलं काका,मीच बाबांच्या खांद्दयावर हात ठेवून म्हणावं,’द्दयाट्स ओके बाबा,नका वरी करू! उद्दया नक्कीच चागलं असणार!’
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishans@gmail.com
Permalink
3 Comments
तुझ्या प्रीतीची संगती सोडून
सांग मी कुठे जावे
मनी आली भीती माझ्या
खुशीने मिठीत तुझ्या मी
आज कसे मरून जावे
मिळाले मनाचे आज काफिले
आहोत जवळ उभे पाहत मंजिले
मिष्कील हंसुनी जेव्हा तू पाहिले
मिटून गेले हंसत क्लेश मनातले
प्रेमळ असती हे सुंदर क्षण
त्यां इथे थांबण्या तूच सांगावे
खुशीने मिठीत तुझ्या मी
आज कसे मरून जावे
पाऊली तुझ्या मी वाहू हे जीवन
का वाहू तुझ्या पाऊली देदीप्य लोचन
होशील जर तू खूष तुला वाहिन
मनातल्या सद्भावना रात्रंदीन
सुखवीन मी मला रे सजणा
नजरेत माझ्या तू सदैव असावे
तुझ्या प्रीतीची संगती सोडून
सांग मी कुठे जावे
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
No Comments
वृद्ध आई नेहमीच ढळाढळा अश्रू ढाळत असावी….बिचारी आई अशा ही वेळी.
वा…बाबा..वा!!
आज तुम्ही आम्हाला घरा बाहेर काढता
पुन्हा पुन्हा डोळे भरून येतात
तुम्ही मात्र डोळ्याला डोळा देत नाहीत
असं हो काय…निघता निघता
साध्या आशीर्वादालाही दोन हात लावत नाहीत
का आशीर्वादाच्या हक्कापासून आम्हाला तुम्ही वंचीत करता
वा…बाबा..वा!!
आज तुम्ही आम्हाला घरा बाहेर काढता
नव्हतं पटंत मान्य..
कदाचित आमचंही काही चुकलं असेल
आमची अडचण…अधे मधे करणं
तुम्हालाही कधी खटकत असेल
म्हणून काहो कचऱ्यासारखं घराबाहेर फेकतां
वा…बाबा..वा!!
आज तुम्ही आम्हाला घरा बाहेर काढता
मित्र मंडळी…तिकडे
आम्हाला भरभरून म्हणे मिळतील
गप्पागोष्टीत…नी थट्टा मस्करीत
तुम्हाला विसरण्यात जातील
पण नातवाशी खेळायचं होतं..ते स्वप्न कसं पुरं होणार…
वा…बाबा..वा!!
आज तुम्ही आम्हाला घरा बाहेर काढता
वेळ भरभर जाणार….
हो..म्हणजे शॉर्टकटने सोयीना गाठायच..
लांब लांब पावलावर उभ्या आहेत त्या
नाहीतरी आता कोणासाठी त्या करायच्या..
.
घाबऱ्या घुबऱ्या जीवाला कसं अचूक वेळी
सोडता…
वा…बाबा..वा!!
आज तुम्ही आम्हाला घरा बाहेर काढता
आयुष्याच्या सुरवातीला…
आम्हाला वेगळं घर घ्यायला सांगता..
तुमचं ऋण फेडायला कधी चान्स देता?
हो! प्रत्येक विचाराला दोन बाजू असतात. मला “वृद्धांच्या व्यथेपेक्षा भिन्न व्यथा-मुलांची,मुलगा किंवा मुलगी- कशी असू शकते ह्याची कल्पना येवून त्या “आज तू आमचं सारं ऋण फेडलंस” कवितेचा सुंदर गाभा तसाच ठेवून ती भिन्न व्यथा लिहावी असं मला वाटलं.
गम्मत अशी की ती परम पूज्य माऊली दोन्ही प्रसंगात बिचारी अश्रू ढाळण्यापलिकडे काही करू शकत नाही.”लळा जिव्हाळा शब्द्च खोटे”असंच तिचे अश्रू सांगत नसतील ना?
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
10 Comments
“आदर नसला की दुसऱ्याची पर्वा नसते,आणि दुसऱ्याची पर्वा न करतां रहाणं म्हणजे एकप्रकारचं उजाड वाळवंटात राहिल्या सारखं आहे.”
