तुझी शहनाई बोले

 
(अनुवाद)
तुझी शहनाई बोलते

ऐकून माझं अंतरंग डोलते

छळकुट्या

का ऐकवलीस अशी तान रे
घन भरभरून आले

कोकीळा गात रहाते

कसा संभाळू माझा जीव रे

 
वैरी होऊन दुनिया उभी ठाकली आहे

माझ्या पायात बेडी घट्ट पडली आहे

कुठल्या घटनेसाठी नजर खिळली आहे

बाराही महिने पावसाची झोड आहे

 

 

एकदाच तुझा चेहरा दाखव

मनातलं दु:ख मिटव

तुझ्याविणा सुनं सुनं माझं जीवन रे

 

 

तुझी शहनाई बोलते

ऐकून माझं अंतरंग डोलते

छळकुट्या

का ऐकवलीस अशी तान रेभासते

 

 

ये,रे,केव्हा पासून मी तुला बोलावते

तुझ्या प्रीतिच्या स्वपनाला मी सजवते

मनाला भासते ऊडून मी तुजकडे येते

 

 

प्रिया पंख कुठून मी आणावे

मी इथे अन तू तिथे

मध्येच राहिले अपुले जीवन

कशा पूर्ण होतीस अपुल्या कामना रे

 

 

घन भरभरून आले

कोकीळा गात रहाते

कसा संभाळू माझा जीव रे

 

 

तुझी शहनाई बोलते

ऐकून माझं अंतरंग डोलते

छळकुट्या

का ऐकवलीस अशी तान रे

 

 

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोर्निया )

ना तू दगाबाज ना मी दगाबाज आहे

 
(अनुवाद)

ना तू दगाबाज ना मी दगाबाज आहे
काय करावे अपुला मार्ग वेगळा आहे
जिथे गार गार हवा वाहत आहे
अपुली प्रीत तिथे जळत आहे
घरती अन अंबर नाराज आहे

ना तू दगाबाज ना मी दगाबाज आहे
काय करावे अपुला मार्ग वेगळा आहे
काल-आज सुद्धा प्रीत तरूण होती
मिलन आणि मिलन दुरावा कुठेच नव्हता
मात्र आज आपण दोघे असहाय आहोत

ना तू दगाबाज ना मी दगाबाज आहे
काय करावे अपुला मार्ग वेगळा आहे

सांगे दुनिया मार्ग अमुचे आम्ही धरावे
सांगे प्रीत मिठीत एकमेका घ्यावे
समजे ना हे अरिष्ट काय असावे
ना तू दगाबाज ना मी दगाबाज आहे
काय करावे अपुला मार्ग वेगळा आहे

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोर्निया )

सर्वानंद असेल जिथे

 

(अनुवाद)
सर्वानंद अ्सेल जिथे
वास्तव्य तुझे असेल तिथे
जीवनांद असेल जिथे
वास्तव्य तुझे असेल तिथे
सर्वानंद अ्सेल जिथे
हा अंध्कार पसंत आहे मला
कारण अपुली सावटसुद्धा
चुकनही न दिसे अपुल्याला
प्रकाशज्योत असेल जिथे
वास्तव्य तुझे असेल तिथे

चंद्रप्रकाश धूसर झाला जरी
दु:ख नसे माझ्या मनी तरी
रात्री तुझ्या रंजनीची सावट नसावी
चांदणीरात्र असावी जिथे
वास्तव्य तुझे असेल तिथे

सर्वानंद अ्सेल जिथे
वास्तव्य तुझे असेल तिथे
जीवनांद असेल जिथे
वास्तव्य तुझे असेल तिथे
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

आता माझा आनंद तुझ्या संगती

 

(अनुवाद)

आता माझा आनंद तुझ्या संगती
तुझ्या संगती माझी जीवन ज्योती
हो
आता माझा आनंद ही तुझ्या संगती

 

 

झाले जेव्हा वेडे हे हृदय तुझ्या वरती
काहिही म्हणू दे ही दुनिया मला
देऊ देत दुषणे मला हवी तेव्हडी
हो हो
आता माझा आनंद तुझ्या संगती
तुझ्या संगती माझी जीवन ज्योती
हो
आता माझा आनंद तुझ्या संगती

 
प्रीति करूनी तुझ्यावर होऊनी बदनाम
गेले दूर तुझ्या पासून
तुझ्या संगती राहून मी प्रिया
झाले मशहूर
पहा घेऊन कुठे चालली अपुली आत्मस्मृती
आता माझा आनंद तुझ्या संगती

