प्रीती करावीशी वाटली,तर कुणावर प्रीती करावी

मन तर मनासारखं आहे,त्यावर निष्ठा ठेवावी
प्रीती करावीशी वाटली,तर कुणावर प्रीती करावी
तुझ्या स्मरणात हरवले,रात्रभर निद्रा नाही आली
माझ्या मनाचीअवस्था,कुणा ज्ञात नाही झाली

दीर्घ समयाचे त्रस्त नेत्र,तहानने जागलेल्या रात्री
येत येत आलेली,मनातली ओठांवरची कहाणी
तुझ्या प्रेमास्तव,माझ्या मनावर,व्हावी इष्टापत्ती
व्याकुळतेत मिळे चैन त्यात कसली महती

वास करीती माझ्या मनात, नशाधूंद तुझ्या रात्री
विळखा तुझ्या बाहूंचा, अंगाला माझ्या घेरी
विरह मला सहन होईना,चैन मनाला न येई
प्रीती करावीशी वाटली,तर कुणावर प्रीती करावी

जायचे आहे आता, तुझ्या नेत्र पापण्या खाली
अशक्य आहे आता,दिनरात्र साद तुझ्या नावाची
धडक येई मनात काय करावे फिरफिरूनी
मन तर मनासारखं आहे, त्यावर निष्ठा ठेवावी
प्रीती करावीशी वाटली तर कुणावर प्रीती करावी

आई घरात असतां घर,घरासम भासले

क्षीण आवाज ऐकून किती पहारे ठेवावे
आजचा श्रावण पाहून किती चेहरे रंगवावे

आई घरात असतां, घर घरासम भासले
आता मुलांनी,घराचे बहूत विभाग केले

आशेचे खूले गगन अमूचे बाबा होते
आता सगळे स्वप्न हळुवार भंग झाले

सर्व नातीगोती तुकडे तुकडे होऊन विभागली
कुणास ठाउक दुःख्खें किती हिश्शात विभागली

एक नियम नाही हर एका मध्ये
हर रूपांवर दुसरे रूप विभागले

आई घरात असतां घर,घरासम भासले

मौन

माझा मित्र,भाई नेरुरकर,हा एक एक्स्पर्ट सायकोलॉजीस्ट आहे.त्याने अलीकडे,”मौन आणि माझे रूग्ण” ह्या नावाने एक पुस्तक लिहिलं आहे.
मला जेव्हा हे कळलं तेव्हा त्याला शुभेच्छा देण्यासाठी मी त्याच्या घरी गेलो होतो.
मला त्याने एक त्या पुस्तकाची कॉपी दिली.
मी त्याला म्हणालो हे पुस्तक मी पूर्ण वाचीनच पण थोडक्यात लिखाणाचा आशय सांग.

त्यावर भाई मला म्हणाला,
“माझा मौन राहण्यावर विश्वास आहे. क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून मी माझा दिवस सतत बोलण्यात घालवतो. थेरपीचे रुग्ण सतत येत असतात आणि आम्ही बोलत असतो. कधीकधी शब्द शक्तिशाली, हृदय पिळवटून टाकणारे,असतात. कधी कधी,शांतता असते.

मी त्या शांततेवर अधिक विश्वास ठेवतो.
त्या शांततेची विलक्षण भाषा शिकलो आहे. माझे रूग्ण आणि मी,आपल्या शांततेत बोलतो. कधी, कधी भीतीची शांतता असते.जी भीती आमच्यामधली जागा भरते. अशावेळी स्वतःला पटवून देण्यासाठी धडपडत असतो की, एकमेकांशी संपर्क ठेवणं आवश्यक आहे.

मौनामुळे मी माझ्या रूग्णापासून कोसो मैल दूर बसलो आहे आणि आमच्या दोघा मधल्या पसार्यात जखमा भरल्या आहेत, अशी कल्पना जरी करू शकलो तरी माझं मौन सांगतं,
तू अजुनही तिथेच आहेस,तुझ्यात आणि तुझ्या रूग्णात, काही न बोलता शांतता आहे आणि काहीही न बोलता, तुमच्या दोघांमधला, विश्वास, अविश्वास व्यक्त करू शकता,जे बोलण्याने शब्दही करू शकतात.पण कधी,कधी शब्द नुकसानीही करू शकतात.

