आज तळ्यावर मी आणि श्री.समर्थ असे दोघेच गप्पा करत होतो.आज प्रो.देसाई त्यांच्या खाजगी
कामामुळे येऊं शकले नव्हते.
समर्थांच्या मनात कसलातरी नवीन विषय डोक्यात होता.
मला म्हणाले.
“सामंत,
माझी अशी समज आहे की आपण सगळे तसं पाहिलत तर एकटेच असतो.सगळे आपण मिळून एकटे आहोत.
तुमचे विचार मला कधीच कळणार नाहीत,तुमचे सत्यही मला कळणार नाही.आणि माझ्याकडून मी तुम्हाला कितीही सांगायचे प्रयत्न केले तरी ते तुम्हाला कळणार नाही.माझ्या कवितेतून मी तुमच्यासाठी एक चित्र चित्रित करू शकतो. आणि त्या चित्रामधली एक झलक दाखवू शकतो. मी तुम्हाला एखादी गोष्ट सांगू शकतो त्यामुळे मी काय आहे हे तुम्हाला कळू शकतं मी ते सर्व कितीही प्रकारे रूपांतरित करण्याचा प्रयत्न केला तरी त्यातले वापरलेले कुठलेही शब्द ते सन्मिलित करू शकतील.आणि म्हणूनच मी म्हणतो की आपण वेगवेगळे आहोत.”
मी समर्थांना म्हणालो,
हे बघा,एकटं असणं ही काही वाईट गोष्ट नाही.एकटं असणं म्हणजे कुणाशी संबंधात नसणं असं नाही.त्यासाठीच मी म्हणतो की माणसाने एकमेकांवर प्रेम करावं.त्यामुळे एक्मेकाला एकटं असण्याचं भान राहत नाही.म्हणूनच मला वाटतं की आपण एकमेकावर प्रेम करावं, कुणीतरी आपल्याशी बोलेल ह्याची तजवीज करावी,त्यामुळे आपण एकमेकास आवडत रहातो,आपणाला वाटूं लागतं की आपण एकटे नाही आहोत.”
माझ्याशी श्री.समर्थ सहमत होऊन म्हणाले,
“ह्यासाठीच मी म्हणतो की,शब्द महत्वाचे असतात,कला महत्वाची असते,संगीत महत्वाचं असतं.हे नसलं तर दुसर्याला आपण आपल्या समीप कसं आणता येईल? म्हणूनच मला चित्रकार होणं,गायक होणं,लिहित रहाणं आवडतं.ह्यात माझं प्रतिबिबं दिसतं.ह्यातूनच काही वेळ मी तुम्हाला माझ्या समीप आणू शकतो.”
समर्थांच्या ह्या शब्दाविषयी,कला, संगीतविषयी मुद्द्यांची सत्यता पाहून मी म्हणालो,
“ह्या सत्याचे आपण सर्व नंतर हिस्सेदार होतो.आपल्या जवळ असलेला सारखेपणा हा आपल्याजवळ असलेल्या फरकापेक्षा जास्त उठवदार दिसतो.आपल्या प्रत्येकाला विचारशक्ती आहे.आणि आपले सर्वाचे काही लक्षं,इरादे ही आहेत.आपल्या प्रत्येकाजवळ काही कल्पना असतात,मतं असतात,आणि दुःखही असते त्याचे आपण सर्व हिस्सेदार असतो.”
समर्थ म्हणाले,
“तसं पाहिलंत तर ह्या सर्व सत्य गोष्टी आपल्या एकएकट्याच्या डोक्यात असतात.आणि आशा करीत असतो की,एकमेकाशी सहभाग ठेऊन आणि त्या गोष्टीचे हिस्सेदार होऊन आणखी कुणाला तरी थोडा वेळ का होईना निमंत्रण द्यावं.आपण कुणा दुसर्याला आपलं मन आणि आपले विश्वास समजायला मदत करावी.
माझा एकलेपणावर विश्वास आहे.मला मनाचं एकटेपण आवडतं,आणि आपलंच असं एकांडी खासगी जग असावं असही वाटतं.दुसर्यांच्या सत्यतेच्या पासून अद्वितीय आणि अलग असावं.ह्या आपल्या जगात आपण, काही निर्माण करतो,आपण त्याचं अधःपतन ही करतो,आपण काही शोधून काढतो आणि त्याचं आपण भानही ठेवतो.आणि काहीवेळा ह्या तीनही गोष्टीत दुसर्याला भागिदार पण करून घेतो.त्यामुळे आपण जगाशी संबंधीत आहो हे पण आपल्याला समजतं.”
आमची चर्चा खुपच रंगात आली होती.प्रो.देसाई ह्या चर्चेत सामील असते तर आणखी रंगत चढली असती.
“पुढे कधीतरी आपण हा विषय, भाऊसाहेब असताना काढून बोलूया “
असं मी म्हणालो.
उठता, उठता समर्थ म्हणाले,
“माझी समज आहे की,एखाद्या व्यक्तीला आपण पूर्णपणे समजून घेऊं शकत नाही.आपण फक्त त्याच्याकडच्या ज्ञानाचे भागिदार होतो.त्यातून उरलेलं जर काय असेल तर तो फक्त एक चम्त्कारच असावा असं मला वाटतं.”
आमचा वेळ मजेत गेला.एव्हडी उद्बोधक चर्चा होईल असं सुरवातीला वाटलं नव्हतं.