 
हो हो
आता माझा आनंद तुझ्या संगती
तुझ्या संगती माझी जीवन ज्योती
हो
आता माझा आनंद तुझ्या संगती

 
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोर्निया )

वैमनस्य

(अनुवाद)

वैमनस्य असलं तरी दु:ख द्यायला ये
ये पुन्हा ये सोडून जाण्यासाठी ये

तोडीलेस जरी नाते तरी कधी ही ये
अनुष्ठान निभावण्यासाठी तरी ये
प्रीति छुपवीण्यात ही प्रीति असते
हळूच एके दिनी ते जाणण्यास तरी ये

थोडी तरी माझ्या प्रीतीची पत ठेव
तुझ्या तू कधी मला राजी करायला ये

जसे तू जाणतेस न येण्याचे बहाणे
असेच तू कधी परत न जाण्यासाठी ये

अजूनी तुझ्या प्रेमळ अंतरंगी वसे उत्साह
अखेरची ज्योत मालवण्यासाठी ये

ह्या वयात लज्जित अभागी तरूण मी
तू सुखात राहून मला रडविण्यास तरी ये

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोर्निया )

दोष कसा अंतराचा

(अनुवाद)
देऊ कसा दोष अंतराला जेव्हा
कोण कुणाशी प्रीती करते
न जाणे केव्हा कोण कुणाशी
प्रीती करते
उंच उंच महाला मधली छान छोकी
न माझ्या हाती,प्रिये,न तुझ्या हाती
पर्वताला मेघ जसे चिपकतात
जशा सागरात लाटा उसळतात
तशा चेहर्‍याअवर नजरा स्तब्ध होतात
हो,नजरा होत नाहीत स्तब्ध
दुनियेतल्या सर्व प्रसन्नतेवर,
देऊ कसा दोष अंतराला जेव्हा
न माझ्या हाती,प्रिये,न तुझ्या हाती
ये,माझ्या स्मरणामधे सर्व विसरूनी जाऊ
सार्‍या जगताला तुझीच प्रतीकृती बनवू
असेल जर माझ्या हाती अंतर चिरून दाखवू
तुझ्या नसा-नसातून रक्त प्रीतिचे वाहू

न माझ्या हाती,प्रिये,न तुझ्या हाती
देऊ कसा दोष अंतराला जेव्हा
कोण कुणाशी प्रीती करते

 

 

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोर्निया )

नका विचारू

नका विचारू मी कशी
ती रात्र गुजारली
क्षण एक जणू असा भासला
एक युगाची वेळ सरली
न पाहिला चंद्रमा पाहिले नच तारे
तहानले ज्योतीसाठी नेत्र बिचारे
पहाट येता आशा बहरली
किरणांची वाट दुरावली

नका विचारू मी कशी
ती रात्र गुजारली
एक जळे दीपक मन एक माझे
अंधार घरातला चिपकुनी राहे
त्रासूनी तडपूनी जीवन गेले

नका विचारू कशी मी ती
रात्र गुजारली
श्रीकृष्ण सामंत ( सॅन होझे कॅलिफोरनीया)

धर्म आणि ज्ञान

प्रकाश ज्या ज्या वेळी मला भेटतो त्यावेळी मला काहीतरी त्याच्या मनातलं सांगून जातो.धर्म आणि शास्त्रावर माझी त्याची बरेचवेळा चर्चा झाली आहे.ह्यावेळी त्याला सुचलं ते सांगताना मला म्हणाला,

“पूर्वी मी असं म्हणायचो की,धर्म हे एक शास्त्रच आहे.धर्माला ज्ञानाशी समझोता करावा लागतो.आणि असं करीत असताना,ते सापडून घेऊन आणि त्याचा पडताळा अशा तर्‍हेने करून पहावा लागतो की जणू शास्त्र विकसीत होण्यासाठी जसा मार्ग शोधीत असतं अगदी तसंच ह्या बाबतीत असावं.आणि मलाही वाटतं जसं हे मार्ग शोधीत असताना शास्त्र जसं विकसीत होत असतं अगदी तसाच धर्म विकसीत व्हावा लागतो.