फार पूर्वीपासून मी संगीत शिकत आलोय. संगीतात आणि माझ्या मौनात मी एक साधर्म्य पाहिलं आहे की,संगीतात नोट्स हे शब्दासारखे असतात आणि दोन नोट्स मधली शांतता ही आपल्या संवादातल्या शब्दा मधल्या शांततेसारखी आहे.
अशा ह्या प्रक्रियेमुळे जसं संगीत तयार होतं,तसंच मी आणि माझ्या रूग्णामधे होत असलेले संवाद आणि मौन ह्यातून सत्य निर्माण होतं.

म्हणून माझा मौनावर विश्वास आहे.माहित असलेलं आणि न माहित असलेलं, माझ्यात आणि माझ्या रूग्णामधलं मौन हेच रूग्णांवर उपचार करायला कारणीभूत होतं.”

हे ऐकल्यावर माझ्या मनात ते पुस्तक वाचण्याचं कुतूहल निर्माण झालं.

एकलेपण.

आज तळ्यावर मी आणि श्री.समर्थ असे दोघेच गप्पा करत होतो.आज प्रो.देसाई त्यांच्या खाजगी
कामामुळे येऊं शकले नव्हते.
समर्थांच्या मनात कसलातरी नवीन विषय डोक्यात होता.
मला म्हणाले.
“सामंत,
माझी अशी समज आहे की आपण सगळे तसं पाहिलत तर एकटेच असतो.सगळे आपण मिळून एकटे आहोत.
तुमचे विचार मला कधीच कळणार नाहीत,तुमचे सत्यही मला कळणार नाही.आणि माझ्याकडून मी तुम्हाला कितीही सांगायचे प्रयत्न केले तरी ते तुम्हाला कळणार नाही.माझ्या कवितेतून मी तुमच्यासाठी एक चित्र चित्रित करू शकतो. आणि त्या चित्रामधली एक झलक दाखवू शकतो. मी तुम्हाला एखादी गोष्ट सांगू शकतो त्यामुळे मी काय आहे हे तुम्हाला कळू शकतं मी ते सर्व कितीही प्रकारे रूपांतरित करण्याचा प्रयत्न केला तरी त्यातले वापरलेले कुठलेही शब्द ते सन्मिलित करू शकतील.आणि म्हणूनच मी म्हणतो की आपण वेगवेगळे आहोत.”

मी समर्थांना म्हणालो,
हे बघा,एकटं असणं ही काही वाईट गोष्ट नाही.एकटं असणं म्हणजे कुणाशी संबंधात नसणं असं नाही.त्यासाठीच मी म्हणतो की माणसाने एकमेकांवर प्रेम करावं.त्यामुळे एक्मेकाला एकटं असण्याचं भान राहत नाही.म्हणूनच मला वाटतं की आपण एकमेकावर प्रेम करावं, कुणीतरी आपल्याशी बोलेल ह्याची तजवीज करावी,त्यामुळे आपण एकमेकास आवडत रहातो,आपणाला वाटूं लागतं की आपण एकटे नाही आहोत.”

माझ्याशी श्री.समर्थ सहमत होऊन म्हणाले,
“ह्यासाठीच मी म्हणतो की,शब्द महत्वाचे असतात,कला महत्वाची असते,संगीत महत्वाचं असतं.हे नसलं तर दुसर्‍याला आपण आपल्या समीप कसं आणता येईल? म्हणूनच मला चित्रकार होणं,गायक होणं,लिहित रहाणं आवडतं.ह्यात माझं प्रतिबिबं दिसतं.ह्यातूनच काही वेळ मी तुम्हाला माझ्या समीप आणू शकतो.”

समर्थांच्या ह्या शब्दाविषयी,कला, संगीतविषयी मुद्द्यांची सत्यता पाहून मी म्हणालो,
“ह्या सत्याचे आपण सर्व नंतर हिस्सेदार होतो.आपल्या जवळ असलेला सारखेपणा हा आपल्याजवळ असलेल्या फरकापेक्षा जास्त उठवदार दिसतो.आपल्या प्रत्येकाला विचारशक्ती आहे.आणि आपले सर्वाचे काही लक्षं,इरादे ही आहेत.आपल्या प्रत्येकाजवळ काही कल्पना असतात,मतं असतात,आणि दुःखही असते त्याचे आपण सर्व हिस्सेदार असतो.”

