वहितला एक उतारा—मनोदशा

माझ्या वहितला एक उतारा.मला आठवतं हे लिहायला त्या दिवशी मी का उद्युक्त झालो होतो.शेतावरची कामं त्या दिवशी मनासारखी होत नव्हती.बरेच कामगार एनंकेनं कारणाने गैरहजर होते.जरूर ती कामं होणार नव्हती.वैताग आला होता.दिवस कसातरी संपायला आला होता.घरी जायचं मूड नव्हतं.आजही तसंच वाटत होतं.म्हणून वहितला उतारा वाचत होतो.

“मला असं वाटतं की,( मूड ) मनोदशा सतत बदलत असते आणि काही सेकंदात बदलली जाऊ शकते.जीवनातला एखादा क्षण पुसला किंवा बदलला जाऊ शकत नाही, परंतु केवळ आठवणींच्या संदर्भातून मागे वळून पाहिलं जाऊ शकतं.मी रोज जे जीवन जगतो,त्यातून घडणाऱ्या घटना आठवणींच्या रूपात माझ्या मेंदूत एखट्या करून ठेवल्या जातात.आणि त्या माझ्या आयुष्याच्या एक भाग बनतात. दिवसाची सुरुवात वाईट होऊ शकते,पण जसजसा दिवस पुढे जातो तसतसा तो दिवस चांगलाही होत जाऊ शकतो.

मी प्रेम आणि हृदयविकाराची भावना, निरुपयोगीपणा आणि अस्वस्थतेची भावना अनुभवली आहे;आणि माझ्या संघर्षाच्या कालावधीनंतरही, ज्यांना खरोखर माझी काळजी आहे ते मला पुन्हा माझ्या पायावर उभे करण्यासाठी पूढे येतात.
मला असं वाटतं की,मी कोण आहे किंवा मला काय आवडतं याने काही फरक पडत नाही,परंतु मी कुठे आहे ही गोष्ट सर्व फरक करतं.

काही लोक संगीतकार होण्यासाठी धडपडतात, कारण त्यांना संगीत आवडतं,काहींना कलेत जाण्याची आवड असते,कारण त्यांना नृत्याची आवड असते. इतर लोक डॉक्टर, वकील,क्रिडापटू,शिक्षक किंवा त्यांना जे काही आवडतं ते काहीतरी महान बनण्याच्या प्रयत्नात असतात.जीवनात प्रत्येकासाठी काही ना काही असतं आणि मी कोण असायला हवं ते जीवनात ठरलेलं असतं.

मला जे आवडतं ते महत्त्वाचे नाही,मला त्या विशिष्ट गोष्टीत आनंद मिळू शकत नाही जोपर्यंत माझं प्रेम सामायिक करणारे लोक आजुबाजुला नसतात.
उत्कटतेचा अर्थ अनेकांमध्ये एखादी गोष्ट सामायिक करणं आणि त्यातून आनंद घेणं असा आहे.ते मला खरोखर आनंदी बनवतं.”

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*