आता मी जर म्हणालो शास्त्र आणि धर्म एकसारखेच आहेत आणि लोक शास्त्राकडे मिथ्या पहात असतात की शास्त्र हा ज्ञान मिळवण्यासाठी अपरिहार्य मार्ग आहे, तर कुणी एखादा धर्माविषयी माझं मत ऐकून माझ्याशी सहमत होणार नाही.
आणि त्यासाठी धर्माला आणि शास्त्राला काही खास असे नियम पाळावे लागतात.खरं पाहिलंत तर,खास करून,धर्माची आणि शास्त्राची जी काही विकासाची कारणं आहेत,ती सर्व पूर्वीच्या पुरूष आणि स्त्रीयांनी,ज्यांच्या जवळ एकाग्र रहाण्याची पर्याप्त क्षमता होती, त्यांनी आपल्या अनुभवाद्वारे जे काही ज्ञान प्राप्त होत गेलं ते उघड करण्याचे प्रयत्न केले,त्यावर ते विश्वास ठेवीत राहिले.हे करीत असताना जर का त्यांना आणखी काही सत्यता पडताळता आली तर ते तसं उपयोगातही आणू लागले.

हे करताना त्यांच्या अंगात प्रकांड नम्रता ठेवण्याची आवश्यक्यता असायला हवी,हे त्यांना भासलं असावं. कारण जे काही सत्य त्यांनी पडताळलं, ते जवळ जवळ नित्य मूलभूत विचाराशी आणि श्रद्धेशी विरोधात असायचं.अशा स्त्री पूरूषांची नावं न घेता उदाहरणं देता येतील.ह्या व्यक्तींनी स्वतःला पूर्णपणे सत्यासमोर निर्मळ आणि पारदर्शक ठेवलं.आणि त्याचं मुख्य कारण त्यांच्या अंतरात प्रेम होतं.

खरं म्हणजे प्रेमाचं खरं स्वरूप पहाण्यासाठी त्याची एक झलक पहावी लागते.एखादी व्यक्ती प्रेमात पडते त्यावेळी,मैत्रीसाठी व्यक्तीगत त्याग करण्यासाठी लागणारा अनुभव पाहिला जातो त्यावेळी,एखाद्या मुलाच्या आनंदात सहभागी होण्यात मनात येणारी उत्कंठा त्यावेळी दिसणारी झलक, वगैरे.

माझी धारणा आहे,जरी मी क्वचितच त्या धारणे प्रमाणे जगतो म्हणा,की, मी सत्यात जगू शकतो जेव्हा माझ्या मनातली भीती मी अव्हेरतो,माझ्या प्रेमात सत्यता आणि आनंद ह्यांना स्थान देतो,.जर प्रेम हे सत्य असेल तर हे प्रेमच मला इतरांशी जखडून ठेवत असावं.

दररोजच्या जगण्याच्या धांदलीत,प्रेमापासून असफल होण्याच्या कोणत्याही प्रसंगाला सामोरं जाणं मला अमंळ कठीण होत असतं.धर्माच्या परंपरांनी,आपल्या भावना एव्हड्या घट्ट बांधल्या गेल्या आहेत की,कधी कधी असं वाटतं की,खरोखरच आध्यात्मिक दृष्टीकोनातून सौन्दर्य,कला,नाट्य,संगीत आणि पदन्यास यांच्या माध्यमातून माणसाला प्रेमाकडे ओढलं जातं.

अशा ह्या निर्णयाला मी आलेलो आहे याचं कारण,स्त्री,पुरूष,मुलं एकमेकावर प्रेम करून प्रेमाचा खरेपणा दाखवून देतात ते पाहून,तसंच बरोबरीने शास्त्र आणि धर्म ह्याबद्दल अगाध महत्व दाखवणारे त्याचे प्रवर्तक आणि त्यांचं लिखाण वाचून ह्या स्तराला आलो आहे.”

माझ्या चेहर्‍यावरचं समाधान बघून प्रकाश खूष झाला.
श्रीकृष्ण सामंत (कॅलिफोरनीया)

माझा हा एक-हजारावा (१०००वा) पोस्ट.

१ जानेवारी २००७ पासून मी माझा “कृष्ण उवाच” हा ब्लॉग लिहायला घेतला. ह्या वर्ष अखेर बारा वर्ष होतील ह्या लिखाणाला. गेली बारा वर्ष मी ह्या ब्लॉगवर
सातत्याने लिहीत आलो आहे.
हा एक-हजारावा पोस्ट मी माझ्या मुलीला समर्पण करीत आहे.
(माझे मित्र श्री.डोंगरे ह्यानी अलीकडेच मला एक लेख पाठवला होता.त्याचं शिर्षक होतं
“*’परदेशस्थ’ मुलीचं पत्र*
थोडक्यात पत्राचा गोषवारा असा होता की,परदेशात राहाणारी मुलं जन्मदात्या आईवडिलांना भारतात वा-यावर सोडून ही मुलं स्वत: परदेशात कशी चैनीत जगतात अशा प्रकारच्या चर्चा नेहमी ऎकल्या जातात.पण या परदेशात राहणाऱ्या, सेटल होणाऱ्या मुलांचीही काही बाजू आहेत.असं लिहून नंतर सत्य परिस्थितीला धरून त्या पर्त्रात मुद्दे मांडले आहेत.
तेच मुद्दे किंवा त्या जवळचे मुद्दे घेऊन नव्हेतर काहीवेळा जसेच्यातसे मुद्दे घेऊन एखाद्या परदेशस्थ मुलीच्या घरी जर का तिचे आईबाबा तिच्या जवळ येऊन कायमचे रहात असतील, तर त्या मुलीला काय वाटत असेल असा विषय घेऊन चर्चा करण्याचा प्रयत्न ह्या लेखात केला आहे.)