समर्थ म्हणाले,
“तसं पाहिलंत तर ह्या सर्व सत्य गोष्टी आपल्या एकएकट्याच्या डोक्यात असतात.आणि आशा करीत असतो की,एकमेकाशी सहभाग ठेऊन आणि त्या गोष्टीचे हिस्सेदार होऊन आणखी कुणाला तरी थोडा वेळ का होईना निमंत्रण द्यावं.आपण कुणा दुसर्‍याला आपलं मन आणि आपले विश्वास समजायला मदत करावी.
माझा एकलेपणावर विश्वास आहे.मला मनाचं एकटेपण आवडतं,आणि आपलंच असं एकांडी खासगी जग असावं असही वाटतं.दुसर्‍यांच्या सत्यतेच्या पासून अद्वितीय आणि अलग असावं.ह्या आपल्या जगात आपण, काही निर्माण करतो,आपण त्याचं अधःपतन ही करतो,आपण काही शोधून काढतो आणि त्याचं आपण भानही ठेवतो.आणि काहीवेळा ह्या तीनही गोष्टीत दुसर्याला भागिदार पण करून घेतो.त्यामुळे आपण जगाशी संबंधीत आहो हे पण आपल्याला समजतं.”

आमची चर्चा खुपच रंगात आली होती.प्रो.देसाई ह्या चर्चेत सामील असते तर आणखी रंगत चढली असती.
“पुढे कधीतरी आपण हा विषय, भाऊसाहेब असताना काढून बोलूया “
असं मी म्हणालो.

उठता, उठता समर्थ म्हणाले,
“माझी समज आहे की,एखाद्या व्यक्तीला आपण पूर्णपणे समजून घेऊं शकत नाही.आपण फक्त त्याच्याकडच्या ज्ञानाचे भागिदार होतो.त्यातून उरलेलं जर काय असेल तर तो फक्त एक चम्त्कारच असावा असं मला वाटतं.”

आमचा वेळ मजेत गेला.एव्हडी उद्बोधक चर्चा होईल असं सुरवातीला वाटलं नव्हतं.

सांगा त्याने कधी सामोरे तरी यावे

स्वप्नात माझ्या ज्याने यावे
येऊन छळून त्याने जावे
सांगा,त्याने कधी सामोरे तरी यावे

कसा आहे,कोण आहे तो,जाणो कुठे आहे?
ज्याला माझ्या ओठांवर होय आहे
माझा आहे की परकी तो आहे
सत्यात आहे की कल्पित तो आहे

पाही तो विस्मयीत होऊन
असाच तो जरा दूर राहून
सांगा, नको राहू माझी निद्रा चोरुन

स्वप्नात माझ्या ज्याने यावे
येऊन छळून त्याने जावे
सांगा,त्याने कधी सामोरे तरी यावे

जादू करीत कुणी तरी जावे
काय करू माझे मन बेचैन व्हावे
तुझा दिवाणा असे त्याने सांगावे
लपून छपून त्याने का बरे रहावे

चूक करून बसून रहावे
फूलं घेऊन त्याने यावे
सांगा, त्यांने चंद्र तरी घेऊन यावे

स्वप्नात माझ्या ज्याने यावे
येऊन छळून त्याने जावे
सांगा,त्याने कधी सामोरे तरी यावे

प्रश्न एवढाच आहे की, तुम्हाला कोणत्या प्रकारची व्यक्ती व्हायचं आहे?