ज्यावेळी मी अगदीच तरूण होतो,त्यावेळी होणारी घटना आणि आजूबाजूचे लोक यांच्याबद्दल माझी समजूत अगदी सरळ होती.
एखादी गोष्ट चांगली तरी असते किंवा वाईट असते.ह्या विचारामुळे सभोंवतालच्या जगाशी मला वागायला सोपं जायचं.नंतर मी जेव्हा पोक्त तरूण झालो तेव्हां हे सर्व जरा क्लिष्ट व्हायला लागलं.एक तर पांढरं नाही तर काळं असं पहात असताना मला आता ग्रे पण सर्व ठिकाणी दिसायला लागलं.
त्यामुळे माझं जीवन, उद्देश,अर्थ आणि निर्णय ह्या तिन्ही गोष्टीशी जास्त घण झालं आणि तसंच ते जगायला कठीणही होत गेलं.आता मी जेव्हां जरा मिड्ल एज मधे आलो आणि एका मुलीचा बाप झालो तेव्हां त्याच जीवनाकडे पहाण्याचा माझा दृष्टीकोन हळू हळू साधा सरळ होत गेला.”
समीर जेव्हां मला हे सांगू लागला तेव्हां मला ते ऐकण्याचं कुतुहल वाढू लागलं.
मी म्हणालो,
“सांग बाबा,काय म्हणतोस ते ऐकायला मजा येते”
मला पुढे म्हणाला,
“अशा ह्या वृतीचं कारण,मी मला एक समजूतदार पालक समजून माझ्या मुलीला चार गोष्टी शिकवायला लागलो.सहाजीकच मी गुंतागुंतीच्या गोष्टी लहान लहान करून त्याचा अर्थ तिला समजावयाला लागलो.सर्व पालक असंच करतात. जीवन जास्त सोपं करून सांगता सांगता मी पुर्वीच्या मुठभर मुळ गोष्टी जगायला कशा कारणीभूत होतात ह्या विचाराकडे परत आकर्षित झालो.
मी म्हणालो,
“अशा कुठच्या कुठच्या गोष्टी सांग बघू”
त्यावर समीर हंसत हंसत म्हणतो कसा,
“त्यातल्या त्यात मला जास्त वाटू लागलं ते म्हणजे “आदर” किंवा “सन्मान”ह्या वृत्ती बद्दल. स्वतःबद्दलचा आदर,इतरांचा आदर,जगातल्या सर्व प्राणीमात्रांचा आदर ह्या गोष्टी बद्दल.
मी माझ्या मुलीला एखादं वाद्दय वाजवायला, एखादी कविता लिहायला,एखादा गेम खेळायला प्रयत्न कर असं सांगत असतो.आता तसं करत असताना अपयश येणं आणि त्याबद्दल दुःख वाटणं स्वाभाविक आहे पण प्रयत्नच न करणं हे महादुःख आहे.कारण ते नकरणं म्हणजेच आपला आपण आदर न करणं.आणि हे सर्वमान्य आहे की आपला आपण आदर केला नाही तर दुसरा कोणही तो आपल्या साठी करायला मागणार नाही.”
“इथपर्यंत पटलं पुढे काय? “
मी म्हणालो.
त्यावर समीर म्हणाला,
” स्वाभिमान हा एक स्वतःचा आदर करण्याचा प्रकार आहे,तो काही गर्व होत नाही. हा प्रयत्न अभिमानाने करण्याचा, आपआपल्या पद्धतीने आणि आपल्याला जमेल तव्हडं करण्याचा असा हा प्रकार होईल.प्रत्येक जण परफेक्ट नसतो.आणि ही गोष्ट ज्याने त्याने समजून घेतली पाहिजे आणि मान्य पण केली पाहिजे.त्यानंतर इतरांची विकनेस आणि स्ट्रेन्थ मान्य करायला सोपं जातं.मला वाटतं ही वृत्ती प्रेमा सारखीच दुवा जोडणारी आहे.आदर नसला की दुसऱ्याची पर्वा नसते,आणि दुसऱ्याची पर्वा न करतां रहाणं म्हणजे एकप्रकारचं उजाड वाळवंटात राहील्या सारखं आहे.”
मी म्हणालो,
“मी सुद्धा आता तुझ्या सारखी वृती ठेवण्याचा प्रयत्न करीन.”
समीरला नक्कीच हे ऐकून बरं वाटलं.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Permalink
5 Comments