” हाय आई अणि बाबा

कसे आहांत? तसं हे विचारायचं आत्ता लगेच काही कारण नाही,कारण रोजच आपण संध्याकाळी भेटतो.कधी बागेत,तर कधी घरीच कधी तुमच्या बेडरूममधे तर संध्याकाळी तुम्ही आणि आई तुम्हाला आवडणार्‍या मराठी मालिका टीव्हीवर बघत असताना.
आपण एकमेकांना मिस करत आहो असं कदापीही मला म्हणावं लागत नाही. त्याचं विशेष कारण तुम्ही आमच्याजवळच इकडे अमेरिकेत कायम राहायलाच आला आहांत.एवढ्या दिवसांची सवय झालीय ना! मुलं तर आजी आजोबांना विशेष जवळची वाटतात.आपलं नेहमीचंच रुटीन चालू असतं.
भारतात तुम्ही तुमची मित्र मंडळींची गेट टूगेदर्स, गाण्याचे कार्यक्रम, जिम वगैरे मध्ये व्यस्त असायचा.पण हळू हळू ते तुमच्या आठवणी पुरतंच आता राहिलेलं आहे.आणि ते स्वाभाविक आहे म्हणा. आणि आम्ही आमचं काम, मुलांच्या शाळा, अशा रुटीन मध्ये व्यस्थ असतो म्हणा.
तसे आपण आठवड्यातून एकदा विकेंडवर भरपूर गप्पा मारीत असतो.आणि तसं न करायला वेळ मिळत नाही असं कधीच होणार नाही.कारण तुम्ही आमच्या जवळच असता.किती भाग्यवान आम्ही आहोत ना? आई,बाबा जवळ आहेत आणि आम्ही मुलं तुमच्या जवळ आहोत ह्याचं कारण तुम्ही त्यावेळी घेतलेला आमच्याजवळ रहाण्याचा निर्णय आज सुखावह वाटतो.तुमच्या ये-जाच्या चक्करा वाचल्या हे काय कमी आहे का?
हे सगळं खास कारणासाठी मुद्दाम लिहीत आहे.परदेशात राहणा-या, सेटल होणा-या भारतीय मुलांविषयी मिडिया मधून, बातम्यांमधून किंवा व्हाटस् अप मधून फिरणा-या पोस्टर्स मधून, ही मुलं कशी स्वार्थी, बेजबाबदार आहेत, जन्मदात्या आईवडिलांना वा-यावर सोडून ही मुलं स्वत: कशी चैनीत जगतात अशा प्रकारच्या चर्चा मी नेहमी ऐकते, वाचते.पण हे वाचून मी मात्र मुळीच अस्वस्थ होत नाही.
चित्रपटांमधून, टी व्ही वरच्या मालिकांमधूनही काही अपवाद वगळता पुष्कळदा असाच सूर आळवलेला असतो. काही अंशी ते खरं असेलही.
आम्ही शिक्षणासाठी इथे आलो तेव्हापासून, पहिली काही वर्ष खूप अवघड होती आपल्या दोघांसाठीही. रिकामं घर तुम्हाला खायला उठलं असणार आणि आम्ही पहिल्यांदाच घर सोडलेलं, तुमच्यापासून एवढं लांब असण्याची कधीच सवय नाही… बाकी सगळं सोडा, पण साधं स्वतःचं स्वतः करून खायचीही कधी गरज पडली नव्हती त्या आधी.
इथे आलो आणि सगळंच अंगावर पडलं तेव्हा आई बाबांचं नुसतं असणं म्हणजे काय चैन आहे याची पहिल्यांदा जाणीव झाली.