मी श्री समर्थांना म्हणालो,
“बरेच वेळा माणसं एखाद्या व्यक्तीबद्दल पूर्ण माहिती नसताना एकदम निर्णयाला येतात.मग तो त्यांचा निर्णय सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असू शकतो.
मी तुम्हाला हे असं का विचारतो ह्याचं एक कारण झालं आहे.परवा मला एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला होता.मी फक्त त्याला त्याने केलेल्या मुद्यावर हं हं एव्हढंच म्हणालो होतो.काल मी एका दुसऱ्या व्यक्तीशी बोलत असताना योगायोगाने, त्या दिवशी माझ्या फोनवर बोललेल्या व्यक्तीशी आणि ह्याच्याशी सलगी आहे असं कळल्यावर, विषय निघाल्यावर मला ह्याने सांगितलं की,ती फोनवरची व्यक्ती मला मी उद्धट,अहंकारी आहे असं म्हणाला.
ऐकून मला वाईट वाटलं “असं मी समर्थांना म्हणालो.तुमचा याबद्दल काय अनुभव आहे?असं ही त्यांना विचारलं

त्यावर श्री समर्थ मला म्हणाले,
“एखादा माणूस लाजाळू स्वभावाचाअसला आणि स्वाभाविकपणे तो तुमचं ऐकून तुम्हाला उत्तर देत नसला तर त्याला कंटाळवाणा किंवा उद्धट किंवा अहंकारी असल्याचं मनात धरलं जातं.गृहीत धरलं जातं.आपण ज्या पद्धतीने पाहतो,वागतो आणि बोलतो त्यावर आधारित लोक न्याय करतात.त्यांना ते जाणवलं असलं किंवा नसलं तरी ही.
म्हणून जेव्हा तुम्ही एखाद्याशी बोलता आणि फक्त होकार देऊन त्याचं म्हणणं मान्य करता तेव्हा तुम्ही त्या छोट्याश्या हावभावाचा एकापेक्षा जास्त मार्गांनी अर्थ लावायला बांधील होता.

लोकांना हे समजत नाही की,त्या क्षुल्लक कृतींचा अर्थ उद्धटपणासाठी नसतो.अपमानजनक नसतो.ओळख नसल्यामुळे सहसा शब्दांनी उत्तर न देण्याचा प्रयत्न होतो. कारण एखाद्या वेळी काहीतरी अयोग्य बोललं गेल्याचा आरोप होवू शकतो.जेव्हा खरोखर सांगण्यासारखं दुसरं काही नसतं, तेव्हा विनोदबुद्धीचा अवलंब केला जातो.
गोष्टी ज्या प्रकारे अभिप्रेत असतात तशा कधीच उलगडल्या जात नसतात.एखाद्याचा असा चूप रहाण्याचा स्वभाव नसतो.अजिबात ओळखत नसलेल्या व्यक्तीशी बोलण्यात एखाद्याला संकोच वाटेल असं ही नाही.
पण मला आठवतं की माझ्या आयुष्यात मी बोलण्याचा पुरेसा आत्मविश्वास ठेवून संवाद साधू शकलो.पण काही वेळा लोकांनी गैरसमजाने नकळत मला खाली पाडलं आहे.
माझ्या बोलण्यावर ते हसले आहेत.माझा विनोद त्यांना कळला नसेल.पण माझ्या मनात पुन्हा पुन्हा एक निर्णयात्मक दृष्टी ठेवून मी इतरांसमोर स्वतःला कसं सादर करावं यावर प्रभावीत झालो होतो.

आपण आपल्या जीवनात आलेल्या लोकांमध्ये किती बदल करतो हे आपल्याला कधीच कळत नाही. इतर लोक ज्या पद्धतीने वागतात त्यावरून तुम्ही त्यांचा न्याय करता, तरीही ते ज्या प्रकारे वागतात त्या कारणाचा तुम्ही ही एक भाग असता.तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की लोक लाजाळू, अतिउत्साही किंवा बिनधास्त का होतात. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की लोक स्वत:ला अपमानास्पद का बनवतात. कारण त्यांच्या आयुष्यात आलेल्या लोकांनी त्यांना काही गोष्टी सांगितल्या (मग ते खरं असेल किंवा नसेल) ज्यामुळे त्यांचा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला.आणि अशा प्रकारे त्यांच्या वागण्याचा मार्ग बदलला.आणि त्यांच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.

मी असं म्हणू शकत नाही की मी कधीही कुणावर रागावलो नाही.मी एवढेच सांगतो की जागरूक रहावं. मला विश्वास आहे की तुमच्यामध्ये लोकांना बदलण्याची आणि त्या बदल्यात स्वतःला बदलण्याची शक्ती असते.”