पण नवीन जग होतं, नवीन अनुभव मिळत होते आणि भरपूर उत्साह होता. त्याच्या जोरावर आम्ही इथे जम बसवला. शिक्षण झालं, काम सुरु केलं…
डोक्यात हा विचार पक्का होता इथे नोकरी करायची,पैसे मिळवायचे.इथं एक सुंदर घर घ्यायचं आणि आईबाबा म्हातारे होतील तेव्हा किंवा शक्य झाल्यास त्या अगोदर आपण त्यांना इकडे बोलवायचं आणि तेव्हा आपण त्यांच्या बरोबर असूच असू.
नंतर लग्न झालं, मग मुलं झाली. मुलांच्या निमित्ताने तुमच्या भरपूर फेऱ्या झाल्या इथे! आपल्याला परत एकमेकांचा छान सहवास मिळाला पण मुलांच्या जन्मानंतर काहीतरी बदलत गेलं आमच्या मनात, आमच्याही नकळत! आत्तापर्यंत भारतात परतण्याबद्दल मनात जी क्लॅरिटी होती, तिच्या जागी वेगवेगळे विचार डोकं वर काढायला लागले. तुमच्यासाठी, घरासाठी, जुन्या मित्र मैत्रिणींसाठी, नातेवाईकांसाठी भारतात परतण्याची मनापासून इच्छा अजूनही कायम होतीच. किंबहुना मुलांचं आपल्या परिवाराशी घट्ट नातं निर्माण व्हावं यासाठी परत जायलाच हवं असं ठामपणे वाटत होतं. आपण जसे वाढलो, भारतीय कल्चर मधल्या ज्या गोष्टींचा, ज्या संस्कारांचा आपल्या जडणघडणीमध्ये एवढा मोठा वाटा आहे, ते संस्कार आपल्या मुलांवरही व्हायलाच हवेत असं माझं तरी संपूर्णपणे ठाम मत होतं आणि आहे.
मागच्या खेपेला तुम्ही आणि आई आला होता त्यावेळी आपण ह्या अनुषंगाने चर्चा केली.आमचं नशीब एव्हडं चांगलं की तुम्हीसुद्धा सकारात्मक विचार करून थोडा त्याग थोडं प्रेम आणि भरपूर समजूतदारपणा ह्यांची सांगड घालून आमच्या कडे इकडे रहायचं कबूल केलं.आता तर सोडूनच द्या पण इथे रहायचा त्यावेळी, तुम्ही इथे रहाण्याचा निर्णय घेतला त्यावेळीसुद्धा भारतातल्या काही गोष्टींकडे पाहण्याची आपली दृष्टी हळूहळू बदलत आहे याची जाणीव मला व्हायला लागली होती.
भारतात,आपल्याकडल्या जीवनपद्धतीतले काही प्रश्न, जे फक्त स्वतःचा विचार करताना तितके महत्त्वाचे वाटले नव्हते तेच मुलांच्या दृष्टिकोनातून पाहताना जास्त ठळकपणे भेडसवायला लागले. प्रचंड प्रमाणात वाढलेली गर्दी, सदा सर्वदा जाम झालेलं ट्रॅफिक आणि प्रदूषण सगळ्याच बाबतीत आणि मुख्य म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत चालणारा भ्रष्टाचार, त्यातून मुलांच्या डोक्यावर स्पर्धेचं, यशस्वी होण्याच्या दडपणाचं असलेलं प्रचंड ओझं, एकूणच सततचा संघर्ष आणि सुरक्षिततेची भावना या आणि अशा कित्येक गोष्टी एक व्यक्ती म्हणून आपण सहन करू शकतो, किंबहुना या सगळ्याशी सामना करतच आपणही भारतात लहानाचे मोठे झालो आहोत हे खरं! पण दुसरीकडे, इतकी वर्षं दुसऱ्या देशात चांगला जम बसवून चांगला पर्याय, चांगल्या संधी आपण आपल्या मुलांसाठी निर्माण केलेल्या असताना त्यांनाही याच चक्रातून जायला
लावावं का असा प्रश्न जेंव्हा मी स्वतःला विचारला तेंव्हा त्याचं प्रामाणिक उत्तर ‘नाही’ असंच माझ्या आतून आलं.
इथे सगळं काही आहे, पण माझ्या आईबाबासकट आपलं कुटुंब नाही याकडे माझं मन कधीच दुर्लक्ष करू शकलं नाही. इथल्या लोकांची एंजॉयमेन्टची व्याख्या सुद्धा माझ्या कधीही पचनी पडली नाही. क्लबींग करणारी, ड्रिंक्स घेण्यात मिरवण्यासारखं काही आहे असं मानणारी मुलगी मी तेंव्हाही नव्हते आणि अजूनही नाही. माझ्या आनंदाच्या जागा होत्या माझे आई बाबा.
तुम्ही दोघांनी इथं रहाण्याचा निर्णय घेतल्यामुळे तुम्हाला सोडून रहायला येणारी अपराधीपणाची भावना माझ्या मनात मुळीच आली नाही. आपले आई वडील आणि आपली मुलं यांच्यामध्ये निवड करायची माझ्यावर माझ्या नशीबानें पाळीच आली नाही.आमचं तुमच्यावर अतिशय मनापासून प्रेम आहे.
काहिंचे आईबाबा इथे त्यांच्याबरोबर राहू शकले नाहीत.कारणे अनेक असतील आणि प्रत्येकाची परिस्थितीही निरनीराळी असेल आणि त्यांच्या दृश्टीने ते अगदी योग्यही असेल पण आईबाबांना सोडून इथे रहायचं ह्याचा विचार येऊन त्यांचं मन सद्गदीत होणं स्वाभाविक आहे.
इकडे कधी कधी आम्ही एकत्र भेटलो की, त्यातले काही बोलूनही दाखवायचे की,
“आई बाबांना सोडून कायमचं इथेच कसं काय राहायचं या एका प्रश्नावर विचार करण्यात आमचे कित्येक तास, कितीतरी शक्ती खर्ची पडली आहे. दर वीकेंडला इथल्या मित्र-मैत्रीणी बरोबर रात्र रात्र जागून ज्या चर्चा व्हायच्या त्यात हा विषय सगळ्यात मोठ्ठा असायचा. आम्हीही आता आई बाप आहोत. मुलांवरचं प्रेम म्हणजे काय असतं, ती अॅटॅचमेंट कशी असते याची आम्हालाही थोडीशी झलक मिळालीय. कालांतराने आपले आई वडील म्हातारे होतील, आत्ता त्यांना रिकामपण जाणवतंच पण काही काळानं आपली खरीखुरी, प्रत्यक्ष गरज पडेल. तेव्हा आपण वेळेला जाऊ शकू ना? अचानक त्यांच्या तब्येतीचं काही कमी जास्त झालं तर? देव न करो पण रात्री अपरात्री फोन तर नाही ना येणार एक दिवस? काही न बोलताच निरोप घ्यावा लागला तर.. हे विचार मनात येऊ द्यायचे नाहीत म्हटलं तरी, ब्रह्मराक्षसासारखं त्यांचं अस्तित्व सतत मनाच्या एका कोपऱ्यात जाणवत असायचं.”
अशा ह्या ब्रम्हराक्षकासारख्या विचाराचं दडपण माझ्यावर येत नाही.कारण तुम्ही दोघं आमच्या सभोवती कुठे ना कुठे असता.मला एक प्रसंग आठवतो.माझा एक बॉस होता.त्याची स्टोरी अशी की,
“तो हट्टानं त्याच्या आई वडिलांना इकडे घेऊन आला. मला सांगत होता की ते कधीच इथे रमले नाहीत. शेवटपर्यंत त्यांच्या घराची आठवण काढत असायचे. त्याचा गिल्ट असा की इथे आणूनही तो त्याच्या आई वडिलांना सुखी ठेऊ शकला नाही. मला म्हणाला की आयुष्यभर ही बोच राहील मनात.”