हे सर्व समर्थकांकडून ऐकून मी
त्यांना म्हणालो,
“ प्रश्न एवढाच आहे की, तुम्हाला कोणत्या प्रकारची व्यक्ती व्हायचं आहे? हे तुम्हाला ठरवावं लागेल.”

पण ही मेहनत फलदायी होईल.

आज नाही तर उद्या प्रकट होईल
हर दुसहाय्य सुध्दा विशद होईल

आम्ही जे स्वतःला करत आलो
मोजून मोजून ते कपट बाहेर येईल

मानुया आज समय दुसहाय्यीत आहे
उद्या निश्चित हा क्षण निघून जाईल

मित्रा हात पुढे करून तर बघ
पर्वतातून सुध्दा पाणी वाहत राहिल

कठीण समय किती ही असु देत
पण ही मेहनत फलदायी होईल

लगेच एखाद्याच्या स्वभावाचा न्याय करू नये.

मला शाळेत असल्यापासून डायरीत लिहिण्याची सवय आहे.आणि आता कधी कधी मी गंमत समजून जूने उतारे वाचत असतो.माध्यमिक शाळेत गेल्यावर पहिल्या
दिवसाचा लिहिलेला उतारा मी आज वाचत होतो.

मी “प्रथम चुकलो”हे मला ज्यावेळी कळलं,त्यावेळी मला जो आनंद झाला,असा आनंद मला माझ्या आयुष्यात कधिही झाला नव्हता.

मी माझ्या मित्राचा आणि माझा,आमच्या दोघांचा एकमेकांवर असलेला विश्वास आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे माझा त्याच्यावर असलेला विश्वास या गोष्टींवर मी
योग्य न्याय दिला नाही.मी योग्य न्याय द्यायला चुकलो होतो.लोकांवर लगेच न्याय न करण्यावर माझा विश्वास वाढला आहे.

मी माझा मित्राला जनार्दनला, बऱ्याच दिवसांपासून ओळखतो आणि तो माझा सर्वात चांगला मित्र आहे.आम्ही नेहमी एकमेकांच्या घरी जात येत असतो आणि प्रत्येक गोष्ट शेअर करतो.आम्हाला कपड्यांमध्ये सारखीच आवड आहे आणि त्याच प्रकारचं संगीत आवडतं. मी त्याच्या प्राथमिक शाळेत गेलो नव्हतो, त्यामुळे मला त्याचा तिकडच्या इतर मित्र मैत्रिणी बरोबरचा लगाव माहीत नव्हता.

माध्यमिक शाळेच्या पहिल्या दिवशी,तो माझ्या ओळखीच्या नसलेल्या अनेक मित्र मैत्रिणी बरोबर कॅफेटेरियामध्ये गेला होता. मी सुरवातीला कोणतेही नवीन मित्र बनवले नव्हते पण तो असं दाखवत होता की तो या नवीन लोकांना फार पूर्वीपासून ओळखतो.

आम्ही जेवणाच्या टेबलावर बसलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की तो माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त रूबाबदार पेहराव करून आला आहे.आम्ही एका जेवणाच्या टेबलावर माझ्या ओळखीच्या काही मित्र मैत्रिणीसह बसलो होतो पण मुख्यतः त्याने त्यांना आमच्यासोबत बसण्यासाठी आग्रह केला होता.मला त्याच्याबद्दल ज्या गोष्टी आवडत होत्या त्याच गोष्टी इतर लोकांना आवडत होत्या. असं मला वाटतं.तो अजूनही तसाच मजेदार, दयाळू आणि हुशार व्यक्ती आहे जे मी त्याच्या बद्दल अगदी लहानपणापासून जाणतो.