परंतु, तुमच्यावर हा निर्णय जबरदस्तीनं लादण्याचा आमच्यावर प्रसंग आलाच नाही आणि जिंकण्या हरण्याचा प्रसंग ह्यात मुळीच नव्हता ह्याची मला जाणीव होती.
मला वाटतं की हा निसर्गाचा नियम आहे. प्रत्येक पिढी ही पुढच्या पिढीचा विचार करून निर्णय घेत असते. मागच्या पिढीशी नातं कितीही घट्ट असलं तरी जेंव्हा प्राधान्य कशाला द्यायचं ही वेळ येते तेंव्हा ती पुढच्या पिढीलाच द्यावी लागते किंवा दिली जाते. तुमचंही तसंच नाही का? तुम्ही दोघंही कोकणातून मुंबईत आलात. शिक्षणासाठी, नोकरीसाठी.. आमच्यासारखंच! मग आमचा जन्म झाल्यावर तुम्ही तुमच्या गावाला परत गेला असता, आम्हाला घेऊन? आम्हाला चांगल्या संधी मिळाव्यात, आमच्या आयुष्याला वेगळी दिशा मिळावी म्हणून तुम्ही जसं गाव सोडून शहरात स्थलांतरित झालात, तसाच इकडे स्थायिक होण्याचा निर्णय मला आमच्या मुलांसाठी घ्यावासा वाटला. आता हा फरक आहेच की आपल्यातलं अंतर खूप जास्त आहे. तुम्ही, मनात आलं की तास दोन तासात तुमच्या आई वडिलांना भेटू शकत होतात. हेच लक्षात घेऊन तुम्ही माझ्याकडे रहाण्याचा व्यवहारीक निर्णय घेतलात.
आजारी पडलं की रात्र रात्र उशाशी बसून तुम्ही केलेली जागरणं आठवतात, कधी काही मनाविरुद्ध घडलं की तुम्ही समजावलेलं आठवतं, अपयश आलं तर तुम्ही दिलेलं प्रोत्साहन आठवतं, आम्हाला घेऊन केलेल्या ट्रिप्स आठवतात, अवघड आर्थिक परिस्थितीतही आमच्या गरजांना प्राधान्य दिलेलं आठवतं. कधीही काहीही अडचण आली तर पर्वतासारखा खंबीर आधार होतात तुम्ही माझा, आणि अजूनही आहात. तेंव्हा आता आमच्या ह्या वयातही तुम्ही आम्हाला सहवास देतात तेंव्हामला खूपच धन्य-धन्य वाटतं.
तुम्ही जो ठेवा आम्हाला दिलाय तोच आम्ही आमच्या मुलांना द्यायचा प्रयत्न करतोय.आणि आनंदाची गोष्ट म्हणजे त्या प्रक्रियेत तुम्ही आमच्याबरोबर साक्षीला आहात.अहो भाग्यम!
उद्या आमची मुलं आम्हाला सोडून दुसऱ्या देशात जातील. त्यांना काही वेगळी क्षितिजं खुणावतील.मग आम्ही तुमच्या जागी असू.आम्हाला हे स्वीकारणं कदाचित सोपं जाईल. कारण ती गेली तरी तुम्ही आमच्याबरोबर असणार.माझं हे म्हणणं जरा हास्यास्पद वाटेल तुम्हाला, पण मला तुमचा हेवा वाटतो कधी कधी.
आम्ही तुमच्या वयाचे होऊ ना, तेव्हा आमची मुलं तर नसतीलच आमच्यापाशी शिवाय मोजके चार मित्र सोडले तर बाकीही फार कोणी नसेल, कारण इथल्या लोकांशी तशी मैत्री, तसे संबंध निर्माण होऊच शकत नाहीत. पण आमची मुलं लहान असल्यापासून तुम्ही त्यांच्या संगतीत असल्याने तुम्ही आमच्यावर जसे संस्कार केलेत तसे नकळत त्यांच्यावरही कशावरून झाले नसावेत.निदान तसं वाटून घेणं गैर होईल असं मला वाटत नाही.
आपल्या भारतीय संस्कृती मध्ये प्रेम व्यक्त करण्याची पद्धत नाही. प्रत्येक वेळी फोन वर बोलून झाल्यावर love you म्हणलं की ते प्रेमाचं प्रदर्शन वाटतं आपल्या लोकांना.आणि काही अंशी ते खरं आहे असं मला वाटतं.प्रेम व्यक्त करण्याच्या अनेक पद्धती आहेत.आपण एकमेकांजवळ राहून त्या सहवासातून सतत प्रेम व्यक्त होतच असतं ही पण प्रेम व्यक्त करण्याची एक पद्धतच नव्हे काय?
इथे राहिल्याने इथे येणारी आव्हानं वेगळीच!तुमचा इथे आमच्याबरोबर रहाण्याचा विचार पक्का झाल्यावर,इकडे रहाण्यासाठी लागणार्‍या इकडच्या जरूरीच्या प्रक्रिया करायला सुरवात करून तुम्ही ग्रीन कार्ड मिळवू शकला. आईवडील आणि मुलं ह्यांची फारकत करू देणं म्हणजे कुटूंबात विभक्ती होत असल्याने आईवडीलांएव्हडं जवळच नातं नाही असं समजून ग्रीन कार्ड देण्यासंबंधाचे इकड्चे कायदे तुमच्या दृष्टीने आपल्याला फायद्याचे ठरले.
नंतर सतत पाच वर्ष तुम्ही इकडे राहिल्याने अमेरिकन सिटीझनशीपसाठी पात्र ठरल्याने तुम्ही दोघांनी मेहनत घेऊन सिटीझनशीपच्या इंटर्व्य्हूसाठी लागणार्‍या माहीतीचा अभ्यास करून तुम्ही ती मिळवलीत.
अमेरिकेत कायमचंच आमच्याबरोबर रहायचा तुमचा इरादा कायम झाल्याने तुम्ही भारताततून जवळ जवळ गाशा गुडाळून इकडे आला.”गाशा गुंडाळणं”हा तुमचाच शब्द आहे हे मला निक्षून माहित आहे.त्याबद्दलचे बरेचसे किस्से तुम्ही मला सांगीतले आहेत ते मला आठवतात.
तुमचे हितचिंतक आणि तुमचे स्नेही तुम्हाला म्हणायचे,
“गाशा गुंडाळून तुम्ही जात आहात.पूर्ण विचार करा.”
“ताट द्यावं पण बुडाखालचा पाट देऊ नये.”
“आम्ही असल्या बर्‍याच “स्टोरीझ” ऐकल्या आहेत.पटत नाही म्ह्णून परत आलेले आहेत.”
“आता ठीक आहे पुढे जास्त वय झाल्यावर तिकडचा बर्फ आणि थंडी सोसण्याचा आपला पिंड नाही.मग विचार बदलावा लागेल.(अमेरिकेत सगळीकडे सतत बर्फ पडत असतो
आणि कायमची थंडी असते असं माझ्या काही जवळच्या नातेवाईकांना वाटतं असं तुम्ही त्यावेळी म्हणाला होता.)”

“जवळची माणसं इशारा देतात तो “भिवा” आणि इतर इशारा देतात ती “भीती”
असंही एकदा बोलता बोलता तुम्ही म्हणाल्याचं आठवतं. असो.
तुम्हा दोघांचं अमेरिकेत येऊन आमच्याबरोबर रहाण्याचं पक्क ठरलं होतं.त्यामुळे भिवा आणि भीती ह्या दोघांचीही पर्वा नकरता इकडे येण्याचा तुमचा निर्णय ठरलेला होता.आता तुम्ही जास्त वयस्कर होत राहिला आहांत.ह्या परिस्थितीत तुम्हाला मस्त मजेत ठेवणं आणि तुमच्या तब्येतीची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे.तुम्ही आणखी खूप वर्षं जगावं म्हणून प्रयत्नाची मी पराकाष्टा करीत रहाणार.त्यासाठी तुम्हाला वेळेवर डॉक्टरांकडे चाचाणीसाठी नेणं,तुमचं औषध वेळेवर आणणं आणि ते वेळेवर देणं ह्याची काळजी घेताना मनात भरून येतं.नातवंडं आपल्या आजीआजोबाकडून भरपूर लाड करून घेत आहेत,सारा वेळ एकत्र घालवता येत आहे आणि ह्याचं सर्व कारण की तुम्हाला fit रहाण्याशिवाय पर्याय नाही हे तुम्हालासुद्धा कळलं आहे हे किती उत्साहवर्धक वाटतं.
आणि तुम्ही सांगत आला आहात,की एकमेकाचे “संबंध” हे खणखणीत वाजणार्‍या नाण्या सारखे असतात.आणि ह्या “संबंधाचं नाणं” एका बाजूला “प्रेम” आणि दुसर्‍या बाजूला “त्याग” अशा दोन बाजूंचं असतं आणि त्या नाण्याची घडण ही “समजूतदारपणाच्या” धातूने बनलेली असते.ह्या तिन्ही गोष्टी चोख असतील तर ते नाणं खणखणीत वाजणार.म्हणजेच आता आपले संबंध आहेत तसे.
हे पत्र तुम्हाला लिहित असतानां,ज्यांचे आईबाबा त्यांच्याजवळ इथे येऊन रहात नाहीत (अनेक संयुक्तीक कारणं असतीलसुद्धा) त्यांना किती दु:ख होत असेल याची कल्पना मला आहे आणि त्यांच्या भावनेचा आदर माझ्या मनात आहे.
आणि ज्यांचे आईबाबा त्यांच्याबरोबर रहात असतील त्यांनाही माझ्यासारखी आनंदाची परिस्थिती असेल ह्याचीही मला खात्री आहे.

शेवटी,हे सर्व मी तुमच्याशी पत्ररुपाने बोलत असताना मला एक गोष्ट तुम्हालाच सांगाविशी वाटते ती अशी,की आपले आईबाबा आपल्या जवळ असण्याची जाणीव आईबाबांची उणीव वाटण्यापूर्वीच व्हायला हवी.ही एकच ओळ मला आनंदाने जगायला स्फुर्ती देत,आनंद देते.
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)