आम्ही जेवायला बसलो होतो, तो विनोद करू लागला आणि तो हे खूप उत्स्फूर्त होऊन करत होता.त्याने मला त्याच्या नवीन मित्र मैत्रिणींशी ओळख करून दिली,
ते माझ्याशी खूप छान वागत होते आणि मला त्यावेळी असं वाटलं की आम्ही चांगले मित्र बनू शकतो.दुपारच्या जेवणानंतर आम्ही दोघं जिथे वर्दळ जास्त नाही असं ठिकाण पाहून गप्पा मारत बसलो होतो.शाळेचा पहिला दिवस कसा गेला आणि आम्ही आधीच माध्यमिक शाळेत आहोत हे किती गंमतीशीर आहे याबद्दल आम्ही बोललो.

लोकांना बहुदा,परके खरोखर कोण आहेत हे माहित नसतं.माझ्या मते,बाहेर जे काही आहे त्यापेक्षा आतून जे आहे ते जास्त महत्वाचं असतं. लोकांच्या स्वभावामधे खोलवर जाऊन पाहण्यात मी आता चांगलाच तरबेज झालो होतो.मी बाहेरच्या खोट्या गोष्टींकडे बघायला आता शिकलो आहे. मी माझ्या मित्रावर विश्वास ठेवला आणि
ही खूप मोठी गोष्ट होती कारण मी ही गोष्ट केली नसती तर आमची मैत्री तशी फुलली नसती. त्यातून आमची मिडल स्कूल मैत्री सुरू झाली होती.

आपल्या सर्वांच्या जीवनात असे क्षण येतात जिथे आपण इतर व्यक्तींच्या स्वभावांचा अंदाज लावतो पण आपला अंदाज योग्य आहे की नाही हे आपल्याला खात्रीपूर्वक सांगता येत नाही.अशावेळी माझ्या अनुभवावरून मी एक मुद्दा सांगेन की लगेच एखाद्याच्या स्वभावाचा न्याय करू नये.

चार दिवस मिळाले असतां हसूं खेळून निभवावे

जगावे फक्त मित्रांनो,बस अशी कल्पना आहे
दोन वेळेच्या भाकरीतून जिणे आहे मेहनता आहे

फिरून कुणाची असुया नाही जगलो जरी कष्टाने
हर स्वास्थ्यात मला आपातातून आहे वाचववणे

हे माझे भाग्य आहे,जे आज मला मिळावे
वेदना आज करून,का कुणाला दर्शवावे

चार दिवस मिळाले असतां, हसू खेळून निभवावे
स्विकारता आहे माझी,कसे ते मी व्यतीत करावे

दुःख ना कुणी ऐके,असो माझे वा परक्याचे
अवधि हाच आहे,हसणे अथवा हसवण्याचे

संगीत

काल मी श्री. समर्थां बरोबर तळ्यावर फेरफटका मारत असताना एक प्रश्न केला. आणि तो त्यांनाच करण्याचा माझा उद्देश हा होता की,ते पेटी आणि व्हायोलिन वाजवतात.त्यांच्या संगीताच्या कार्यक्रमाला मी पूर्वी गेलो आहे.
मी त्यांना म्हणालो,
“संगीत म्हणजे काय? संगीत नसेल तर लोक कसे जीवन जगतील?हे विचार माझ्या डोक्यात येतात आणि हे संगीतात रस नसलेल्या लोकांना कसं लागू होतं?

ते मला म्हणाले,
“संगीताशिवाय “जीवनातील दिवसाची” ​​कल्पना करूया. संगीताशिवाय जीवन भावनाहीन, रंगहीन आणि अनावश्यकपणे रेखाटलेलं होईल .
संगीताची व्याख्या अशी करता येईल, “वेळेत आवाजाची मांडणी करण्याची कला”म्हणजे संगीत.
राग, सुसंवाद, ताल आणि अवधान यांच्याद्वारे एक सतत, एकसंघ आणि उद्बोधक रचना तयार करणं म्हणजे संगीत.

मला असं वाटतं की शब्दांचं अचूक आणि पूर्णपणे वर्णन करण्यासाठी संगीताचा वापर करणं हे खूपच क्लिष्ट होईल.परंतु तसं करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
संगीत ही अशी संवेदना आहे जी तुम्ही अनुभवल्यास,ती नेहमीच आनंददायी होईलच असं नाही.परंतु ते अजूनही संगीत म्हणून असतं. उदाहरणार्थ, समजा तुम्ही मध्यरात्री बाहेर फिरत आहात आणि तुम्हाला वारा वाहताना, झाडांच्या पानांची सळसळ, कुत्र्याचं भुंकणं,पक्षांचं गाणं ऐकू येतं आणि मग हे थोडावेळ थांबून पुन्हा ऐकू येणं हा ध्वनी म्हणजे निसर्गाचं संगीत म्हटलं तरी चालेल.
परंतु हे आवाज तुम्हाला वेगळे ऐकू येत नाहीत. तुम्ही ते सर्व एकत्र ऐकता.संगीताची संवेदना काय असावी हे तयार करण्यात,तुमची मदत करण्यासाठी तुमचे कान फक्त एक साधन आहे.
उत्कृष्ट नमुने तयार करणारे संगीतकार संगीताच्या संवेदना पाहतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या संवेदना मिसळून त्याचा मिलाफ करतात.या संवेदना आपल्या सर्वांमध्ये
असतात.
संगीतकार इतरांपेक्षा वेगळे नसतात, फक्त ते मोहकतेने संवेदनांची जुळणी करतात.
जर असे लोक अस्तित्वात नसतील तर संगीत कसं तयार होईल?जीवन आनंदात जगण्यासाठी संगीत आवश्यक आहे.

श्री समर्थ म्हणाले ते तंतोतंत मला पटलं.

तू आहेस माझे जीवन

दयाशिल लिहूं
रूपवती लिहूं
रमणीय लिहूं
हैराण झालो की तुला
ह्या पत्रात काय लिहूं

हे माझे प्रेम पत्र वाचून
नको जाऊ तू नाराजून
तू आहेस माझे जीवन
तू मला झालीस पावन

तुला मी चंद्र होतो म्हणत
सापडतात त्यावर डाग
तुला मी सूर्य होतो म्हणत
सापडते त्यावर आग

तुला मी फक्त सांगेन एव्हढे
तुझ्यावर मी प्रेम करतो केव्हडे

तुला मी गंगा समजत राहिन
तुला मी यमुना समजत राहिन
तू माझ्या समिप आहेस एव्हडी
तुला मी माझी समजत राहिन

अगर मी अंतर्धान झालो,आत्मा
भटकेल तुझ्या प्रतिक्षेमधे
प्रतिक्षेमधे,प्रतिक्षेमधे

हे माझे प्रेम पत्र वाचून
नको जाऊ तू नाराजून
तू आहेस माझे जीवन
तू मला झालीस पावन

समुद्राच्या लाटांवर माझ्या विचारांची खलबल.

कधी कधी अ-वास्तव विषयावर लिहिणं सुद्धा मनोरंजक असू शकतं.माझा खालिल लेख तसाच काहिसा नमुना आहे.

मला समुद्राजवळ बसून निळ्या काळ्या लाटांकडे पाहयाला आवडतं.मला असं वाटतं की जर मी तिथे बराच वेळ बसलो आणि माझ्या “मनाला”खरोखर इकडे तिकडे फिरू दिलं तर लाटांपर्यंत पोहोचेपर्यंत वाळूमध्ये,कमी झालेल्या पाण्यात पडून, माझं मन वाळूत रूतलं जाईल. आणि पुन्हा एखादी मोठी लाट येऊन पाण्याबरोबर फरफटत जाईल. आणि माझे विचार पुन्हा एकदा समुद्रात नेले जातील.

किनाऱ्यावर माझं शरीर खारट वाऱ्याची झुळूक अंगावर घेऊन,माझ्या विचारांना मंथन करणाऱ्या लाटांच्या आवाजाचा आनंद घेत राहिल .
मी अनेकदा माझ्या विचारांना उभारी देतो.तो एक दिवस विशेषतः वाईट होता,आणि खूप गर्दी असलेल्या जगाची वीट येऊन माझं “मन” आणि माझ्या भावना समतोल राहाव्यात म्हणून मी चौपाटीवर आलो होतो.

मी वाळूत बसलो आणि मी माझे डोळे बंद केले आणि माझे खांदे खाली सोडले. मी खाली पाहिलं,आणि मला दिसलं की विचारांचे छोटे चांदीचे धागे वाळूच्या ढिगाऱ्यातून पुढे सरकत होते.मी घाबरलो नाही.मला मोकळं राहून शांत वाटलं.छान वाटलं.

माझ्या विचारांना स्फुरण्यासाठी जागा हवी होती. लाटांमध्ये विचारांचे धागे हळूवारपणे उलगडलेले जात होते.ते सर्व माझ्याकडे किनाऱ्यावर परत येत नव्हते.
माझ्या मनाचे धागे एकमेकांच्या आत आणि बाहेर विणले जात होते आणि चपळतेने माझ्या शरीरात भरती ओहोटीं मधून सरकले होते.

समुद्राच्या पाण्याच्या लाटा पाहून मला अधिक आनंदी आणि अधिक खंबीर झाल्यासारखं वाटतं.कधी कधी रात्री मी समुद्रकिनारी परत जातो. तिथे अंधारात मला माझ्या प्रिय असलेल्या “विचारांच्या स्वप्नांचा”लाटांवर तरंगण्याचा प्रयास पाहून खूष व्हायला होतं.

रूप चंद्रासम असल्याने अहंकारीत होत नसतात

कल्पनेत कुणाच्या अशा तर्हेने येत नसतात
कुणाचा छळ, असं निष्ठूर होऊन करत नसतात
मनाला चिरडून मग ध्यान मनोरंजीत करत नसतात
ज्याला ठोकरले आहे त्याला फिरून ठोकरत नसतात

सौंदर्य, फुलांचे दोन दिवस,चांदणी ही चार दिवसांची
रूप चंद्रासम असल्याने अहंकारीत होत नसतात
कुणाचा छळ, असं निष्ठूर होऊन करत नसतात

उजडायचे असेल तर उजडायला भित नसतात
प्रेम करणाऱे दुःखाला घाबरून जात नसतात
कुणाचा छळ, असं निष्ठूर होऊन करत नसतात

प्रेमाचा धडा घ्यावा, नाहक जळकुट्यांकडून
की मनातली बाब ओठांवर कधी आणत नसतात
कुणाचा छळ, असं निष्ठूर होऊन करत नसतात

कल्पनेत कुणाच्या अशा तर्हेने येत नसतात
कुणाचा छळ,असं निष्ठूर होऊन करत नसतात

समुद्र किनाऱ्यावर वाळूत पाय खुपसून बसायला मला आवडतं.

“लोकांना समुद्र का आवडतो? याचं कारण असं की लोकांना ज्या गोष्टींचा विचार करायला आवडतं त्या गोष्टींचा विचार करायला लावण्याची शक्ती समुद्रात असते. असं कुणी तरी म्हटलं आहे.
माझा सागराच्या सामर्थ्यावर विश्वास आहे, त्याहूनही अधिक, वाळूमध्ये बोटं खुपसून राहणं मला आवडतं.

समुद्रकिनारा हे एक मजेदार, घटना घडवणारं, खेळकर आणि अस्तव्यस्तीक ठिकाण आहे, त्याच वेळी ते आश्चर्यकारकपणे सुखद, शांत, उपचार करणारं ठिकाण आहे. सागराबद्दल असं काहीतरी आहे ज्याचं मी वर्णन करू शकत नाही, कदाचित ते खारं पाणी, वाळू किंवा ते वातावरण मला इतकं आवडतं तेच भरपूर आहे असं वाटतं असल्यामुळे असेल.असंख्य लोक समुद्र किनाऱ्यावर जातात. त्यांना ही ते वातावरण आवडत असावं.असं मला वाटतं.
आपण जीवन नुसतं जगत आहोत हे वास्तव सागर किनारा त्यांना विसरायला लावत असेल.
संसारी लोकांना अधुनमधून समुद्र किनाऱ्यावर जाण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं.
समुद्रावर बसून विचार करायला वेळ मिळतो. समुद्र तुम्हाला स्वतःपासून दूर नेतो आणि तुम्हाला स्वतःसोबत वेळ घालवायला मदत करतो.
आणि माझ्या मते पायाची बोटं वाळूत खुपसून बसल्यावर वेळ कसा जातो हे कळत नाही म्हणून माझ्यसारखे बरेच लोक समुद्रावर जात असतील.”